18/11/2025
आजच्या काळात घर सांभाळणे जितके आव्हानात्मक झाले आहे, तितकेच कठीण झाले आहे मैत्री सांभाळणं. कारण आजच्या डिजिटल युगात भावना सुद्धा डिजिटल झाल्या आहेत. पूर्वीचे एकमेकांना भेटून बोलणं, हसणं-खेळणं, मन मोकळं करणं हे सगळं आता मोबाईलच्या स्क्रीनपुरतं मर्यादित झालं आहे. बाहेरच्या स्पर्धा आता घराघरात पोहोचल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून ते श्रद्धांजलीपर्यंत सर्व काही व्हॉट्सअॅप स्टेटसवर व्यक्त केलं जातं पण यात खरी भावना हरवत चालली आहे. अशा काळात खरी, मनापासूनची मैत्री टिकवणं अधिकच कठीण झालं आहे. बदलत्या काळात मैत्रीचं महत्व आणि बदलणारं मैत्रीचं स्वरूप याच विषयावर चर्चा केली आहे ज्येष्ठ समुपदेशक तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ यांच्यासोबत.
बदलत्या जनरेशन नुसार मैत्रीची व्याख्याच वेगळी झाली आहे. साधा एक फोन कॉल करणं, मित्रांना भेटणं, मन मोकळं करणं आता सर्वांना जीवावर येऊ लागलं आहे. "फॉलो", "लाईक" आणि "स्टोरी व्ह्यू" म्हणजेच आता मैत्रीचं मोजमाप झालं आहे का? या सगळ्यामुळे नात्यांमधली जवळीक, समजूतदारी आणि आपुलकी कमी होत चालली आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या काळात खरी मैत्री कशी ओळखावी? ती टिकवण्यासाठी काय करावं? AI, चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल जगात हरवलेला माणूस पुन्हा माणसाशी जोडला जाईल का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं, भावनिक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून दिली आहेत ज्येष्ठ समुपदेशक तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ Knowledge Katta च्या या विशेष भागात . त्यामुळे पाहायला विसरू नका Knowledge Katta शनिवारी सायंकाळी ६:०० वाजता फक्त Only Manini आणि My Mahanagar च्या Youtube चॅनलवर.
#मैत्री #खरीमैत्री #डिजिटलयुग #तृप्तीजोशी #ज्ञानकट्टा #नातेसंबंध #भावना #मैत्रीचेमहत्व #आधुनिकमैत्री #मैत्रीगोळ्स #खरीनाती #समुपदेशन #मनाचेजोड #भावनिकनाती