Positive think lecture

Positive think lecture Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Positive think lecture, Mental Health Service, Mumbai.

शब्द शिक्षक
24/04/2023

शब्द शिक्षक

#जागतिकपुस्तकदिन

05/10/2022
04/01/2022
15/10/2021

दसरा-
रात्रंदिन आम्हांसी युद्धाचा प्रसंग

Positve thought
संतोष पवार

आजचा दिवस म्हणजे विजयाच प्रतीक म्हणून दसरा उत्सव प्रतिवर्षी परंपरागत भारतीय संस्कृतीत भारतीय मन साजरा करीत आला आहे...

वाईट प्रवृत्तीवर सदप्रवृत्ती ने मिळवलेला प्रेरणा दिवस म्हणून दसरा साजरा करण्याची प्रथा आहे...

आजच श्री राम यांनी सर्व शक्तिमान सर्व ज्ञानी रावणाचा वनवास काळात कोणतेही साधन बळ जवळ नसताना आदर्श वर्तनाने सर्वाना आपलंसं करून वानररुपी मनुष्यबळ जमवून रावणरूपी अहंकारी कुप्रवृत्तीचा वध केला....

रावण मुळात महाज्ञानि आणि महादेवाचे महाभक्त असुनही केवळ अहंकारी आणि लालसी पणामुळे दुर्गुण,अप प्रवृत्ती चे example म्हणून नेहमी पिढी दर पिढी जगासमोर नकारात्मकतेचा प्रतीक म्हणून ओळखला गेला..दहन केला गेला

मुळात परंपरागत हे example मानव समाजपुढे ठेवण्यामागे कारण म्हणजे
प्रत्येक माणसात देखील दोन प्रवृत्ती या 365 दिन 24 तास जिवंत असतात..

1)सात्विक सदप्रवृत्ती
2) दांभिक कुप्रवृत्ती

ज्ञानेश्वरांनी पसायदान मध्ये म्हटलंय
"जे खळांची व्यंकटी सांडो'
"तया सत्कार्मी रती वाढो,

म्हणजे जयांच्या अंतर्मनात खळ प्रवृत्ती आहे त्यांच्या ठायी सत्कर्माची रती म्हणजे आवड निर्माण होवोत..

म्हणून संतांनी पुढे असंही म्हटलंय
"रात्रंदिन आम्हांसी युद्धाचा प्रसंग"..

तो युद्धाचा प्रसंग हाच आपल्या मधील दुर्गुण-वाईट प्रवृत्तीशी, negetivity, नकारात्मक विचारानंबरोबर positive विचारांचा सद्गुणांचा सकारात्मक संघर्ष
आणि सकारात्मकतेने आपल्या अंतर्मनातील नाकारात्मकतेवर मिळवलेला विजय..
कारण आपलं मन चंचल सैराट आहे क्षणात कित्येक चांगल्या वाईट विचारांच्या प्रभावाखाली कुठे कुठे फिरतो..
म्हणून संतांनी त्याला
"मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर"
"किती हाकला हाकला येत फेर धरूनिया"
असं म्हटलंय...

म्हणूनच हे मन क्षणात कधी शंकर तर कधी भयंकर होतो...
कधी सात्विक राम असतो तर कधी अहंकारी रावण
अस दोन प्रकारच्या वृत्ती/प्रवृत्ती धारण करून मानवी शरीर जीवन जगत असतो..
म्हणून
रात्रंदिन अहंकार राग द्वेष लोभ मोह मद मत्सर या तामसी रावणासोबत प्रेम ,नम्रता, क्षमा,सद्भाव रुपी रामाच रात्रंदिन युद्ध चालू असत...

या युद्धात सकारात्मकता जिंकते तेंव्हा आदर्श व्यक्तिमत्व नावारूपाला येते..
आणि नकारात्मकता जिंकते तेंव्हा..
राक्षसी स्वार्थी प्रवृत्ती पाहायला मिळते..

म्हणून रोजच दसरा रोजच दिवाळी उत्सवसण सम आनंदी परिस्थिती जीवनात कायम राहण्यासाठी..
रोजच्या सकारात्मक/नकारात्मक युद्धाच्या परिस्थितीला कायमचा stay देण्यासाठी
अस्थिर आत्ममनाला स्थीरते सोबत बांधून ठेवण क्रमप्राप्त..

अस्थिर आत्मा आहे..
तर स्थिर निराकार परमात्माही आहे..

संतांनी रात्रंदिन आम्हांसी युद्धाचा प्रसंग म्हणताना ..
बुरा जो देखन मै चला
मुझसे बुरा ना कोय
असं म्हणण्या मागचं कारण देखील समजून घेणं गरजेचं आहे..

मन वढाय वढाय किंवा
बुरा जो देखन मै चला...
इथून मीपणा या रावणाचा दसरा दहन होऊन
अंतर्मनाचा आध्यत्मिक शोध प्रवास सुरु होतो..

तो प्रवास खरा राम अयोध्या जीवनात आल्यावर थांबतो
आणि तिथून जीवनात दिवाळी उत्सव घडतो तो
पुढील संत वचनाप्रमाणे
आता आम्हा रोजच दसरा रोजच दिवाळी

Be Positive

शुभ दसरा 😊😊

22/08/2021

Love you jhindagi

29/10/2020

*मनाची उभारी same like रॉकेट launching... मनाचे launching*....
*Never say impossible ...* to separate yourself from the impossible and say it boldly .. yes nothing is impossible for me always *i' am possible*

*मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची*
*तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची*

दीपावलीच्या चाहुलीने ...गतकाळातील काही आठवणी जाग्या झाल्या.. आणि
काही वर्षांनपूर्वीचा एक प्रसंग आठवला दीपावली साठी सलग लावण्याकरिता 20/22 कंदील सर्व मित्र मंडळी त्यावेळी दरवर्षी नित्य नेमाने बनवीत असू..एक आवड आणि छंदच होऊन गेला होता त्यातील मेन मोठा कंदील नित्यनेमाने आमचा मित्र संजय बनवी आणि लाईनीत सलग लावायचे कंदील ची जवाबदारी हौसेने आणि पुढाकाराने मीच घेत असे.. माहीत नाही पण एक वेगळा आनंद आणि विरंगुळा मिळे त्यातून ...म्हणून बरीच वर्षे नित्यनेमाने हे होत असे... ते दिवस आठवले की आजच्या मोबाईल मध्ये वेळ घालवण्यात जाणाऱ्या वेळेपेक्षा ती सर्व मित्र मंडळी मिळून बनवलेले कंदील आणि धमाल हसी मजाक त्यात घालवलेला वेळ काहि औरच...

असो आठवणींच्या हिंदोळ्यावर शब्दांना धुमारे फुटावे आणि शब्द शब्द वाढत जात आहेत..
आणि मूळ विषय लांब जातोय.. म्हणून त्या प्रसंगाकडे अनुषंगाने मुळ मुद्द्याकडे परत येतो..

त्या वेळी दुपारच्या वेळेत ज्यांना वेळ मिळे ते आम्ही सर्व मित्र एकत्र येऊन जमेल तसं दिवाळीच्या दहा बारा दिवस अगोदर कंदील बनवायला सुरुवात करीत असू..
कोणाच्या शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा झालेल्या असत तर काहींच्या चालू असत.. परीक्षा चालू असूनही मित्र परिवार एकत्र आहे.. म्हणून त्यातूनही अभ्यास सोडून टिंगलटवाळी साठी हजर राहणारी टाळकी बिनधोक चालू परिक्षेतूनही टिंगलटवाळी साठी हजर रहायची हे विशेष उल्लेखनीय..

त्यावेळी एक मित्र बारावीला होता.. त्याच्या घरातील वातावरण सुशिक्षित आणि शिक्षणाला पूरक
त्याला नक्की काय प्रॉब्लेम होता हे मला आजही माहीत नाही.. ना त्यावेळी माझ्याकडून त्याला त्या बाबत विचारलं गेलं होत.

कंदील साठी कटिंग करीत असताना अचानक तो आला बारावीची परीक्षा चालू होती..थोडा वेळ शांत बसला.. अचानक माझ्यात कोणता सल्लागार त्याला दिसला कोण जाणे किंवा कदाचित त्याला तसा विश्वास असावा पण प्रामाणिकपणे त्याने मला म्हटलं ऐक ना. अरे काही केल्या अभ्यासात consontration होत नाही.. बरेच प्रयत्न केले.. नाही होत...काय करायला पाहिजे सांग ना?

Actually त्यावेळी मला त्याला त्याबाबत intensionally cross question विचारणे क्रमप्राप्त होते.. त्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे... पण माझ्याकडून तस काही घडलं नाही...
त्याला कारण माझ कंदील बनवायचं काम चालू असणं असू शकत..ज्यामुळे हातातील काम सोडून intensionally त्याला सल्ला देणं माझ्याकडून झालं नसावं..
पण त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष पण केलं नव्हत..
त्याच्याकडे बघून
क्षणभरात माझ्याकडून मोजक्या शब्दात त्याला उत्तर दिलं गेलं.. हे बघ अनुभवातून सांगतो...अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.. एवढंच बोलून मी थांबलो आणि कंदील काम करीत राहिलो..
तो काहीवेळ तिथेच बसून राहिला अगदी स्तब्ध... आणि अचानक ऊठून गेला... अगदी फिनिक्स पक्षा प्रमाणे... त्यानंतर तो फार कमी वेळा हजर राहिला
मला वाटत त्यानंतर त्याने वळून पाहिलंच नाही..कारण त्याच्या मनाने उभारी घेतली होती.. मनाने फिनिक्स होऊन राखेतून अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा जणू हा कानमंत्र घेऊनच उच्च शिक्षण graduation आणि तत्सम आणखी प्रगत उच्च शिक्षण घेतलं...आणि वयक्तिक आयुष्यात स्थिर स्थावर आहे तो...

इथे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो त्याच्या मनाने घेतलेल्या उभारीचा..माध्यम काहीही असो सहज बोलले गेलेले शब्द असो अथवा ईतर काही.. पण क्षणात त्याच्या मनावर त्याने खोल रुजवलेले शब्द आणि निश्चय निर्धार आणि तदनंतर त्याने न थांबता घेतलेली नियमित अपार मेहनत..
त्याला दिशा देऊन गेली...

*एक सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलून टाकत*
अन *अनेको नकारात्मक विचार तुमच्या मानगुटीवर बसून तुम्हाला खेचत खेचत रसातळाला नेतात*

तर मित्रानो..आपल्या आयुष्यात देखील चढ, उतार कठीण काळ प्रसंग येणार आज नाही तर उद्या

पण जैसी भी हो परिस्थिती एक सरीखी रहे मनःस्थिती.. मनासारखं घडत नाही म्हणून अनेकवेळा अनेको तरुण नैराश्यातून व्यसनाधीन होऊन आयुष्याचा मार्गच विसरतात..

आशा निराश परिस्थतीशी दोन हात करून हारलेल्या मित्राला आवर्जून सांगू इच्छितो...

दोस्ता never give up... *गरज आहे फक्त मनाला उभारी देण्याची... दिशा आपोआप सापडेल .* .दिशा सापडली तर दशा सुधारायला कितीसा वेळ जाणार रे..
या क्षणी तुला इतकंच सांगेन
*ध्येय भल्या कामाचा जो घेउनि निघाला*
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची

होय मित्रा ऊठ आणि नैराश्यातून बाहेर निघून तू चालायला तर सुरवात कर..
सुरवातीला बरेच मान-अपमानाचे काटे तुला रक्त बंबाळं करतील..तुला मागेही खेचतील पण गड्या
रात्रीनंतर दिवस उजडणारा असतोच रात्रीच्या गर्भात उद्याचा उषकाल असतो.. त्याचप्रमाणे अनेको मानापमान.. संकटसमयानंत प्रामाणिक नित्य प्रयत्नांना यश हे येणारच... खात्री बाळग
आणि Go go go ahead

*जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई*
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

*मनोमार्गे गती.. आकळावा श्रीपती यशस्वितेचा*

*_संतोष पवार_*

19/02/2020

फोनची रिंग कंटीन्युअसली वाजत होती. समीक्षाच्या आईने तिला फोन घेण्यास सांगितले पण ती एका पुतळ्यासारखी शांत बसली होती जणु कोणताही आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता. आईने तिला जोरात हलवले आणि परत फोनबद्दल सांगितले. यावेळेस एखादे भयानक स्वप्न पाहिल्याप्रमाणे समीक्षा जोरात किंचाळली, ‘नाही घ्यायचा मला तो काॅल, फेकुन दे तो फोन दूर कुठेतरी’. आपले रडू दाबत आई दूर झाली. समीक्षा जोरजोरात हुंदके देत रडायला लागली. मधुनच ‘पिल्लू परत ये ग, मम्मा तुझी खूप काळजी घेईल’ असे म्हणायची.

चाळीशीची समीक्षा एक व्यावसायिक होती. लग्नाआधी डी फार्मसी केले होते तिने. नंतर मुलं थोडी मोठी झाल्यावर न्यूट्रिशियनची पदविका घेतली. डी फार्मा आणि या नवीन पदविकेची सांगड घालून तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. विविध प्रकारच्या न्यूट्रिशियस पावडर जसे सुदृढ शरीरयष्टीसाठी प्रोटीन पावडर, स्मरणशक्तीसाठी च्यवनप्राश वगैरे. तंदुरुस्त राहण्याचे लोण सर्वत्र सारखेच पसरले आहे तर बघता बघता तिच्या धंदयाचा पसारा वाढत गेला. आधी लेकाला, लेकीला चारीठाव जेवण बनवुन खायला घालणारी समीक्षा सकाळीच संध्याकाळचे जेवणही बनवुन ठेवू लागली. वरच्या कामाला बाई लावली. घरी सासूबाई होत्याच कमीजास्त पाहायला म्हणून काही चिंता नव्हती.

वर्षामागुन वर्षे सरली. छोटी पिंकी आता नववीत गेली होती. आई बिजनेसमुळे नेहमी फोनवर व्यस्त राहायची. वडील त्यांच्या आॅफिसच्या कामात तर दादा M.B.B.S. करायला दूर गेला होता. राहता राहिली आजी, तिच्याशी काय आणि किती बोलणार. पिंकीची घरात घुसमट होवू लागली. आईने सकाळी बनवलेलं जेवण तिला दुपारी जेवावस वाटत नव्हते. आजीला सांगावं तर ती बिचारी वार्धक्याने थकलेली. तिने आईला सांगायचा प्रयत्न केला, समीक्षाने हातावर पैसे ठेवले आणि सांगितले, ‘जा, जे आवडते ते ओर्डर कर.’ पिंकी निघून गेली तिथुन. तिचा उदास चेहरा पाहून आजीने तिला प्रेमाने विचारले, ‘पिंकू काय झाले बाळ, अशी काय बसली?’ पिंकीने सांगितले, ‘आजी मला जेवण गोड लागत नाही ग, सारखा थकवा येतो, मांला सांगितले तर ती मनावर घेत नाही.’ ‘हे बघ बाळा, तुझी आई जे काय करतेय ते तुमच्यासाठीच करते, तुझं, दादाचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून कष्ट घेतेय, दादा आता डाॅक्टर होईल, तुपण शिकून काहीतरी होशील. या सगळ्यासाठी पैसे लागतात राणी. आणि उदया आपण दोघे डाॅक्टरकडे जावू, पाहू काय म्हणतात ते.’

दुसऱ्या दिवशी आजी पिंकीला दवाखान्यात घेवूनगेल्या. तिचा निस्तेज चेहरा आणि इतर लक्षण पाहून डाॅक्टरांनी ब्लडटेस्ट करायला सांगितली. संध्याकाळी रिपोर्ट पाहून त्यांनी समीक्षाला बोलावले आणि सांगितले की मुलीला कावीळ झाली असून लगेच अॅडमिट करायची गरज आहे. पिंकीला अॅडमिट केले गेले. समिक्षा आणि तिचे मिस्टर आळीपाळीने मुलीजवळ बसायचे. मिस्टर आले की समीक्षा घरी जावून जेवण बनवून घेवून यायची. पिंकीला भरवायची. पण भरवतानाही कानाला फोन लावून आॅर्डर घेत असायची. ते दृश्य हळव्या मनाच्या किशोरवयीन पोरीच्या मनावर आघात करुन जात होते. बरे वाटल्यावर पिंकीला डिस्चार्ज मिळाला. ती घरी आली पण पुर्णपणे बदलून. आता ती कोणाशीच अगदी आजीसोबत पण जास्त बोलत नव्हती. कसली तक्रार करत नसे. भूक लागली तर कधी घरचे कधी बाहेरचे खाणे, चुपचाप आपल्या खोलीत गाणी ऐकत पडुन राहणे इतकेच करायची.

पाहता पाहता ते वर्ष संपले. पिंकी दहावीत गेली यावर्षी. सगळी मरगळ झटकुन अभ्यासाला लागली. बाकीचे सगळे आणि सगळं अजुन तसेच होते. आता परत ती अधुनमधून आजारी पडू लागली. कोणाला काही सांगणे बंद केले होते तिने. ताप आला घेतली क्रोसीन, खोकला आला बेनेड्रिल घेतला असं सुरू झाले. समीक्षाला तर काही माहितच नव्हते. झोपलेल्या पिंकीकडे पाहून समीक्षा एकच विचार करायची, ‘माझ्या पिल्लूला शिकवून खूप मोठी करायच आहे, तिचे चांगले भविष्य घडवायचे आहे.’ पण या सगळ्यात मुलीच्या मनाची ओढाताण तिला दिसत नव्हती.

एकेदिवशी रूममध्ये गाणे ऐकत बसलेली पिंकी अचानक धाडकन खुर्चीवरून खाली पडली. आवाज ऐकून समीक्षा धावत आली. पाहते तर काय पोरगी हालचाल न करता जमिनीवर पडुन होती. लगेच तिला हाॅस्पिटलला नेण्यात आले. वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारांना पिंकी अजिबात प्रतिसाद देत नव्हती. दोन दिवसांनी ती शुद्धीवर आली. आईला जवळ पाहून तिला आनंद झाला. आईला पाहून पिंकी खोल गेलेल्या आवाजात बोलली, ‘मां, लग जा गले की फिर ये हँसी रात हो ना हों, शायद फिर इस जनममें मुलाक़ात हों ना हों’। पिंकीचे आवडते गाणे हे. समीक्षा हसून बोलली, गप नौटंकी, पण कुठेतरी तिच्या मनात खोलवर धोक्याची घंटा वाजली. हाॅस्पिटलमध्ये पिंकीच्या खूप टेस्ट झाल्या, ब्लडटेस्टपासून ते बोनमॅरोपर्यंत. दुर्दैवाने प्रत्येक टेस्टमध्ये काही ना काही निगेटिव निघतच गेले. डाॅक्टर सांगायला लागले, शरीरात खोलवर मुरलेले दुखणे आहे हे, लहानसहान आजारावर मनाने औषध घेवून शरीर आतून पुर्णपणे कमजोर झाले आहे आणि त्यातून मुलीची इच्छाच नाही बरे होण्याची. आता समीक्षाच्या पायाखालची वाळू सरकली. ती सतत मुलीच्या सोबत राहू लागली, तिला धीर देवू लागली. पण पिंकी शून्य नजरेने पाहत राहायची फक्त.

आजी पिंकीला भेटायला आली. तिला पाहून पिंकीच्या डोळ्यात थोडी चमक आली. हळूच आजीच्या कानात ती बोलली, ‘आजी आता बघ आई कशी माझ्याजवळ बसली आहे!’ आजीला त्याक्षणी दुखण्याचे मूळ सापडले. त्याच रात्री पिंकी हे जग सोडुन निघून गेली.

समीक्षाला सासूबाईंनी पिंकीचे शेवटचे शब्द सांगितले तेव्हापासून तिने मोबाईलला हात नाही लावला. परतपरत ती हेच म्हणायची, ‘माझी पिल्लू तिचे दुखणं घेवून माझ्याकडे येत होती तेव्हा मी तिच्या भविष्यासाठी पैसे साठवत होते, मला हे का नाही कळलं ती असेल तरच तिचे भविष्य असेल.’

आपण सगळेच आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहतो, त्यासाठी कष्ट घेतो. पण मुलांना फक्त त्यांचा आज आनंदात जायला हवा असतो. आपले आईवडील आज आपल्यासोबत आहेत म्हणजे आपण त्यांच्यासाठी महत्वाचे आहोत असे त्यांना वाटते. नेहमी आॅफिसच्या, घरच्या कामात बुडालेले पालक पाहून मुलांना आपण दुर्लक्षित आहोत असे वाटू शकते. लक्षात ठेवा, पालक किती आणि कोणासाठी कमावतात याच्याशी मुलांना जास्त देणंघेणं नसतं infact ती कधी म्हणतही नाहीत आमच्यासाठी इतकं कमवा असं, हे तर आपण स्वतःलाच पटवुन देतो की मी हे मुलांसाठी करतो/करते. आपले करियर ही नक्कीच महत्वाचे आहे परंतु करियर आपण परत बनवू शकतो पण एकदा मुलांचे बालपण सरले की ते परत आणता येत नाही. So enjoy the phase of motherhood and parenthood when still there is time. आपण या जगात मुलांना आणले म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे त्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या काळजी घेणे, त्यांना क्वालिटी टाईम देणे. मुलांना समोर बसवून हजेरी घेतल्याच्या थाटात हं आज काय झाले शाळेत असे विचारणे म्हणजे काळजी नव्हे तर जेव्हा जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा तेव्हा उपलब्ध असावे. किशोरवयीन मुलं हा तर अजुन अवघड विषय. त्यांच्यावर हेलिकाॅप्टरसारखे घिरट्या घालणं किंवा पुर्ण स्वातंत्र्य देणे दोन्ही चुकीचे. समीक्षाने पिंकीच्या बाबतीत अक्षम्य चूक केली. दुरचे पाहण्याच्या नादात ती जवळचं पाहणे विसरूनच गेली. पण पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण सर्व बोध घेवू.

Be happy healthy nd positive
09/09/2018

Be happy healthy nd positive

29/07/2018

वळण

एक सुंदर, अर्थपूर्ण वाक्य माझ्या वाचनात आले. ‘A bend in the road is not the end of the road, unless you fail to take a turn.’ रस्त्यावरुन चालताना शेवट आल्यासारखा वाटतो पण तो शेवट नसतो. फक्त रस्ता वळलेला असतो, आणि ते वळण घेणे आवश्यक असते. हे एक छोटेसे वाक्य बरेच काही सांगून जाते असे मला वाटते.

रस्त्यावरील वळण ही वाक्याची सुरवात आहे. जीवनाचा विचार केला तर असे दिसून येते की जीवनाचे रस्ते सरळ नसतात. वळणे घेत घेतच आपल्याला पुढे पुढे जायचे असते. ही वळणे म्हणजे जीवनातील अडचणी होय. या अडचणींकडे तुम्ही कसे बघता यावर तुमचे यश अपयश अवलंबून आहे. संकटे व अडचणी तुम्हाला त्रास करण्यासाठी येत नाहीत, तर तुम्हाला शहाणपण यावे यासाठी येतात. अनेक महान लोकांनी मोठ्या अडचणींवर मात करून मोठे यश मिळविले आहे.

आदित्य बिर्ला हे महान उद्योगपती होते. त्यांनी मोठे मोठे कारखाने उभारले. त्यांच्या मंगलोर रिफायनरी या कारखान्याबद्दल एक कटू सत्य आहे. या कारखान्याला परवानगी मिळण्यासाठी किती काळ लागला असेल? दोन चार महिने नव्हे, एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल अकरा वर्षे फक्त परवानगी मिळण्यासाठी लागली. आदित्य बिर्ला अकरा वर्षे एका मोठ्या वळणावरून प्रवास करीत होते.

दुसरे असे की, जीवनात कधीही नाउमेद होऊ नये. रस्ता संपल्यासारखा वाटतो, पण संपलेला नसतो. कोणत्याही गोष्टीचा शेवट हा शेवट नसतो. रस्त्यावरून वळण घेतले की पुढे जाता येते. पुढे अनेक संधी वाट पहात असतात. सूर्यास्त झाल्यावर रडत बसणाऱ्याला तारे दिसू शकत नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्योदय होणारच असतो. ‘आशा’ ही मनुष्य जीवनातील अतिशय सुंदर गोष्ट आहे. मनुष्य आशेवर जगत असतो.

एका व्यापाऱ्याला खूप तोटा झाला. तो जीवनात अतिशय निराश झाला. एका साधूकडे आला, म्हणाला, ‘महाराज माझे दिवस बदलले. काही राहिले नाही. मी काय करू?’. महाराज म्हणाले, ‘म्हणजे दिवस बदलतात हे तुला मान्य आहे.’ व्यापारी म्हणाला, ‘होय महाराज’. महाराज प्रेमाने हसले, म्हणाले, ‘अरे म्हणजे हे दिवस पण नक्कीच बदलणारच. जरा वळण संपू दे. त्यानंतर सरळ रस्ता येईल. मग मार तुझी गाडी सुसाट.’

तिसरी गोष्ट अशी की, वळण घेणे ही प्रक्रिया लटरल थिंकिंगशी (lateral thinking) संबंधित आहे. लटरल थिंकिंग म्हणजे वेगळा विचार करणे. एखादी समस्या सोडविताना आपण त्यावर विचार करतो. त्या विचाराला एक दिशा असते. त्याला आपण सरळ दिशा म्हणजेच longitudinal direction म्हणू. काही वेळा त्या दिशेने विचार समस्या करून सुटत नाही. आपण तेथेच अडकून बसतो. त्यासाठी वेगळ्या दिशेने म्हणजेच lateral direction ने विचार करावा लागतो. यालाच लटरल थिंकिंग म्हणतात. सरळ रस्त्यावरुन जाताना वळण घेतले नाही तर आपण तेथेच अडकून बसू. ज्याप्रमाणे रस्त्यावर दिशा बदलणे अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे समस्या सुटत नसेल तर विचारांची दिशा बदलणे आवश्यक आहे.

एकंदरीत काय, रस्त्यावरुन चालताना वळणाचा त्रास करून न घेता त्याच्याकडे सकारात्मक भावनेने पहिले पाहिजे. वळणावरून सायकल किंवा मोटारसायकल चालविताना काय होते? मस्तपैकी तिरकी होते, पण पडत मात्र अजिबात नाही. किती मजा आहे ना?

डॉ. आशिष गुरव
ME, PhD (Civil Engineering)
एम.ए. (मराठी), साहित्य भूषण (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)
मोटिव्हेशनल स्पीकर व लाईफ कोच

Address

Mumbai

Telephone

9702030490

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Positive think lecture posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram