15/03/2026
गोरखपूरचे भाजपाचे खासदार रवी किशन यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्येभाजपाचे सरकार येईल, असा दावा त्यांनी केला आहे. रवी किशन म्हणाले की, "तेथील जनतेला विकास आणि योजनांचा लाभ हवा आहे, त्यामुळेच यावेळी दीदी (ममता बॅनर्जी) सत्तेतून जात आहेत हे निश्चित आहे. तिथे भाजपाची सत्ता येणार."
"तुम्ही तिथे गेलात तर बंगालमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की हे 'मिनी पाकिस्तान' आहे." आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील रॅलीचाही उल्लेख केला. "यावेळी दीदी जात आहेत, हे तुम्ही खात्रीशीर लिहून घ्या. निवडणुका येत-जात असतात, पण तिथे अनेक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला ते 'मिनी पाकिस्तान' असल्यासारखं वाटेल."