Bapat Brothers

Bapat Brothers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bapat Brothers, Medical Service, Jss Road, Charni Road, Girgaon East, Mumbai.

06/02/2022
14/05/2021

धन्वंतरी आणि महालक्ष्मी चा कृपेने आज आपल्या बापट ब्रदर्स दुकानाला 79 वर्ष पूर्ण झाली.
आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार.

19/04/2021

प्रश्न Madhav Dakve : हल्ली
▪️आयुर्वेदाचे योग्य मार्गदर्शन का मिळत नाही...?
कारण
▪️सर्वसामान्य माणसाची अवस्था
इकडे आड तिकडे विहीर
अशी झाली आहे....
▪️आज सहज सोपे आयुर्वेदाचे मार्गदर्शन आवश्यक आहे....
▪️तसे होताना दिसत नाही...
आजच्या घडीला आयुर्वेद
▪️सहज सोप्या पद्धतीने पुढे यायला हवा...

वैद्य प्र.प्र.व्याघ्रसूदन :
Madhav Dakve नमस्कार!
तुमची चिंता व प्रश्न योग्य आहे.
ह्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो,
आयुर्वेदाचे मार्गदर्शन हे वैद्याकडून होणे हे समाजरचनेत नव्हते, कारण
▪️आयुर्वेद समाजातल्या प्रत्येक घटकास माहीत होता.
उदाहरण दाखल जसे की
▪️अगदी पानवाल्याला कातचुना का व किती लावायचा हे माहीती होते,
▪️शस्रकर्म करताना जवळून पाहिल्या-मुळे न्हावींना चाई पडणे इ. व्याधींत जळवा कुठे व का लावायचे हे माहिती होते,
▪️गोपालकांना देशी गायीचे दूध दही ताक लोणी तूप कसेव का काढायचे हे माहित होते !
▪️आजीला मसाले-तैल-तूप-मधाचा जेवणात व
बटव्यातल्या वनौषधींचा आजारात उपयोग कसा कुठे व का हे माहीत होते,
(आता आजी व नात ह्यांत २ पिढितले ज्ञान अंतर तयार झाले आहे )
▪️पुजार्‍याला व ज्येष्ठांना सणवारांचे ऋतुचर्येशी संबंद्ध माहीत होते,
▪️असे सर्व बारा बलुतेदारांना आप अापल्या क्षेत्रात आयुर्वेदाचे ज्ञान
पिढीपरंपरागत होते,
▪️आयुर्वेद जनमानसात
रुढी परंपरा-दिनचर्येत-सणवारांत रुजलेला होता..... (आजही ग्रामीण भागात तो आहे !)

▪️तेव्हा कुठलेही
राजीव दिक्षीत
रामदेव बाबा
बालाजी तांबे
स्वागत तोडकर
अश्या चांगल्या-वाईट
परोकारी-स्वार्थी स्वयम्भूंचे
लोक प्रबोधन अपेक्षित नव्हते !!

पण
▪️पारतंत्र्यात हे सगळ बिघडले
▪️पारंपारिक सह आधुनिक विज्ञानाची जोड देण्या ऐवजी
▪️पहिली पाटी कोरी करण्यावर भर दिला गेला, परिणामी
▪️जनसामान्यांना आधुनिकतेचा इतका पगडा बसला !
▪️त्यात मार्केटिंग
चुकीच पण रेटून वारंवार दाखवल्यामुळे
▪️ऐलोपेथिक डॉक्टरांनी माहीत नसतानाही केलेल्या एकतर्फी विरोधामुळे
अनेक चुकीचे प्रघात पडले !
दर रोजच्या जीवनातील आयुर्वेद ते विसरले.
उदाहरण दाखल जसे की
▪️दंतमंजना निम्ब काडीऐवजी पेस्ट आली
▪️काजळ लावणे बंद झाले
▪️डोक्याला तैल थापण्यापासून शिकेकाई बंद शॅम्पू आले !
▪️जेवणात कच्चे ऐवजी रिफाईन फिल्टर तैल आले
▪️देशी दूध तूप ऐवजी पाश्चराईझ जर्सी गायींचे टोन्ड दूध आले.
▪️असे १ नाही हजार बदल
दुधापासून शेतीत झाले !

आजच्या घडीला
▪️तहान नसताना पाणी पिऊ नका
▪️एकावेळी १ पेलाच पाणी प्या
▪️१ ग्लास बॉटल हे पाणी पिण्याचे प्रमाण नाही
▪️जेवणा बरोबर पाणी प्या
असे शुल्लक मुद्दे ही आम्हाला
प्रत्येक रुग्णाला शिकवावे लागत आहे,
एवढा समाज अज्ञानी आहे !
भ्रमिष्ट झाला आहे !
▪️ऐलोपेथीने केलेला बुद्धीभेद व
▪️स्वत: चा विचार करण्याची गमवलेली क्षमता ह्यामुळे
▪️दुसरे कोणीतरी फुकट व सहज सोप्पे प्रबोधन करणारे भेटावे ही सतत अपेक्षा !

ह्यावर उपाय १ च
▪️शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा समावेश व्हायला हवा व
▪️आग्रहाने सर्व नियम पाळण्यावर भर द्यायला हवा.!

▪️वैद्य आप अपल्या परिने प्रयत्न करत आहेत पण
▪️चांगले समाजोपयोगी व सहज सोप्पे लिहणार्‍यां पेक्षा
▪️चुकीचे कामचलावू व स्वार्थ केंद्रित लिहणारे अनेक आहेत, ह्यामुळे
▪️आयुर्वेद आहे तसा लोकांपर्यंत हवा तेवढा पोहचत नाही.
▪️सहज सोप्पे सर्व भाषांमध्ये व नियमित लिहणारे वैद्य वाढायला हवेत.
▪️वैद्यांनी योगसंस्थांसह जीवनोपयोगी आयुर्वेद हा सशुल्क शिकवायला हवा.
▪️जनसामान्यांसाठी "योग" प्रमाणेच "स्वास्थ्यरक्षक आयुर्वेद" असा प्राथमिक-प्रथम-द्वितीय-तृतीय स्तरांचा
कोर्स असायला हवा.

▪️पण वैद्य नसलेल्या जनसामान्यांनी स्वत:च कुठेतरी १-२ भाषांतरीत पुस्तके वाचून लिहून जन प्रबोधन करणे अयोग्य !
▪️अगदी राजीव दिक्षीतांनी ही महायत्न केला पण त्यांच्याकडून ही समाजप्रबोधनात त्रुटी राहील्यात , चुकभूल झाली.
▪️पण त्यांच्या ह्या ट्रेंडमुळे पुढे अनेक स्वयंभू , वैद्य नसातानाही
▪️लोकजागरण करणारे चांगले वाईट बाबा बुवा इ. पुढे आले व
▪️काहींनी प्रामाणिकपणे स्वस्तात लोकापर्यंत आयुर्वेद पोहचवण्याचे प्रयत्न केले
▪️काहीजण स्वत:चे गल्ले भरणारे दुकान चालवू लागले.

असो
▪️फेसबुक व्हाट्सप वर चांगले लेख शोधण्यापेक्षा
▪️जवळच्या चांगल्या वैद्यांचा शोध घ्या !
▪️पुर्वी जसा फॅमिली डॉक्टर हाेता

▪️त्यापुर्वी ही जसे कुलगुरु , कुलवैद्य होते तसे
▪️सर्व कुटुंबाने चांगल्या वैद्याकडे जावे !

अाशा करुयात की लवकरच
▪️आयुर्वैद्यक चिकित्सा
🌿स्वदेशी पारंपारीक शेती
🐂देशी गोपालन
☸️अष्टांग योग
🏞️पर्यावरणपूरक जीवनशेैली
ह्यांचा आग्रह असलेले
👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦जनसमुदाय Scoial Groups अस्तित्वात येतील.
ही संकल्पना रुढ सुदृढ होईल !
अनेक वैद्य आयुर्वेदाचा जागर करत आहेत !
▪️follow share करा !
▪️एक कुटुंब एक वैद्य ही संकल्पना स्विकारा !

▪️आयुर्वेद हे आयुष्य जगण्याचे ज्ञान आहे !
▪️तुमच्यासाठी
हितकारक काय ?
अहितकारक काय ?
सुखकारक काय ?
दु:खकारक काय ?
हे आयुर्वेदच सांगतो !

#आयुर्वेद_समजा
#आयुर्वेद_स्विकारा
#आयुर्वेद_जगा

05/03/2021

🍀 *NATURE'S GIFT*

*Brahmi is Brain*
*Arjuna is Heart*
*Ashwagandha is Strength*
*Shatavari is Stamina*
*Guduchi ( गिलोय)is Immunity*
*Mulethi is throat*
*Ginger is digestion*
*Coconut oil is metabolism*
*Sweet Potatoes are Pancreas*
*Pumpkin is the GUT*
*Carrots are Retina*
*Tulsi is Oxygen*
*Tomatoes are Prostate*
*Pomegranate is Red blood cells*
*Water is Blood*
*Grapes are Lungs*
*Papaya is Liver*
*Apples are breathing Respiration*
*Moringa is Muscles & joints*
*We are gifted daily 660 litres of oxygen equivalent to 15 lakhs of ventilator cost, from the day we are born*
*& yet we are searching about credibility of medicinal plants & their claims substantiation.*

*TRUST NATURE !!*🍀

This is now available in our shop.
22/07/2020

This is now available in our shop.

30/05/2020

गेल्या 30 वर्षांपासून विलेपार्ले येथे वैद्यकीय चिकित्सा करणारे *वैद्य श्री.राजीव कानिटकर* यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा व्याधिक्षमता वाढवण्यासाठी सुचवलेले काही उपाय –
१. सर्वांनी दिवसभर कोमटच पाणी प्यावे. तापवून निवालेले नको.
२. अर्धा चमचा हळद घालून सकाळी एकदा अर्धा ते एक कप कोमट दूध प्यावे.
३. आलं, पातीचा चहा, धने, जेष्ठमध, तुळशीची पानं, काळी मिरी, अळशी, पुदिना, लवंग या पैकी जे उपलब्ध असेल त्याचा उकळवलेला काढा (दीड कप पाण्याचा आटवून एक कप शिल्लक ठेवणे) गाळून तो गरम असतानाच पिणे.
४. हळद+सुंठ पावडर+गूळ (प्रत्येकी २५ ग्रॅम) एकत्र करून, त्यात घरचे किंवा गाईचे तुप घालून त्याच्या वाटाण्यापेक्षा थोड्या मोठ्या गोळ्या करून, रोज एक एक गोळी दिवसातून दोन वेळा चघळून खाऊन वर गरम पाणी प्यावे.
५. ज्यांना पित्ताचा त्रास होत नाही, त्यांनी सकाळी नाश्त्यानंतर हळद आणि दुधाबरोबर एक चमचा च्यवनप्राश घ्यावा. (अर्कशाळा सातारा किंवा धूतपापेश्वरचा’ ’स्वामला’ च्यवनप्राश चांगला आहे)
६. एक ग्लास गरम पाण्यात पाव चमचा हळद व पाव चमचा मीठ घालून दिवसातून दोन वेळा गुळण्या कराव्यात.
७. दिवसातून दोन वेळा (सकाळी लवकर व रात्री झोपताना) गरम पाण्याची वाफ घ्यावी.
८. सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, चालणे यापैकी आपल्याला जमेल त्याप्रमाणे, प्रत्येकाने किमान २० मिनिटे तरी व्यायाम करावा.
९. औषधांमध्ये सेप्टिलिन गोळी (हिमालया) व संशमनी वटी (म्हणजेच गुडुची घनवटी) (ही कोणत्याही कंपनीची चालेल.)या दोन्हीची एकेक गोळी दिवसातून दोन वेळा गरम पाण्यातून घ्यावी.
१०. १२ वर्षांखालील मुलांना फक्त सेप्टिलिन सिरप दोनदोन चमचे दुप्पट कोमट पाण्यात मिसळून द्यावे. १२ वर्षांखालील मुलांना च्यवनप्राश न देता चरक कंपनी चे मेनॉल सिरप १-१ चमचा दिवसातून दोन वेळा कोमट पाणी किंवा कोमट दूधाबरोबर द्यावे.
११. ज्या लहान मोठ्यांना वारंवार सर्दी,कफ,खोकला याचा त्रास होत असेल त्यांनी सीतोपलादी चूर्ण व जेष्ठमध चूर्ण समभाग करून, (लहानांनी अर्धा चमचा व मोठ्यांनी एक सपाट चमचा) दुप्पट प्रमाणात अडुळसा सिरपबरोबर दिवसातून दोनदा चाटण करून घ्यावे. वर गरम पाणी प्यावे.
१२. व्याधीक्षमता/प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपलब्ध असलेली ही काही औषधे आपापल्या वैंद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत – अभिनव कंपनीचे इम्युजेन (सिरप/गोळ्या), लामार कंपनीच्या ऑप्टिलाईफ कॅपसूल्स, हिमालयाच्या शतावरी/अश्वगंधा/गुडूची कॅपसूल्स

*दैनंदिन जीवनामध्ये पाळावयाचे नियम*
१. दिवसातून दोन वेळा साबणाने स्वच्छ आंघोळ करा. बाहेरून घरी आल्यावर चपला,बूट शक्यतो घराबाहेर काढूनच आत या. आल्याबरोबर मास्कच्या इलॅस्टिकला धरूनच मास्क काढावा व नंतर दोन्ही हात साबणाने स्वच्छ धुवून मगच इतर वस्तूंना स्पर्श करावा. केव्हाही बाहेरून घरी आल्यावर अंगावरचे सर्व कपडे गरम पाण्यात भिजवून धुवायला टाका व आंघोळ करून मगच घरात वावरा.
२. दिवसातून चार वेळा तरी किंवा बाहेरून घरी आल्यावर प्रत्येक वेळी, बाहेरून आणलेली प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवून नंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.
३. घराबाहेर सॅनिटायझर ठिक आहे पण घरात शक्यतो साबणाचाच वापर करा. भाज्या किंवा फळे सॅनिटायझरनी धुवू नका.
४. घरातही शिंकताना / खोकताना तोंडावर टिश्यू पेपर ठेवा व तो लगेच कचऱ्याच्या डब्यात टाका.
५. फ्रिजमधले किंवा बर्फाचे सर्व प्रकारचे थंड पदार्थ, दही, चिंच, लोणचं, सॉस, श्रीखंड, व्हिनेगर, कच्चे टोमॅटो यासारख्या आंबट वस्तू, तळलेले सर्व पदार्थ या सर्वांमुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे हे विकार होऊ शकतात, त्यामुळे यांचे सेवन सध्या शक्यतो वर्ज्यच करावे.
६. शारीरिक अंतर पाळणे, मास्कशिवाय घराबाहेर न पडणे या गोष्टी सर्वांना माहितच आहेत पण घराबाहेर पडल्यावर या गोष्टींचे तंतोतंत पालन करा. एकदा मास्क लावल्यावर त्याला सारखा सारखा हात लावू नका.
७. दिवसातून एकदा इ-पेपर वाचा किंवा फक्त सह्याद्रीच्या (नॅशनल न्युज) बातम्या ऐका. बाकी दिवसभर बातम्या सोडून टिव्हीवरचा कोणताही कार्यक्रम बघा.
८. सर्दी, कफ, खोकला, ताप या लक्षणांनी घाबरून जाऊ नका. आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. पल्स ऑक्सिमीटर वर ऑक्सिजन पातळी ९२ च्या खाली जात नाही ना एवढे बघता आले तर बघा. डॉक्टरांच्या औषधांबरोबरच वर सांगितलेले घरगुती उपायही चालू ठेवा.
९. ही लक्षणं दिसताच स्वत:ला घरातील इतर माणसांपासून शक्यतोवर दूर ठेवण्याचा प्रयत्न करा पण घाबरून जाऊ नका. ही लक्षणं नसलेल्या अनेक व्यक्तीसुद्धा करोना पॉझिटिव्ह आहेत किंवा करोना नसतानाही केवळ भीतीपोटी अनेकजण हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले आहेत.
१०. मधुमेह, रक्तदाब, दमा हे विकार असणारे, तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आपली नेहमीची औषधे नियमितपणे घेणे आणि घराबाहेर न पडणे हेच महत्त्वाचे.
*शेवटचे पण महत्त्वाचे*
आज corona pandemic पेक्षा ही लोकांना fear pandemic ने जास्त ग्रासले आहे.
एका विशिष्ट पातळीपुढे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, नातेवाईक किंवा प्रशासन आपली मदत करू शकणार नाही हे लक्षात असू द्यावे. यासाठी आहार-विहार-आचाराचे नियम, नियमित व्यायाम आणि मानसिक संयम यांच्या सहाय्याने आपले आरोग्य हे ज्याचे त्याने सांभाळायचे आहे.
पुढील काही महिन्यात आपल्या सर्वांनाच करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना तो आत्ताही झालेला असेल, किंवा होऊन गेलाही असेल. आपण घाबरतोय ते फक्त या विकारावर अजून खात्रीलायक उपाय किंवा औषध सापडलेलं नाही म्हणून! आपण तर खाऊन पिऊन सुखी आहोत. परंतु रस्त्यावरचे भिकारी, सिग्नलवर दिसणारी कुपोषित मुलं, रस्त्याकडेने, झोपड्यांमध्ये राहणारी असंख्य माणसं यांची प्रतिकारशक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे का? आणि तसं असेल तर मृतांमध्ये त्यांचा आकडा कितीतरी जास्त असायला हवा होता, नाही का?
*म्हणूनच सांगतो, काळजी घ्या... काळजी करू नका!*

