NatureHealing

NatureHealing Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NatureHealing, Acupuncturist, 2/11 Vidhyadhar, Near Vitthal Temple, GaonDevi Road, Mumbai.

We give service for skin, hair problem specialized in beauty treatment, pain and weight loss naturopathic treatment, Acupuncture, Diet and Nutrition, Panchakarma Therapy, Herbal Therapy.

https://youtu.be/Rx230juRyGY
02/09/2024

https://youtu.be/Rx230juRyGY

प्रिय दर्शक, तुम्हा सर्वांचे गुरु कृपा By Sandeep Joshi या youtube चॅनेल वर हार्दिक स्वागत आहे. आज आपण राहु काल बद्दल जाणून घेवु. र....

तरुण वयातच केस पांढरे का होतात? त्यावर तुम्ही काय करू शकता?माणसाच्या सौंदर्यात भर घालण्यात त्याच्या केसांचा खूप मोठा हात...
24/11/2022

तरुण वयातच केस पांढरे का होतात? त्यावर तुम्ही काय करू शकता?

माणसाच्या सौंदर्यात भर घालण्यात त्याच्या केसांचा खूप मोठा हात असतो, आणि माणूस हा कोणाच्याही केसांवर पहिले भुळतो कारण दाट काळेभोर आणि नीट नेटके केस तुमची वेगळीच छाप समोरच्या व्यक्तीवर पाडतात!

आणि फक्त काळेभोर दाट केस असून चालत नाही, त्यांची एक विशिष्ट फॅशन असेल तर ते आणखीनच खुलून दिसते!
अवेळी टक्कल पडणे, केस गळणे, केसांची वाढ नीट न होणे, केस लवकर पांढरे होणे, त्यासाठी वापरला जाणारा हेयर डाय आणि त्यातली केमिकल्स या अशा समस्यांना माणूस सुद्धा तितकाच जबाबदार आहे!

कारण केसांची योग्य काळजी न घेण किंवा त्यांना योग्य ते पोषण न मिळणं यामुळेच या समस्या उद्भवतात!

काळे, चमकदार केस हे सर्वांनाच हवे असतात. पण सर्वच एवढे नशीबवान नसतात. आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अवेळी केस पांढरे होणे हे आता सामान्य झाले आहे. कारण आता ६० नाही तर ३० वय असतानाचा लोकांचे केस पांढरे होतात.

अवेळी केस पांढरे होणे ह्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे तणाव. ब्रिटीश वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार वैज्ञानिकांनी ह्याचा शोध लावला आहे की, तणाव आपल्याला वेळेआधीच वृद्धत्वाकडे घेऊन जातो.

मेलानिन हे एक असं तत्व आहे जे आपल्या केसांना काळं ठेवण्याचं काम करत. जेव्हा मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करणे थांबवतं तेव्हा आपले केस हे पांढरे होऊ लागतात.
जसं शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विटामिन्सची गरज असते तसचं केसांना काळे ठेवण्यासाठी विटामिन बी -१२ महत्वाचे असते. ह्याच्या कमतरतेमुळे मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करू शकत नाही.

ज्या लोकांना नेहेमी डोकेदुखीचा त्रास असतो किंवा सायनस हा आजार असतो त्या लोकांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होतात.

आजकाल केसांना सिल्की शाईनी बनविण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत. त्याच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्या बघून आपल्या सारखे लोक ते केमिकल युक्त शाम्पू वापरतात. ह्यामुळे देखील केस पांढरे होतात.

जर तुम्ही मद्यपान, धुम्रपान, ड्रग्स इत्यादी गोष्टींच्या आहारी गेले असाल, तर हे देखील तुमचे केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
आपले केस पांढरे व्हायला लागले की, आपण लगेच त्याला डाय करायला लागतो. पण जास्त डाय केल्याने केस आणखी पांढरे होण्याची शक्यता असते. कारण ह्यात वापरण्यात आलेले केमिकल्स केसांकरिता अत्यंत हानिकारक असतात.

आणि सध्या तर जाहिरातीत सुद्धा दाखवतात की केमिकल्स शिवाय डाय आले आहेत पण खरं बघायला गेलं तर कोणताही डाय केमिकल्स शिवाय बनूच शकत नाही, कारण त टिकण्यासाठी त्यात केमिकल्स सारख्या गोष्टी घालाव्याच लागतात!

सध्याच्या तरुण मुलांमध्ये तर केस जाणून बुजून पांढरे करायचे किंवा वेगवेगळे कलर द्यायचे ही फॅशन झाली आहे, जी अत्यंत हानिकारक असून त्यांचे परीणाम खूप वाईट आहेत! कारण तरुण वयात केसांना योग्य ते पोषण न मिळता केमिकल्स चा भडिमार झाल्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला ही त्रास भोगावे लागतात!

आपलं रूप आपल्याच हातात असतं, त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यायची आणि केसांची कशाप्रकारे निगा राखावी हे प्रत्येकाला मनावर घ्यायला पाहिजे, फॅशन किंवा ट्रेंड चा विचार थोडा बाजूला ठेवून काय गुणकारी किंवा काय जास्त चांगलं आहे याकडे लक्ष देणं गरजेच आहे!

वयाच्या पस्तिशीनंतर केस पांढरे होणं ही सामान्य गोष्ट आहे.

वास्तवात आपले केस गळणं आणि ते पुन्हा उगवणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जसजसं वय वाढत जातं, केसांचे रोम छिद्रं बंद होतात आणि त्यांच्या रंग उत्पादनाची क्षमता पण घटते. या प्रक्रियेलाच केस पांढरे होणं असंही म्हटलं जातं.

परंतु, केस केव्हा पांढरे होतील, हे निश्चित करण्यास काही प्रमाणात जेनेटिक्सची पण भूमिका असते. एकदा पस्तिशीच्या जवळपास माणूस पोहोचला की केस एकतर पांढरे होऊ लागतात किंवा तपकिरी होतात.

पण, काही लोक पांढरे केसांचा संबंध अक्कल आणि मॅच्युरिटीशी जोडताना दिसतात. अनेक लोक मानतात की, वय वाढत आहे, त्यामुळे केस पांढरे होत आहेत. पण त्यांना हे केस पांढरे होऊ नये असं वाटत असतं. पूर्वीप्रमाणेच जवान आणि काळे केस असावेत असं त्यांना वाटत असतं.

कॉस्मेटिक वर्ल्डमध्ये तगडी फी घेऊन पांढरे केस काळे करण्याचं काम कॉस्मेटिक एस्थेटिक्स आणि डर्मेटोलॉजिस्ट करत आहेत. पण हे काम काही सोप्या घरगुती उपायांनीही केले जाऊ शकते.

काही उपाय केस पांढरे होण्यापूर्वी काम करतात तर काही पांढरे झाल्यानंतर तुमची मदत करतात. या लेखात आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्याचे काही सोप्या घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत.

1. पुरेशा व्हिटॅमिनचे सेवन (Get Enough Vitamins)
असे काही व्हिटॅमिन जे तुमचे केस हेल्दी ठेवू शकतात, यामध्ये,

व्हिटॅमिन बी, विशेष रुपाने बी-12 आणि बायोटिन
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ए
समावेश आहे.

2. पुरेशा मिनरल्सचे सेवन करा (Get Enough Minerals)
असे मिनरल्स जी केसांची वाढ आणि रिपेअरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात. यामध्ये,

झिंक
आयर्न
मॅग्नेशियम
सेलेनियम
कॉपर
आदींचा समावेश असतो.

3. धूम्रपान करु नका (Stop Smoking)
धूम्रपानमुळे फक्त लंग्स / फुफ्फुसच नव्हे तर स्किन आणि केसांनाही नुकसान पोहोचू शकते. यामुळे केस पातळ होऊ शकतात आणि रोमछिद्रे आकुंचन पावतात.

4. उन्हापासून केसांना वाचवा (Protect Your Hair From The Sun)
केसांना उन्हापासून वाचवणे खूप गरजेचे आहे. ऊन आणि यूव्ही किरणांमुळे केसातील ओलावा कमी होऊ लागतो. त्यामुळे केसांमध्ये ड्रायनेस वाढतो आणि केस गळण्याची समस्या सुरु होते. यापासून वाचण्यासाठी डोक्यावर हॅट किंवा टोपी घाला.

5. केसांचे नुकसान करणे बंद करा (Stop Damaging Your Hair)
हेअर केअरचे अनेक फायदे आहेत. पण त्याचा गरजेपेक्षा जास्त वापर केला तर केसांचे नुकसान होऊ शकते. यामध्ये,

ब्लीचिंग
ओल्या केसांना ब्रश करणे
रुंद दातांचा कंगवा वापरणे
केसांना हेअर ड्रायरचा जास्त वापर करणे
साबण / केमिकल शॅम्पूने केस धुणे
केस जास्त धुणे
आदींचा समावेश होतो.

पांढऱ्या केसांसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Gray Hair)
नॅचरल हीलिंगची बाजू घेणारे नेहमी पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आजमावण्याचा सल्ला देतात. यामध्ये समावेश आहे...

खोबरेल तेल (Coconut Oil)

प्रत्येक दुसऱ्या दिवशी, झोपायला जाण्यापूर्वी आपले केस आणि डोक्याच्या त्वचेला खोबरेल तेलाने मालीश करा. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले केस धुवून घ्या.

अद्रक (Ginger / Zingiber Officinale)
दररोज एक टीस्पून ताजं अद्रक आणि 1 टेबलस्पून मध एकत्रित करुन खा.

गुळाचा शिरा (Blackstrap Molasses)
प्रत्येक दुसऱ्या दिवशी गुळापासून तयार केलेल्या शिऱ्याचे सेवन करा. यामुळे अनेकवेळा पांढरे झालेले केसही काळे दिसू लागतात.

आवळा (Amla / Phyllanthus Emblica)

दररोज 6 ounces किंवा 170 ML ताज्या आवळ्याचा ज्यूस प्या. जर असे करणे शक्य नसेल तर प्रत्येक आठवड्याला एकदा आवळ्याच्या तेलाने केसांची मालीश करा. आवळा केसांसाठी संजीवनीचे रुप मानले जाते.

काळ्या तिळाचे बी (Black Sesame Seeds / Sesamum Indicum)

आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा, एक चमचा काळ्या तिळाच्या बीचे सेवन करा. याच्या सेवनाने केस पांढरे होण्याची प्रक्रिया केवळ मंदच होते, असे नव्हे तर अनेवेळा पोषण मिळाल्यामुळे पांढरे केसही काळे होऊ लागतात.
तूप (Ghee)

देशी गाईच्या शुद्ध तुपाने केस आणि स्काल्पला मसाज करा. देशी गाईच्या तुपाला आयुर्वेदात मोठे गुणकारी मानले जाते. यामध्ये असलेले प्रोटिन केसांना जबरदस्त पोषण देते आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद करते.

राजगिरा (Amaranth )

ताज्या राजगिराचा रस काढा आणि आठवड्यातून तीन वेळा केसांवर लावा. आयुर्वेदामध्ये हे एक अतिशय प्रभावी आणि अंमलात आणला गेलेला उपाय मानला जातो.

व्हीटग्रास जूस (Wheatgrass Juice / Thinopyrum Intermedium)

प्रतिदिन 30 ते 60 ML ताजा व्हीटग्रास ज्यूस प्या. 1 मोठा चमचा व्हीटग्रास पावडर रोज आपल्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणात मिक्स करा. यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे केसांना हेल्दी वाढ मिळते आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद होण्यास मदत करते.

कांदा Onion

कांदा डोक्याला लावण्याचे अनेक फायदे आहेत. कांद्याचे तेलही केसांसाठी खूप गुणकारी मानले जाते. ब्लेंडरमध्ये एक कांदा बारीक करुन घ्या. कांद्याची पेस्ट एखाद्या चाळणीच्या मदतीने चाळून तिचा ज्यूस काढा.

आठवड्यातून दोन वेळा, हा रस आपल्या डोक्याला लावून घासा. सुमारे 30 मिनिटे केसांवर ही पेस्ट तशीच राहू द्या. नंतर डोकं शॅम्पूने धुवून घ्या. पांढ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.

गाजराचा रस (Carrot Juice / Daucus Carota Subsp. Sativus)

गाजरमध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन असते. यामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन्स केसांचे आरोग्य चांगले करण्यासाठी आवश्यक असतात.

जर केस पांढरे होत असतील तर तुम्ही रोज 250 एमएल गाजराचे ज्यूस प्यायला हवं. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळेल आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावेल.

कडी पत्ता (Curry Leaves / Murraya Koenigii)

1/4 कप कडी पत्ता आणि 1/2 कप दह्याची पेस्ट करा. ते तुमचे डोके आणि स्काल्पवर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा.

अश्वगंधा (Ashwagandha / Withania Somnifera)

भोजनाबरोबर अश्वगंधाच्या पत्त्याचे सेवन करा. किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या अश्वगंधाच्या पावडरचाही उपयोग करु शकता.

अश्वगंधाला भारतात जिनसेंग नावानेही ओळखले जाते. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ताकद आणि एनर्जी मिळते. त्याचबरोबर अश्वगंधा केसांनाही हेल्दी बनवते.

बदामाचे तेल (Almond Oil)

बदामाचे तेल, लिंबाचा रस आणि आवळ्याचा ज्यूस समान पद्धतीने एकत्रित करा. आपल्या केस आणि स्काल्पच्या मिश्रणाने मालीश करा. तीन महिन्यांपर्यंत दिवसातून दोन वेळा हे रुटीन फॉलो करा. हा उपाय आयुर्वेदात सांगितल्या गेलेल्या चांगल्या उपायांपैकी एक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा 👉

NatureHealing center - +919619371711










WONDER FOODनिरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होत...
22/11/2022

WONDER FOOD

निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर

ठळक मुद्दे
खजूरातील पोषक गुणधर्मांमुळे खजुराला वंडर फूड असं म्हणतात.
आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो.
निरोगी त्वचा आणि सुंदर केसांसाठी खजूर खाणं फायदेशीर ठरतं.
केवळ थंडीतच नाही तर एरवीही खजूर खाण्याला आरोग्य मूल्य आहे. खजुरातील पोषक घटकांमुळे खजुराला 'वडंर फूड' असं म्हटलं जातं. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

रोज खजूर खाल्ल्यास..

1. खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात. खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं.

2. खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास होतो. खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही. पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो.

3. खजुरातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. सुकामेव्यात खजुरात सर्वात जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो.

4. गरोदरपणात नैसर्गिक प्र्सूती होण्यासाठी खजुर खाण्याचा फायदा होतो. तसेच प्रसूती काळातल्या वेदनांमुळे आलेला अशक्तपणाही खजुराचा आहारात समावेश केल्यानं दूर होतो.

5. खजुरात फ्रक्टोज ही साखर असते. साखर न वापरता पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर आरोग्यदायी ठरतो. आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केल्यानं वजनही आटोक्यात राहातं.खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

6. खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फाॅस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्याने हाडांच्या विकाराचा धोका टळतो.

7. खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहाण्यास मदत होते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा उपयोग होतो.

8. खजुरात लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. रोजच्या आहारात खजूर असल्यास ॲनेमियाचा धोका टळतो.

अधिक माहितीसाठी संपर्क करा 👉

NatureHealing center - +919619371711










आरोग्यासाठी घातक साखर आरोग्यासाठी घातक आहे साखरेचा गोडवासाखरेचे प्रमाण वाढवल्यास इन्सुलिनचा स्राव वाढतो. इन्सुलिन साखरेल...
20/11/2022

आरोग्यासाठी घातक साखर

आरोग्यासाठी घातक आहे साखरेचा गोडवा

साखरेचे प्रमाण वाढवल्यास इन्सुलिनचा स्राव वाढतो. इन्सुलिन साखरेला वसामध्ये परिवर्तित करते, जी लिव्हरमध्ये जमा होत राहते. त्यामुळे, साखर ग्रहण करणे व्यसनात रूपांतरित होते. प्रयोगशाळेत उंदरावर केलेल्या प्रयोगात ९३ टक्के उंदरांनी कोकिनऐवजी साखरेच्या पाण्याला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. साखरेचे अमर्यादित सेवन धूम्रपान आणि मॅरिजुआनाच्या सेवनापेक्षाही घातक आहे. साखर असलेल्या आहाराच्या सेवनाने तुमच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे.

साखरेचे व्यवसन जडण्याचे चक्र कोणते

साखर ग्रहण करण्याचे व्यसन जडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. हे व्यसन जडल्यास प्रत्येक वेळी काहीतरी गोड खाल्लेच पाहीजे, असे वाटायला लागते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास मेंदूतून डोपेमाईनचे स्राव वाढायला लागते. इन्सुलिन मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे साखरेला लिव्हरमध्ये वसा म्हणून जमा व्हायला मदत होते. त्यानंतर शरीराला साखरेची गरज प्रचंड वाटायला लागते. ब्लडशुगर कमी झाल्यावर मोठ्या प्रमाणात साखर खाण्याची इच्छा उत्पन्न व्हायला लागते आणि भूकेचे प्रमाणही वाढायला लागते. हे चक्र सातत्याने सुरू असते.

साखरेला गोड विष का म्हटले जाते

रिफाईन्ड शुगरचा वापर वाढण्यासोबतच मधुमेह आणि संबंधित अन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. मानवी शरीर मानवानेच बनविलेल्या साखरेला सहन करू शकत नाही. साखर आपल्या मेंदूत एक रसायन बिटा एण्डोर्फिन्सची मात्रा वाढवत असते. ही मात्रा लठ्ठपणा आणि इन्सुलिनसाठी प्रतिरोधक शक्तीचे कारण ठरते. साखरेची अतिरिक्त मात्रा हृदयाचे आजार, लिपिड समस्या, हायपरटेन्शन, टाईप २ मधुमेह, डिमेन्शिया, कर्करोग, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे कारण असते.

साखरेमुळे उत्पन्न होणाऱ्या अन्य समस्या

हृदयाला आघात देण्यासोबतच कंबरेजवळ मेद वाढण्याचे कारण साखर आहे. ही स्थिती इन्सुिलन रेजिस्टेन्सला कारण ठरते. खरेतर साखर ही एक सायलेंट किलर आहे, जी कर्करोग आणि कर्करोग वृद्धिंगत होण्यास कारणीभूत ठरते. अनेकदा साखरेबाबतची गोडी अनुवांशिक असू शकते. साखर तुमच्या मेंदूची ऊर्जा कमी करते. साखर आणि अल्कोहोलचा लिव्हरवरील दुष्परिणाम जवळपास एकसारखाच असतो. साखर अधिक खाल्ल्याने दैनंदिन जीवनमानाची गती कमी करते आणि आपल्याला लठ्ठ बनविण्यास मदत करीत आहे.

साखर घातक तर फळे लाभदायक का

फळ हे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे उत्तम स्रोत आहेत. त्यातून फायबरही मिळतात. पोटॅशियमचे उत्तम स्रोत असण्यासोबतच फळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात. फळांमध्ये असलेल्या फ्लेवोनॉईड्समुळे कार्डियोव्हॅस्क्युलर आजाराचा धोका कमी होतो. फळे आपल्या आरोग्याचे संतुलन राखतात आणि अन्य खाद्यपदार्थांच्या सेवनापासून बचाव करतात. बरेचदा फळे आणि हिरव्या भाज्या खाण्याचाच सल्ला दिला जातो. त्यातही भाज्या खाण्यावरच भर दिला जातो. दररोज भाज्यांसोबतच किमान दोन फळ खाणे गरजेचे आहे, हे महत्त्वाचे.

नैसर्गिक साखर ॲडेड साखरेपेक्षा चांगली आहे का

नैसर्गिक साखर केळ व अन्य फळ, दुधासारख्या अनप्रोसेस्ड खाद्यपदार्थांतून मिळते. यात कॅलरी आणि सोडियमची मात्रा कमी असते आणि पाण्याची मात्रा भरपूर असते. सोबतच अनेक महत्त्वाचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही असतात.

दिवसाला साखर किती घ्यावी

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या निष्कर्षानुसार, महिलांनी एका दिवसात ६ चमचे किंवा २५ ग्रॅम किंवा १०० कॅलरी आणि पुरुषांनी ९ चमचे साखर घेणे योग्य आहे.

साखरेमुळे बालकांना होणारे नुकसान

पालक म्हणून मुलांना प्रोत्साहनादाखल चॉकलेट्स, मिठाई आदी देण्याची परंपरा आहे. लहानपणापासूनच मुलांना पोषण आहाराबाबत प्रोत्साहित करण्याची गरज आहे. साखरेच्या अतिग्रहणाने मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. सोबतच वय वाढताना मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या दीर्घकालीन आजाराचा धोका असतोच. वजन वाढल्याने सांधेदुखी, गाऊट आणि फॅटी लिव्हरची समस्याही फोफावू शकते. त्यामुळे मुलांच्या आहारात पोषणाला प्राधान्य द्यावे.

फ्री शुगर्स काय आहे

खाद्यान्न किंवा ड्रिंकमध्ये नंतर मिसळण्यात येणाऱ्या साखरेला फ्री शुगर म्हणतात. यात बिस्किट, चॉकलेट, सुगंधित दही, न्याहारी, सॉफ्ट ड्रिंक्सचा समावेश होतो. मध, सिरपमध्ये असलेल्या साखरेलाही फ्री शुगर म्हटले जाते. दूध आणि फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेचा यात समावेश होत नाही.

दात खराब होण्याचा साखरेशी काय संबंध

दात खराब होण्याचे प्रमुख कारण साखरच आहे. फ्री शुगरवाल्या खाद्यसामग्रीचे प्रमाण कमी केल्यास दाताच्या आरोग्यातील बदल स्पष्टपणे दिसून येईल. मिठाई, चॉकलेट, केक, बिस्किट, जेम, मध यामुळेसुद्धा दात खराब होतात. फळ आणि भाज्यांमुळे दात खराब होत नाहीत.

हे गरजेचे नाही की मधुमेहींनीच साखर टाळावी. सर्वसामान्यांनीही आहारातील साखरेचे प्रमाण कमी केल्यास भरपूर फायदे आहेत. यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही कमी होते. भूक वाढण्यास आणि अन्य काही खाण्याची इच्छाही यामुळे वाढते. साखरेचे प्रमाण कमी केल्यास ऊर्जा वाढते आणि मानसिक सजगता वृद्धिंगत होते. दाताचे आरोग्यही यामुळे चांगले राहते. साखरेचे अतिप्रमाण विषासारखेच आहे. त्यामुळे साखर टाळणेच योग्य ठरेल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा 👉

NatureHealing center - +919619371711










19/11/2022

ड्राय स्किनचा दोष फक्त थंडीला देऊ नका….

त्वचा कोरडी होणे ही समस्या फक्त हिवाळ्यातच होते, थंडीमुळेच होते असं नाही. खाण्यापिण्यात, रोजच्या सवयीत आपल्याकडून होणाऱ्या चुकाच आपल्या त्वचेसाठी ठरतात घातक.भिन्न प्रकृतीचे , विरुध्द समजले जाणारे पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्वचा कोरडी होते.
गरम तापमानात दीर्घकाळ काम करणं त्वचा कोरडी पडण्यास कारणीभूत् ठरतं.
अति व्यायामाची सवय त्वचेसाठी घातकच!
त्वचा कोरडी पडणे याचा सहजसंबंध आपण हिवाळ्याशी, हवेतल्या कोरडेपणाशी, फेसवाॅश किंवा साबणातील रासायनिक घटकांशी जोडतो. पण त्वचा कोरडी केवळ याच कारणांमुळे होत नाही. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, दैनंदिन दिनचर्येतल्या सवयी आणि त्यातील चुका यामुळे देखील त्वचा कोरडी पडते. आणि आपल्या सवयीतल्या चुका जर आपण समजून घेऊन त्या बदलल्या नाहीतर् कोणतेही उपाय करा त्वचा कोरडी पडण्याची समस्या केवळ हिवाळ्यातच नाही तर इतर ऋतूतही कायम राहिल.

त्वचा कोरडी पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या चुका

1. खाण्या पिण्याच्या आवडीतून काही चुका अशा घडतात की ज्या थेट त्वचेवर वाईट परिणाम करतात. दोन भिन्न स्वभावाचे पदार्थ एकत्र खाणे ही सर्वात मोठी चूक. भिन्न स्वभावाचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात जी रासायनिक क्रिया घडते यामुळे शरीराच्या आत बाष्पीकरणाची प्रक्रिया वाढते. यामुळे शरीरातील आतील पाणी कमी होतं, शरीर आतून बाहेरुन कोरडं पडतं. त्याचा परिणाम म्हणजे त्वचा कोरडी होते.

2. थंडीत काय इतर ऋतुतही अनेकजण पाणी पिण्याच्या योग्य प्रमाणाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे शरीरात पाणी कमी जातं. बाहेरची हवा कोरडी असेल, थंड असेल तर त्वचेतला ओलसरपणा शोषून घेतला जातो. जर पुरेसं पाणी पिऊन शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखलं गेलं तर त्वचेतला ओलावा टिकून राहातो. त्वचा मऊ राहाते, त्वचेवर चमक दिसते. पण पाणीच कमी पिलं तर त्वचा कोरडी पडते.

3.थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागतो. गरमागरम सॅण्डविच, वडापाव, समोसा यासोबत थंडं पेयं पिल्यानं त्वचेतला कोरडेपणा वाढतो आणि वयाचा प्रभाव चटकन त्वचेवर दिसतो.

4. प्रत्येकाला आपली पचन प्रकृती माहिती असते. जड पदार्थ पचत नाही हे माहिती असूनही मध, मुळे, मांसाहारी पदार्थ जास्त खाण्याच्या सवयीमुळे पचन व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो त्याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा कोरडी पडते.

5. दूध आणि सोबत पराठे खाणं, दुधासोबत चिवडा, भेळ, मीठ असलेली बिस्किटं खाणं, दुधासोबत वेफर्स खाणं या सवयींमुळे त्वचा कोरडी पडते.

6. आपण कुठे काम करतो, कोणत्या वातावरणात जास्त राहातो याचाही परिणाम त्वचेवर होतो. जर आपण कोणतीही काळजी न घेता उन्हात जास्त वेळ फिरत अस्, काम करत असू किंवा जिथे तापमान जास्त आहे अशा गरम ठिकाणी दीर्घकाळ काम करत असल्यास त्वचेतील पाणी बाहेर पडतं. अशा परिस्थितीत त्वचा मऊ, ओलसर राहाण्यासाठी आपण माॅश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं, पुरेसं पाणी पिणं, सनकोट आणि स्कार्फ न घालणं या सवयींमुळे त्वचेतला कोरडेपणा आणखीनच वाढतो.

7. प्रमाणापेक्षा अति व्यायाम केल्याने शरीरातील पाणी कमी होतं आणि त्वचेचा कोरडेपणा वाढतो.

8. खूप अंगमेहनतीचं काम केल्यानंतर शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी अनेकजणांना गरम पाण्यानं आंघोळ करण्याची सवय असते. ही सवय त्वचेसाठी घातक असते. कारण शारीरिक श्रमानं आधीच खूप घाम येऊन शरीरातील पाणी बाहेर पडलेलं असतं. त्यातच जर गर्म पाण्यानं आंघोळ केली तर त्वचा आणखी कोरडी होते. ही सवय जर सोडायची नसेल तर किमान आंघोळ झाल्यावर पाच मिनिटाच्या आत शरीराला माॅश्चरायझर लावायला हवं. किंवा आंघोळीच्या आधी तिळाच्या तेलानं अंगाचा मसाज करुन मग गरम पाण्यानं आंघोळ करावी.

कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसमास्क (Face Masks For Dry Skin)
मिल्की वे फेस मास्क (Milky Way Face Mask)
दूधातील मॉईश्चरायजिंग घटकांचा फायदा घ्या. दूधामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स, व्हिटॅमीन बी, प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात. या मास्कसाठी 7 ते 8 भिजवलेले बदामाचा वापर करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर वाटलेले बदाम 3 चमचा कच्च्या दूधात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हे आठवड्यातून तीनदा केल्यास त्वचा मऊ आणि मुलायम होते.

2. कमालीचं केळं (Banana Face Mask)
केळ + ऑलिव्ह ऑईल + मध = सुंदर त्वचा! या होममेड फेशियलसाठी केळं कुस्करून त्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि किंचित मध घाला. केळ हे तुमच्या त्वचेला मॉईश्चराईज करतं आणि मध ते मॉईश्चर लॉक करतं. आठवड्यातून दोनदा तुमच्या चेहऱ्यावर वापरल्यास त्वचेवर जणू जादूच होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा 👉

NatureHealing center - +919619371711










तेल के गुण :आयुर्वेद के अनुसार तेल सामान्य रूप से मधुर व अनुरस में कषाय होता है. इसका स्वभाव गर्म होता है. यह पहले शरीर ...
13/10/2022

तेल के गुण :
आयुर्वेद के अनुसार तेल सामान्य रूप से मधुर व अनुरस में कषाय होता है. इसका स्वभाव गर्म होता है. यह पहले शरीर में फैलता है फिर बाद में पचता है.

आयुर्वेद के अनुसार तेल में एक विशेष गुण यह भी पाया जाता है कि यह जहाँ दुबले व्यक्ति का दुबलापन दूर करता है, वहीं मोटे व्यक्ति का मोटापन भी दूर करता है। व्यवायी होने से तेल स्रोतों में बहुत जल्दी प्रवेश कर जाता है। कमजोर व्यक्ति के स्रोत संकुचित होते हैं और तेल अपने लेखन एवं तीक्ष्ण (तीखापन) आदि गुणों से स्रोतों को तुरन्त खोल देता है। इससे स्रोतों की सिकुड़न समाप्त होने से एक ओर शरीर पुष्ट हो जाता है और पतलेपन की समस्या दूर हो जाती है.

दूसरी ओर सूक्ष्म होने के कारण मोटे व्यक्ति के स्रोतों में भी पहुंच कर चर्बी कम करता है, जिससे मोटापा घट जाता है। आधुनिक दृष्टि से भी देखें तो तेल में अनसैचुरेटेड फैटी एसिड (असंतृप्त वसाम्ल) पाया जाता है. जो मोटापे एवं उससे होने वाले रोगों जैसे कि डायबिटीज, , हृदय-रोग आदि में हानिकारक नहीं माना जाता है।

इसी तरह तेल ग्राही अर्थात् मल बांधने और कब्ज दूर करने वाले, दोनों ही गुणों से युक्त माना गया है; क्योंकि यह मल (पुरीष) को बाँधता है और स्खलित मल को बाहर निकाल देता है।

“एक वर्ष के बाद घी की पौष्टिकता कम हो जाती है, परन्तु तेल जितना पुराना होता है, उतना ही अधिक गुणकारी बन जाता है।”

तेल के फायदे
आयुर्वेद में तेल के अनेकों फायदों के बारे में बताया गया है. आइये कुछ प्रमुख फायदों के बारे में विस्तार से जानते हैं.

मांसपेशियों स्थिर और मजबूत होती हैं
तेल की मालिश करने से शरीर की मांसपेशियों और हड्डियों को मजबूती मिलती है. यही कारण है कि नवजात शिशु की रोजाना मालिश करने की सलाह दी जाती है. व्यस्क लोगों को भी रोजाना तेल से शरीर की मालिश करनी चाहिए. इससे जोड़ों का दर्द दूर होता है, शरीर लचीला और मजबूत बनता है.

बुद्धि तेज करती है
आयुर्वेद के अनुसार तेल में ऐसे गुण होते हैं जो आपकी मानसिक क्षमता और बुद्धि को तेज करती है. तेलों में मौजूद अनसैचुरेटेड फैटी एसिड मस्तिष्क की कार्यक्षमता बढ़ाते हैं.

पाचन शक्ति बढ़ाती है
पाचन शक्ति कमजोर होने से कई तरह की बीमारियाँ होने लगती हैं. तेल का सेवन करने से पाचन शक्ति बढ़ती है और पेट से जुड़ीं कई समस्याओं से बचाव होता है.

शरीर पर तेल की मालिश करने के फायदे
आयुर्वेद में शरीर पर तेल की मालिश करने के कई फायदे बताए गए हैं. आइये उनमें से कुछ प्रमुख फायदों के बारे में जानते हैं.

• शरीर की थकान मिटाता है
• बुढ़ापे के लक्षणों को दूर करता है.
• वात का प्रकोप कम होता है.
• आंखों की रोशनी बढ़ती है.
• त्वचा में निखार आता है.
• सिरदर्द दूर करता है.
• गंजेपन को कम करता है.
• बालों को झड़ने से रोकता है.
लोग इस बात को लेकर काफी दुविधा में रहते हैं कि कौन सा तेल मालिश के लिए अच्छा होता है और कौन सा तेल खाने के लिए इस्तेमाल करना चाहिए. दरअसल जो तेल जिस पदार्थ से निकाला गया है, उसमें उसी पदार्थ के गुण पाये जाते हैं। मुख्यतः तिल, सरसों, नारियल, अलसी के तेलों का प्रयोग किया जाता है। इन तेलों के गुणों का संक्षेप में वर्णन इस प्रकार है :

तिल का तेल

तेलों में तिल का तेल सबसे अच्छा माना जाता है। इसका प्रयोग मालिश करने और खाने के लिए दोनों तरह से किया जाता है. इसका स्वाद तीखा होता है और इसमें शरीर में तुरन्त फैलने वाले गुण होते हैं।

तिल के तेल के फायदे
तिल का तेल अपने फायदों की वजह से ही सबसे उत्तम माना गया है. तिल के तेल के प्रमुख फायदों की सूची निम्न है।

• मल को बाँधने वाला
• शक्ति बढ़ाता है
• शरीर में हल्कापन लाता है.
• गर्भाशय को शुद्ध करता है.
• प्रमेह ( मूत्र से संबंधित रोगों) में फायदेमंद
• योनि रोगों से राहत दिलाता है.
• सिर और कान के दर्द से आराम
तिल का तेल खाने से यह त्वचा, बालों और आंखों के लिए उतना फायदेमंद नहीं होता है जितना इसकी मालिश करने से फायदा मिलता है. चोट, मोच, घाव, जले हुए अंग और हड्डी टूटने आदि में भी यह उपयोगी है। खाने और मालिश के अलावा तिल के तेल का उपयोग नस्य (नाक में डालने की प्रक्रिया), सिकाई और कान में डालने में किया जाता है.
भोजन बनाने में भी इसका उपयोग होता है। इसकी एक विशेषता है कि स्निग्ध होते हुए भी यह कफ को नहीं बढ़ाता तथा मालिश करने से पित्त को शान्त करता है।

सरसों का तेल
अपने देश में खाना पकाने और मालिश के लिए सबसे ज्यादा सरसों के तेल का ही उपयोग किया जाता है. यह स्वाद में कडवा होता है और इसकी तासीर गर्म होती है. सरसों के तेल के भी अनगिनत फायदे हैं. यह चकत्ते आदि चर्म रोगों, सिर और कान के रोगों तथा पेट के कीड़ों को नष्ट करने वाला है। प्लीहा (Spleen) की वृद्धि में सरसों के तेल का उपयोग करना उत्तम माना गया है।

मूंगफली का तेल
मूंगफली का तेल भारी, चिकनाई युक्त और गर्म तासीर वाला होता है. यह कफ वात के कुप्रभाव को कम करता है और पित्त को बढ़ाता है. त्वचा पर इसकी मालिश करने से चिकनाई की अपेक्षा रूखापन आता है। आजकल भोजन को पकाने में इसका बहुत उपयोग किया जाता है।

नारियल का तेल
नारियल के तेल का इस्तेमाल खाना पकाने के साथ साथ मालिश और बालों में लगाने के लिए भी किया जाता है. इसकी तासीर ठंडी होती है. बालों के लिए यह सबसे अच्छा तेल माना जाता है. यह बालों को मजबूत और घना बनाता है और उन्हें झड़ने से रोकता है. गर्मी में सिर में लगाने से यह शीतलता देता है
दक्षिण भारत में भोजन को पकाने और घी के स्थान पर प्रायः इसका प्रयोग किया जाता है।

अलसी का तेल
अलसी का तेल मधुर-अम्ल, स्वाद में कसैला होता है. इसकी तासीर गर्म होती है. यह वात के प्रभाव को कम करता है और त्वचा के रोगों को उत्पन्न करने वाला होता है.

13/10/2022

Address

2/11 Vidhyadhar, Near Vitthal Temple, GaonDevi Road
Mumbai
400078

Opening Hours

Monday 9:30am - 9pm
Tuesday 9:30am - 9pm
Wednesday 9:30am - 9pm
Thursday 9:30am - 9pm
Friday 9:30am - 9pm
Saturday 9:30am - 9pm
Sunday 9:30am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NatureHealing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category