20/01/2022
आपण आपल्याच आयुष्याकडून खुप काही अपेक्षा करत असतो. आणि त्या हव्या तशा नाही पूर्ण झाल्या की आपल्याच आयुष्याच्या नावाने बोंबाबोंम करत असतो. पण कधीतरी त्यालाही आपल्याकडून काही गोष्टी हव्या असतात. त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे "वेळ" आणि वेळेवर प्रयत्न करत राहणं. कारण वेळ दिला की बऱ्याच गोष्टी पूर्ण होतात. पहिल्याच प्रयत्नात तुम्हीं यशस्वी व्हाल अस नाही. तूम्ही जर तुमच्याच आयुष्याकडून एकाच वेळी खुप मागणं घालत असाल, तर ते सगळं एकाच वेळी तुम्हाला भेटेल अस ही नाही. त्यासाठी कायम प्रयत्न करत रहा, स्वतःलाही आणि तुमच्या आयुष्याला ही थोडा वेळ देत चला. प्रत्येक गोष्टीची एक योग्य अशी वेळ असते आणि त्या वेळेत ती गोष्ट तुम्हाला मिळून ही जाईल.
माणसानं कधीतरी आयुष्याचं ही ऐकून बघावं.
-..✍️❣️