04/05/2020

कुणी इम्यून देतं का इम्यून?

घरातील दळिद्र उघडं पडणाऱ्या अनेक वस्तू आपण एका मोठ्या आवरणाखाली चांगल्याच दडपून ठेवलेल्या असाव्यात आणि एका मोठ्या वादळाने नेमक्या त्या बाहेर इतस्तत: पसरून आपल्याला उघडे करावे असेच काहीसे झालेय या ‘जागतिक संकटाने’.

एक साथ सुरु झाली आणि सगळ्यात आधी उघडी पडली ती ‘सरकारी वैद्यकीय व्यवस्था’, मग ‘सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता’, ‘सोशल distancing आणि lockdown चा फज्जा’.....खरं तर यादी खूपच लांब लचक होऊ शकते पण सध्या यात अगदी महत्वाची गोष्ट उघडी पडली आहे ती म्हणजे आपली ‘शिक्षण व्यवस्था’ .नाही नाही डिग्री शिक्षित आपण सगळेच आहोत...पण उघडे पडले ते आपले ‘उथळ ज्ञान’. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या, १०० पैकी १०० मिळवण्याच्या नादात ‘concepts’ clear होतायेत की नाही याचा कुठेही विचार केलेला नाही आणि त्याचीच फळे आज आपण भोगतोय.

१) हायजीन की इम्यून?

या साथीच्या आजाराच्या वेळी आधी बिंबवले गेले ते हायजीन. हात धुण्याच्या अनेकांच्या videos ने काही दिवस छान करमणूक केली. भारता सारख्या अस्वच्छ देशात त्याची गरज कदाचित होतीच. कंट्रोल वातावरणात राहणारे आणि अतीव स्वच्छ असे युरोप अमेरिका सारख्या देशात या विषाणूची लागण आणि मृत्यू बघता हा मुद्दा फक्त हायजीन चा नाही हे लक्षात आले आणि ‘immune चा मुद्दा जोर धरू लागला.

२) इम्यून चे short cut –
जसा हा मुद्दा जोर धरू लागला तसे whatsapp आणि फेसबुक येथून ज्ञानाची गंगा अविरत वाहू लागली. लोकांचीही एकूणच वृत्ती ‘जाणण्या ऐवजी मानणे’ असल्यामुळे सर्रास फोलोअर तयार झाले. कुठलीही खातिरजमा करण्याची सुद्धा गरज भासत नाही लोकांना. Short cut नेहेमी पर्याय असू शकत नाही आणि स्वास्थ्याच्या बाबतीत तर मुळीच नाहीत.

३) इम्यून कशा विरुद्ध – इन्फेक्शन विरुद्ध?

आपण असो अथवा bacteria -viruses सारखे सूक्ष्म जीव प्रत्येक सजीवाला ‘अस्तित्वाचा लढा’ आहे. जगण्यासाठी प्रत्येकच सजीव ‘अनुकुलता’ शुध्द मराठीत ‘favourable conditions’च्या शोधात असतो. फक्त आपली आणि सूक्ष्म जीवांची अनुकुलता मात्र अगदीच वेगवेगळी असते. सृष्टीचा balance राखण्यासाठी अर्थात हे आवश्यक आहेच. ते शोधात फिरत असतात आणि त्यांना अनुकुलता दिसली की ते शरीरात ठाण मांडून बसतात. नको असलेली मंडळी शरीरात घुसल्याचा अलर्ट वेगवेगळ्या लक्षणातून शरीर आपल्याला देत असते. ज्याला आपण infection झालं म्हणतो. आपण औषधं घेईपर्यंत शरीरातील डिफेन्स सिस्टीम कामाला लागलेली असते. शरीराचे पोषण उत्तम आहाराने झालेले असले की डिफेन्स सिस्टीम देखील उत्तम काम करते आणि आलेल्या शत्रूप्रमाणे आपली strategy आखते म्हणजेच antibodies बनवते. त्यांच्याकडे देखील intelligence department असते आणि ते स्पेसिफिक शत्रूच्या / इन्फेक्शन च्या बाबतीत strategy लक्षात ठेवतात. अनेक ज्ञात अज्ञात bacteria -viruses च्या विरुद्ध अशी प्रतिकार क्षमता आपल्या शरीरात आपल्या नकळत develop होत असते. एखाद्या विशिष्ठ bacteria -viruses च्या विरुद्ध काम करणारी यंत्रणा म्हणजेच इम्यून शरीर स्वत:च तयार करत असतं.

