Dr Chavan's Homoeopathy

Dr Chavan's Homoeopathy Welcome to the Dr. Chavan's Homeopathy page. It's about sharing and enjoying all things homeopathic.

All types of chronic Health problems are treated only by Homoeopathic Medicine .

आध्यात्मावरची आस्था विश्वकल्याणरूपी असावी !     आपल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आणि त्यांच्याशी निगडित साहित्या...
04/12/2025

आध्यात्मावरची आस्था विश्वकल्याणरूपी असावी !
आपल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आणि त्यांच्याशी निगडित साहित्यात खरे तर यावर हजारो कोटी खर्च व्हायला हवा परंतु काही कालखंडानंतर येणाऱ्या कुंभ मेळ्यांवर हजारो कोटी खर्च करणार ज्यातून खरच काय निष्पन्न होत हे खरच कुणीही जबाबदारीने सांगू शकत नाही, कुंभ स्नानामध्ये जर कोटींच्या संखेमध्ये लोकांची आवक होते तर मुठभर दगड-माती जरी लोकांनी नेली तर पात्र स्वच्छ आणि मोठं होईल परंतु याउलट तिथे ढीगभर खचरा, विष्ठा टाकून त्याच नदीच्या पवित्र पात्राला अशुद्ध , घान करुन आपण आपले पावित्र्य जपण्याचा आंधळा प्रयत्न करतोय, सोबतच शासन- प्रशासन हजारो वृक्षांची कत्तल देखील करणार यातून फक्त निसर्गाची हानी होणार पर्यायाने माणसाचीच.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।।
संत तुकाराम महाराज म्हणतात जंगलातील झाड , पशु-पक्षी हे माझे नातलग आहेत , आणि ती देखील आपल्या स्वरात देवाचे नामस्मरण करतात. वृक्षतोड करुन कुठलाही संत निसर्गाची हानी इच्छीत नाही मग नाशिक सारख्या ठिकाणी कुंभस्नानाच्या नावावार हजारो वृक्ष तोडीचा अट्टहास कशाला ? दरवर्षी पंढरपूरच्या चंद्रभागेतील स्नान असो की अनेक वर्षातून येणारे नाशिकच्या गोदावरीतील कुभं स्नान इथे तुमच्या पावित्र्यच सोडा नदीच पर्यायाने निसर्गाचे पावित्र्य मात्र घालवतोय येवढं मात्र नक्की , खरच जर आध्यात्म , संस्कृती ,धर्म याची येवढीच ओढ आणि आस्ता आहे तर यातून सकारात्मक आणि जगाला हेवा वाटेल असं काहीतरी घडायला हवे जसं की त्या नदीचे पात्र या कोटी लोकांच्या येण्यामुळे स्वच्छ झाले , तिथली झाडे कापली नाही तर कोटी झाडे येता-जाता लाउन गेलीत , मग बघा पंढरपूर असो की नाशिक प्रत्तेक शहरातील नागरिक अश्या उत्सवांची आतुरतेने वाट बघतील नव्हे मागणी करतील की असा आध्यात्मिक उत्सव किंवा कुंभ मेळा आमच्या शहरात, नदीत एकदा तरी व्हावा ! -डॉ.संदिप चव्हाण

*इर्षेचा प्रवास प्रेरणेकडे….*    जेंव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेंव्हा तिथे ईर्शा जन्माला येते जेंव्हा आपण इतरांच्या का...
27/11/2025

*इर्षेचा प्रवास प्रेरणेकडे….*

जेंव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेंव्हा तिथे ईर्शा जन्माला येते जेंव्हा आपण इतरांच्या कार्याचे पोटभरून कौतुक करतो तेंव्हा ती निश्चितच प्रेरणा बनून आपल्या मार्गातील वाटांना प्रकाशमान करते हे मात्र नक्की. या मत्सर भावनेतून आपण आपली मानसिक स्थैर्य घालवतो आणि त्यातुन पर्यायाने आपली शांत निद्रा खंडित होते , चिडचिड होते, आपल्या परिवारातील प्रिय व्यक्तींशी देखील आपण निट वागत नाही , पुढे चालून पोटाचे विकार , आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतरही अनेक समस्या उभ्या राहतात.
इतरांच्या यशामधे त्रुटी काढणे, त्यानी ते कस कसे मिळविले हे न माहिती घेता आढाखे बांधणे आणि कल्पोकल्पित ते कसे मिळविले याचे सोप्या भाषेत वर्णन करणे त्याविरुद्ध जेंव्हा आपण मत्सर भावना न बाळगता आपण त्या यशाला जेंव्हा प्रेरणेच्या दृष्टीकोनातून बघू तेंव्हा त्यानी ते कसे संपादन केले याकडे लक्षपूर्वक आपले ध्यान केंद्रित करू आणि आपनासही कसे मिळवता येईल याकडे आपले पुढचे पाऊल टाकायला हवे.
बालपणी ससा कासवाची गोष्ट सांगितल्या जाईची ससा कसा हरला आणि कासव कसा जिंकला हे आपण पिढ्यांन पिढ्या ऐकत आलोय परंतु या गोष्टीला सकारात्मक हेतुने आज बदलण्याची गरज आहे आणि ती म्हणजे जमीन असे पर्यंत ससा कासवाला पाठीवर घेऊन कसा धावला आणि पाण्यातून कासव सश्याला आपल्या पाठीवर घेऊन कसा पोहला आणि सरते शेवटी दोघांनी शर्यत आपसात न करता परिस्थितीशी कशी केली आणि जीवनाचा प्रवास कसा मजेदार केला याला अर्थ आहे कारण एकट जिंकून त्या आनंदाला वाटणार कुणीतरी सोबत हव नाही तर त्या जिकण्यांला आणि जगण्याला काय अर्थ नाही का ?
- *डॉ.संदिप चव्हाण*

20/11/2025
बच्चे मन के सच्चे ….
15/11/2025

बच्चे मन के सच्चे ….

बालपण जपायला हवे ….
15/11/2025

बालपण जपायला हवे ….

खरतर अश्याच कणखर, धारदार निर्णय क्षमतेचीच खरी गरज असते देशाला पुढं नेतांना, आपली बाजू जागतिक पातळीवर मांडताना आणि कुटनित...
31/10/2025

खरतर अश्याच कणखर, धारदार निर्णय क्षमतेचीच खरी गरज असते देशाला पुढं नेतांना, आपली बाजू जागतिक पातळीवर मांडताना आणि कुटनितीतून तिला न्याय मिळवून देतांना.

हमें यह नहीं भूलना चाहिए कि भारत में ताकत का प्रतीक एक महिला है - इंदिरा गांधी

आज देशात महिला अनेक क्षेत्रात भरारी घेत कार्यरत आहेत आणि त्यांच्यासाठी इंदिराजी ह्या एक प्रेरणाच आहेत, भविष्यात त्यांच्या प्रमाणे पुनःश्च एकदा असंच कणखर महिला नेतृत्व मिळाव आणि देशाला त्यांच्या प्रमाणेच “आयर्न लेडी”गवसावी ह्या आदरांजलीसह त्यांच्या आठवणींना उजाळा देऊ या !

दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हेसत्य शिवाहुन सुंदर हेइथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचेसरस्वतीच्या प्र...
15/10/2025

दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

इथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे

चिरा-चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब अम्ही तर सागर हे

त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे

अकोला होणार का पुन्हा ‘कॉटन सिटी’ ?
08/10/2025

अकोला होणार का पुन्हा ‘कॉटन सिटी’ ?

*जगतांना दानी समुद्र व्हा !*थांबायचे आहे, तर मग समुद्र होऊन थांबू गहराईला सलाम माझा, खळखळनाऱ्याला नाहीजीवनात समुद्राप्रम...
25/09/2025

*जगतांना दानी समुद्र व्हा !*

थांबायचे आहे, तर मग समुद्र होऊन थांबू
गहराईला सलाम माझा, खळखळनाऱ्याला नाही

जीवनात समुद्राप्रमाणे विशाल, उदार आणि दानशूर असावे, इतरांना आपल्या विशालतेने आणि उदारतेने मदत करावी, जसे समुद्र सर्व नद्यांना सामावून घेतो स्वतः खारेपणाला समाऊन घेऊन , इतरांना गोडवा देतो !
शक्तिशाली असून देखील संयमी असणाऱ्या समुद्राकडून अजुन बरंच काही शिकायचं आहे मनुष्याला …..
*- डॉ.संदिप चव्हाण*

संसार सुगरणीचा , प्रेरणा देणारा ……     आयुष्याच्या वाटेवर आयुष्यभर अगदी पै पै जमा करुन दोन खोल्यांच घर देखील घेणे कठीण अ...
17/09/2025

संसार सुगरणीचा , प्रेरणा देणारा ……

आयुष्याच्या वाटेवर आयुष्यभर अगदी पै पै जमा करुन दोन खोल्यांच घर देखील घेणे कठीण असतं , परंतु ते घेतल्यानंतरचा आनंद त्या दांपत्या साठी किती आनंददायी ठरतो हे शब्दात देखील सांगणे कठीण आहे. आजच्या काळात जोडीदार शोधणे आणि आयुष्याचा संसाररूपी प्रवास सुखद पुर्ण करणे मोठं कठीण झालंय, कारण लीव्हइन रिलेशनशिप मधे राहणे आणि जमलं नाही म्हणून सोडून देणे हे सर्रास झालंय, परंतु याउलट आपण योग्यप्रकारे जोडीदाराची निवड करणे व आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देणे हे आज गरजेचे आहे.

अरे खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
- बहीणाबाई चौधरी

संसाराची सुरवात टांगलेल्या खोप्यातून सुरु होते आणि बहरते देखील , तिथे जोडीदाराची , आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी ह्या बहिणाबाईं चौधरींच्या कवितेतील पंक्ती जीवाला घोर लावून जातात.
*डॉ.संदिप चव्हाण*
*९५१८७०४८४०*

*दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे**सत्य शिवाहुन सुंदर हे**इथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचे**सरस्वतीच...
03/09/2025

*दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे*
*सत्य शिवाहुन सुंदर हे*

*इथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचे*
*सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे*

*चिरा-चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा*
*अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे*

*त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे*
*कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे*

Address

Opposite New Maratha Opticals, Beside Raghuwanshi Mangal Karyalaya , Above Anant Medical, Necklace Road Akola
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Chavan's Homoeopathy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Chavan's Homoeopathy:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram