06/04/2012
जय बजरंगबली...!!!!
जय पवनपुत्र हनुमान...!!!!
सर्व मित्रांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
सभी मित्रों को श्री हनुमान जयंती के इस पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएँ...........,जय हनुमान
श्री हनुमान जयंती.............
सर्वशक्तीमान : जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे.
भुते व मारुति : सगळया देवतांमध्ये फक्त मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला `भुतांचा स्वामी' म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्तीतील वाईट शक्ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.
महापराक्रमी : राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले - `वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता, सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.' हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धुम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य वीरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरी आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.
भक्त : दास्यभक्तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अजूनही मारुतीच्या रामभक्तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरिता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव तयार असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व व ब्रह्मत्व
यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक व सैनिक यांचे मिश्रण ! हनुमान म्हणजे भक्ती व शक्ती यांचा संगम !
अखंड सावधता व साधना : युद्ध चालू असतांनाही मारुति थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हासुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी गदेवर असायची.
बुद्धीमान : `व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, भाष्य, वार्तिक आणि संग्रह यांत मारुतीची बरोबरी करणारा कोणी नव्हता.' (उत्तररामचरित् ३६.४४-४६) मारुतीला `अकरावा व्याकरणकार' मानतात.
मानसशास्त्रात निपुण व राजकारणपटू : अनेक प्रसंगी सुग्रीवादी वानरच काय, पण रामानेही याचा सल्ला मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता, मारुतीने `त्याला घ्यावे' असे सांगितले व रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या प्रथमभेटीच्या वेळी तिच्या मनात स्वत:बद्दल विश्वास निर्माण करणे, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वत:च्या (रामाच्या) आगमनाबद्दल भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठविणे, यावरून त्याची बुद्धीमत्ता व मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते. लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्वास डळमळीत केला.
चिरंजीव : दर वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात तेव्हा ते तेच असतात, मात्र मारुति दर अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजीवांपैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात व त्यांची जागा अतिशय उन्नत असे सात जण घेतात. रावणाच्या दरबारातील मारुतीचे भाषण हे वक्तृत्वकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.