४) मग मी कोरोना विरुद्ध इम्यून कशी develop करणार?

जोवर शरीराला तुम्ही ‘प्रश्न पत्रिका’ देत नाही तोवर तो ‘उत्तर पत्रिका’ कशी तयार करणार? जोवर तुम्ही कोरोना बाधित होत नाही त्याच्या विरुद्ध लढणारी यंत्रणा कशी तयार होईल? अर्थात vaccination हा दुसरा पर्याय आहे पण त्याला बराच काळ अजून लागणार आहे.( आणि खरं तर तो योग्य पर्याय आहे की नाही हा भाग पुन्हा आहेच).

५) काहीही काय? आम्ही बाधित झालो आणि मेलो तर?

तुम्ही मुद्दाम जाऊन बाधित व्हा असं नाही पण हे लक्षात घ्या बाधित होणे म्हणजे लगेच मृत्यू नाही. फक्त कोरोना मुळे जीव गेल्याचे एकही उदाहरण नाही. आता पर्यंत जीव गमावलेले लोक हे अनेक व्याधींनी ग्रस्त होते. विविध आजारांसाठी अनेक लोक अनेक वर्षे औषधं घेत असतात. औषधांनी लक्षणे वरवर बरे केलेल्या लोकांचे शरीर आतून चांगलेच पोखरलेले असते. कोरोनाच काय पण कुठल्याही इन्फेक्शन च्या विरुद्ध लढणारी antibody ची फौज तयार करायला असं शरीर सक्षम नसतं. मृत्युदर हा एकूणच खूप कमी आहे त्यामुळे आधी हि भीती आपण काढून टाकायला हवी.

६) माझं शरीर कोरोना विरुद्ध स्वत:च इम्यून develop करेल का नक्की?

हा प्रश्न खरच पडला पाहिजे. आज पर्यंत शरीराला किती ‘गृहीत धरले’, कितीवेळा बाहेरचे खातो, किती वेळा आहार, झोप आणि व्यायाम सांभाळतो, किती वेळा ऋतू नुसार वागतो हे आठवले तर याचे उत्तर मिळेल.
भूक लागल्यावरच खाल्लेला योग्य आहार शरीरं ‘पचवतो उत्तम’ आणि उत्तम पचलेल्या आहारचे ‘शोषणही’ उत्तम होते ( digestion and absorption). शरीराला आवश्यक ती पोषणमुल्ये मिळत गेली की शरीरातील सर्वच यंत्रणा उत्तमरीत्या आपापली जवाबदारी पार पडतात. आपली immune system देखील याला अपवाद नाही. आता पर्यंत काही चुकले असेल तरी ‘देर आये दुरुस्त आये’!. शरीराची यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठीचे प्रयत्न आहार, झोप, आणि व्यायाम याद्वारे चालू ठेवा ,शरीराला त्याचे काम सांगण्याची गरज नाही ते बरोबर योग्य त्या गोष्टी करेल. शिवाय आतापर्यंत जे बाधित बरे झाले आहे त्यांच्या plasma चा औषध म्हणून उपयोग सुरु झालेला आहे...हि एक खूप मोठ्ठी पावती आहे. antibodies तयार होत आहेत काळजीचे कारण नसावे. (हि चिकित्सा फारशी प्रसिद्धीस येणार नाही कारण यातून कुठल्याच औषध कंपन्यांचा काहीच फायदा नसेल.)

७) म्हणजे मी नेमकं काय करू?

सर्वात आधी फेसबुक whatsapp वर येणाऱ्या उपाय योजना स्वत:च्या डोक्याने वापरू नका. आपल्या जवळच्या अथवा ओळखीच्या वैद्यांकडून त्याची सत्यासत्यता पडताळून घ्या. एक महत्वाचे सूत्र लक्षात ठेवा कुठल्याही औषधांनी इम्यून वाढत नाही. इम्यून असणे किंवा डिफेन्स सिस्टीम ने उत्तम प्रतिकार करणे हे पूर्णपणे तुमचा आहार कसा आहे आणि तो तुम्ही पचवता कसा यावर अवलंबून आहे. आपल्याला एक महत्वाचे सूत्र माहिती आहे ‘Favourable condition’ दिल्याशिवाय कुठल्याही microbes ची वाढ आपल्या शरीरात होणार नाही. अशी अनुकुलता शरीरात तयार होऊ न देण्यासाठी ‘पचन’ सांभाळा. आहार आणि पचन सांभाळले नाही तर तर फक्त ‘गरम पाणी’, ‘दुध हळद’, ‘आयुषचा काढा’, ‘चवनप्राश’ अशा गोष्टी घेऊन उपयोग होणार नाही आणि तुम्ही दोष आयुर्वेदाला द्याल.
तुमच्या ओळखीच्या अथवा जवळच्या योग्य वैद्याकडून स्वत:ची ‘दिनचर्या आणि ऋतुचर्या’ आखून घ्या. तुम्ही individual म्हणून प्रत्येक जण वेगवेगळे आहात. Immune हा विषय सुद्धा प्रत्येकाचा individual आहे. त्यामुळे तुमचे वय, तुमच्या कामाचे स्वरूप, घरात आणि व्यवसायात-नौकरीत असलेले ताण तणाव, तुमचे कल्चर, यानुसार तुमचा individual plan वैद्यांच्या मदतीने तयार करून घ्या. तेला तुपा संदर्भात तुमचे समज गैर समज वैद्यांकडून दूर करून घ्या. घरच्या स्वयपाकचे आणि स्वयपाक करतानाच्या सर्व प्रोसेसेसचे महत्व जाणून घ्या.

८) पण आयुर्वेदात कुठे उल्लेख आहे कोरोनाचा?
अगदी बरोबर, हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथात कुठेही ‘कोरोनाचा’ उल्लेख कसा असेल? त्याचे बारसे आपण आत्ता केले आहे न? पण आपल्याला काय घालवायचे आहे? विषाणूंचे संक्रमण....मग त्यासाठी घालवावी लागेल ‘अनुकुलता/ favourable condition’ आणि त्या साठी आयुर्वेदच उत्तम. तसाही ‘रूट cause’ वर काम करणारा आयुर्वेद अशी प्रसिद्धी आहेच की आयुर्वेदाची. तुम्हाला अनेक माध्यमातून ‘आयुर्वेद यात काही करू शकत नाही’ अशी टीका ऐकू येईल. खरं तर विषाणू संक्रमणाचे मूळ कारण ‘अनुकुलता आणि ती घालवायची कशी हे ज्याला कळले नाही’ तो कुणीच यावर ‘उपचार’ करू शकणार नाही. आणि अजून एक लक्षात घ्या ‘clinical trails ची संधी न देता हे आरोप होत आहेत. Modern medicines देखील ‘clinical trails’ च घेत आहेत हे देखील लक्षात असू द्या.
बाधित झाल्यावर चिकित्सा घेणे हा एक भाग झाला पण बाधित होण्या आधीच मी माझ्या स्वास्थ्याचा पाया भक्कम तयार करावा म्हणजे कदाचित मी बाधित झालोच तर माझ्या प्रतिकार शक्तीमुळे मी खडखडीत बरा होईन... या दोन्ही बाबतीत आयुर्वेद शास्त्र नि:संशय काम करणार. त्यामुळे डोक्यातून ह्या शंका काढून टाका. आणि हे देखील लक्षात ठेवा तुमच्या अवस्थेनुसार, ऋतूनुसार, लक्षणानुसार, औषधयोजना करतात वैद्य त्यामुळे अमुक एक औषध सांगा असे आयुर्वेदाच्या बाबतीत होऊ शकत नाही.

९) मग आयुर्वेदिक की allopathic ?

खर तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठलाही चिकित्सक त्याने शिकलेल्या शास्त्रानुसार रुग्णाला बरे करण्याची धडपड करत असतो. कुणीतरी श्रेष्ठ आणि कुणी कनिष्ठ असे मानणे चुकीचे आहे. आजार कुठलाही असो आजाराच्या मुळाशी जाऊन काम करणारा चिकित्सक महत्वाचा. कुठली तरी एक चिकित्सा पद्धती फास्ट काम करते आणि एक slow असे काही नसते. आपल्याला तात्पुरता लक्षणे घालवायची आहेत की कायमची हे महत्वाचे.
फार पूर्वी माझ्या लेकीने गमतीत मला विचारले होते ‘ Amma if an apple keeps a doctor away , what keeps a vaidy away’….त्यावेळी मी तिला उत्तर दिले होते ‘Dincharya and Rutucharya keep a Vaidya away’….त्यावेळी समज लहान असूनही ती पटकन म्हणाली होती... ‘then its difficult to keep a Vaidya away Amma ...!
यातील गमतीचा भाग सोडला तर ‘life centric approach’असलेले शास्त्र हा ‘स्वास्थ्य’ साठीचा उत्तम पर्याय आहे.

१०) कशापासून सांभाळू?

कुठलीही गोष्ट प्रसिद्धीस येऊ लागली की तिचा ‘व्यापार’ झालाच म्हणून समजा. कुठल्याही ‘package’ ला बळी पडू नका. अनेक immune grow अथवा rejuvenation औषधे येतीलच बाजारात....अर्थातच ती घेऊ नका. मुळात immune वाढवणे म्हणजेच ‘No Medicine’ हि अवस्था! आणि औषधे घेतल्या शिवाय समाधान च वाटत नसेल तर ओळखीच्या वैद्याला विचारून औषधे घ्या. कुणी तुम्हाला रसायन चिकित्सा सुचवली तरी हे अवश्य लक्षात ठेवा की त्याचे सुद्धा नियम आहेत म्हणजे रसायन कुणाला द्यावे, कधी द्यावे इत्यादी. थोडक्यात सांगायचे तर त्याचाही प्रोटोकॉल आहे. त्या बद्दल वैद्याला अवश्य विचारा.

११) आता lockdown नंतर काय?

संसर्ग टाळण्यासाठी आपण ‘संपर्क’ बंद केला. आज न उद्या कधीतरी संपर्क सुरू होणारच. योग्य ती हायजीन ची काळजी हा आता आपल्या आयुष्याचा भाग होणार आहे. पण ९९.९ % जर्म्स मारणारी disinfectant जो ०.१% जर्म सोडून देतायेत त्याला ‘शरीरात शिरून ठाण मांडून बसण्यासाठी अनुकुलता’ देऊ नका. बाहेरील स्वच्छतेपेक्षा आतील स्वच्छता महत्वाची आहे. ती राखलीत तर कशाचीही काळजी करण्याचे कारण नाही.

१२ ) vaccination घेऊ की नको?

खरं तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. Vaccination ने acquired immune प्राप्त होईल. या विशिष्ठ विषाणूची लस तयार होऊन बाजारात येई पर्यंत अजून एक नवा विषाणू थैमान घालण्याच्या तयारीत असेल. त्यामुळे एकूण किती लसी घ्यायच्या हा प्रश्न आहेच. ससंर्गाची चेन ब्रेक करणे महत्वाचे आहेच पण त्या पेक्षा महत्वाचे आहे ‘favourable condition’ ब्रेक करणे.

आपले इम्यून आपल्या हाती आहे ---- ‘इम्यून देता का इम्यून?’ म्हणत कुठेही गडबडून जाऊ नका आणि कुठल्याही short cuts ला बळी पडू नका.
Concepts clear करा आणि भीतीच्या बागुलबुवाला पळवून लावा.

वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
जिज्ञासा लर्निंग सेंटर
९७६४९९५५१७

14/04/2020

Address

Jss Road, Charni Road, Girgaon East
Mumbai
400004

Opening Hours

Monday 8:30am - 8:30pm
Tuesday 8:30am - 8:30pm
Wednesday 8:30am - 8:30pm
Thursday 8:30am - 8:30pm
Friday 8:30am - 8:30pm
Saturday 8:30am - 8:30pm

Telephone

022-23854468

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bapat Brothers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram