Ayurvardhini-Preventive Care & Wellness

  • Home
  • Ayurvardhini-Preventive Care & Wellness

Ayurvardhini-Preventive Care & Wellness We offer personalized consultations and a range of holistic treatments to stay healthy and seek a permanent and effective cure against diseases.

अनुलोमन तेलअनेकांना सतत त्रास देत असलेली एक समस्या म्हणजे शौचास साफ न होणे, समाधानकारक रित्या न होणे. त्यासोबत मळाचा खडा...
10/04/2021

अनुलोमन तेल
अनेकांना सतत त्रास देत असलेली एक समस्या म्हणजे शौचास साफ न होणे, समाधानकारक रित्या न होणे. त्यासोबत मळाचा खडा होणे, शौचास कडक होणे, जोर करावा लागणे, गॅसेस होणे, पोट फुगल्यासारखं वाटणे इत्यादी सारखी विविध लक्षणे हि दृष्टीस पडतात. यातून पुढे शौचावाटे रक्त पडते, त्याजागी वेदना, दाह होतो, मूळव्याधीचा त्रास सुरु होतो. भगंदर, परिकार्तिक (Fistula, Fissure) होतात. इत्यादी विविध व्याधी होतात.
त्याचे विविध हेतु (व्याधी निर्मितीची कारणे) असतात. जसे कि आहारात रुक्ष, कोरडे, उष्ण पदार्थ अधिक असणे, ब्रेड, खारी, टोस्ट यासारखे बेकरीतील पदार्थ सेवन करणे, आहारातून तूप, तेल पूर्णतः वर्ज्य करणे, मांसाहार अधिक करणे इत्यादी.

यावर अतिशय उपयुक्त रामबाण असे औषधी आदरणीय कै. वैद्य. दातार शास्त्री यांनी अनुलोमन तेल हे पांचभौतिक चिकित्सा तत्त्वाचे आधारे बनविले आणि अनेकांची हि समस्या आणि त्यातून उत्पन्न व्याधी दुरुस्त केलेत.
तेच तेल वैद्य. वैभव सोनार हे देखील स्वतः बनवून त्यांच्या रुग्णांना समस्या व व्याधीच्या चिकित्सेसाठी देतात. हे खात्रीशीर, रामबाण आणि त्वरित लाभ देणारे तेल आहे. सोबत हेतु त्याग करणे आवश्यक आहे.

वानरी गुटीकाऔषधी गुणात्मक अधिक उपयुक्त होण्यासाठी, स्वस्त होण्यासाठी तसेच रुग्णांना सहजतेने उपलब्ध व्हावेत इत्यादी विविध...
07/04/2021

वानरी गुटीका
औषधी गुणात्मक अधिक उपयुक्त होण्यासाठी, स्वस्त होण्यासाठी तसेच रुग्णांना सहजतेने उपलब्ध व्हावेत इत्यादी विविध रीतीने रुग्ण हितासाठी आणि रुग्णाचा त्वरित व्याधीनाश होऊन स्वास्थ्य प्राप्त होण्यासाठी अनेक वैद्य स्वतः औषधी निर्मिती करतात. जी औषधी सहजरित्या बाजारात उपलब्ध होत नाहीत, अशी औषधी रुग्णहितासाठी वैद्य स्वतः बनवून देतात.
असे एक औषधी म्हणजे वानरी गुटीका, जे बाजारात सहजतेने उपलब्ध होत नाही.
वाजीकरण औषधींमध्ये परम वाजीकर असलेले, पुरुष व्यंध्यत्व, शुक्राशी निगडित विविध व्याधी (जसे s***m count कमी असणे, s***m motility कमी असणे वगैरे), शीघ्रपतन (early ej*******on), ध्वजभंग (erectile dysfunction) इत्यादी विविध व्याधींवर उपयुक्त अशी हि वानरी गुटीका बाजारात सहजतेने उपलब्ध नसल्याने एका व्यंध्यत्व असलेल्या रुग्णासाठी वैद्य. वैभव सोनार यांनी हे औषधं स्वतः तयार केले.

आदरणीय गुरुवर्य वैद्य. प्र. ता. जोशी नाना आज श्री धन्वंतरी चरणी लिन झालेत. श्री धन्वंतरी त्यांच्या आत्म्यास सदगती देवो 🙏...
29/03/2021

आदरणीय गुरुवर्य वैद्य. प्र. ता. जोशी नाना आज श्री धन्वंतरी चरणी लिन झालेत.

श्री धन्वंतरी त्यांच्या आत्म्यास सदगती देवो 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

*श्री सुकेशा तैलम् (Hair Oil) -*वायुप्रदूषण, आहारात खारट, आंबट, तिखट पदार्थ जास्त खाणे, पित्त प्रकृतीचे व्यक्ती, विविध उ...
27/01/2021

*श्री सुकेशा तैलम् (Hair Oil) -*
वायुप्रदूषण, आहारात खारट, आंबट, तिखट पदार्थ जास्त खाणे, पित्त प्रकृतीचे व्यक्ती, विविध उष्ण औषधी घेणे, हार्मोनल imbalance इत्यादी विविध कारणांनी शरीरातील व विशेषतः शिरःप्रदेशात उष्णता वाढते, तसेच इतर विविध कारणांनी केस गळणे, पिकणे यासारख्या केसांच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यासाठी वडाच्या पारंब्या, ज्येष्ठमध, आवळा, नागरमोथा, जास्वंद, कढीपत्ता, ब्राम्ही इत्यादी औषधींनी निर्मित *श्री सुकेशा तैलम्* अतिशय फायदेशीर आहे.

पथ्यपालनासोबत *श्री सुकेशा तैलम्* नियमित केसांच्या मुळाशी लावल्याने होणारे फायदे -
केस गळणे, केस पिकणे थांबते.
केसांची वाढ चांगली होते.

* केस धुण्यासाठी साबण, शाम्पू वापरू नयेत, त्याऐवजी शिकेकाई, त्रिफळा, नागरमोथा युक्त *Herbal Hair Wash* वापरावे.

*अधिक माहितीसाठी संपर्क -*
*वैद्य. वैभव सदाशिव सोनार*
एम्.डी. (आयुर्वेद)
*9822271678*

*श्री सुकांती लेप (फेस पॅक) -*चंदन, अनंतमूळ, मंजिष्ठा, रक्तचंदन, हळद, दारुहळद, वेखंड, लोध्र इत्यादी वर्ण सुधारणाऱ्या आणि...
21/01/2021

*श्री सुकांती लेप (फेस पॅक) -*
चंदन, अनंतमूळ, मंजिष्ठा, रक्तचंदन, हळद, दारुहळद, वेखंड, लोध्र इत्यादी वर्ण सुधारणाऱ्या आणि रक्तशुद्धी करणाऱ्या औषधी आणि मुलतानी माती यांपासून तज्ञ वैद्यांनी बनवलेला फेस पॅक म्हणजे *श्री सुकांती लेप*.
*श्री सुकांती लेप नियमित लावण्याचे फायदे -*
चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते.
सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त.
चेहऱ्याचा वर्ण सुधारतो.
चेहऱ्याची कांती (Glow) वाढते.
तारुण्यपिटिका (Acne) नष्ट होतात.
*Oily skin साठी -* पाण्यातून लेप लावल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा नाहीसा होतो.
*Dry skin साठी -* रुक्ष, कोरडी त्वचा असेलेल्यानी थोडं गायीचे तूप व दुधातून लेप लावावा.
* गुलाब जलातून लेप लावल्यास उष्णता कमी होते, मन प्रसन्न होते. मन शांत होऊन झोपही छान लागते. इत्यादी
*(लेप दिवसाच लावणे आणि वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुणे)*

*अधिक माहिती साठी संपर्क -*
*वैद्य. वैभव सदाशिव सोनार*
एम्.डी.(आयुर्वेद)
*9822271678*

*श्री च्यवनप्राश*ची पहिली बॅच आपण दिलेल्या प्रतिसादामुळे अल्पावधीतच संपली.आता दुसरी बॅच बनवून आपणासाठी उपलब्ध आहे. *अधिक...
19/01/2021

*श्री च्यवनप्राश*ची पहिली बॅच आपण दिलेल्या प्रतिसादामुळे अल्पावधीतच संपली.
आता दुसरी बॅच बनवून आपणासाठी उपलब्ध आहे.

*अधिक माहिती साठी संपर्क -*
*वैद्य. वैभव सदाशिव सोनार*
*9822271678*

*मकरसंक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास आरोग्यपूर्ण शुभेच्छा* 🙏🏻💐*- वैद्य. वैभव सदाशिव सोनार आणि आयुर्वर्धिनी परिवार*
14/01/2021

*मकरसंक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास आरोग्यपूर्ण शुभेच्छा* 🙏🏻💐
*- वैद्य. वैभव सदाशिव सोनार आणि आयुर्वर्धिनी परिवार*

*श्री च्यवनप्राश -*च्यवनप्राश आयुर्वेदातील एक श्रेष्ठ रसायन औषधी.आवळा, बेल, अग्निमंथ, श्योनाक, गोखरू, कंटकारी, बृहती, का...
09/01/2021

*श्री च्यवनप्राश -*
च्यवनप्राश आयुर्वेदातील एक श्रेष्ठ रसायन औषधी.
आवळा, बेल, अग्निमंथ, श्योनाक, गोखरू, कंटकारी, बृहती, काकनासा, वासा, अष्टवर्ग, वेलदोडा, दालचिनी, पिंपळी, नागकेशर इत्यादी विविध औषधींपासून तज्ञ वैद्यांद्वारे निर्मित औषधी म्हणजेच *श्री च्यवनप्राश*
*श्री च्यवनप्राशच्या सेवनाने होणारे फायदे -*
* रसरक्तादी सातही धातूंचे पोषण होऊन बल वाढते.
* रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढते.
* प्राणवह स्रोतसासाठी उत्तम रसायन. (श्वसन संस्थेच्या आजारांसाठी उत्तम औषधं आणि रसायन)
* वारंवार होणारी सर्दी, खोकला यात उपयुक्त.
* वजन वाढते, भूक वाढते.
* इतर विविध आजारांवर उपयुक्त.

*अधिक माहितीसाठी संपर्क -*
वैद्य.वैभव सदाशिव सोनार
9822271678

03/04/2020

*लॉकडाउन काळातील आपली दिनचर्या कशी असावी?*

लॉकडाउन काळात आपल्या हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करून घेणे आपल्या हातात आहे. कोणतीही सवय लागण्यासाठी २१ दिवस पुरेसे असतात. लॉकडाउनचा काळ हि २१ दिवसांचा आहे. तर याकाळात आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सवयी आत्मसात करून घेऊयात, कि ज्या सवयी आपल्याला भविष्यातहि आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील.
आता अनेकांकडे पूर्ण वेळ हा रिकामा आहे, काहीजण घरूनच काम करीत असल्याने त्यांनाही बराचसा वेळ स्वतः साठी मिळत आहे. तर चला आपण सर्वजण यावेळेचा सदुपयोग करून घेऊयात.
याकाळात आपली दिनचर्या (आपला दिनक्रम, दिवसाचे schedule) कशी असावी? कि जे आपलं आरोग्य टिकवून ठेवेल, ते आपण बघुयात.

* पहाटे ५-५.१५ वाजता उठावे.

* प्रातर्विधी आटोपून हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

* दंतधावन - नंतर दंतधावन करावे (दात घासावेत). त्यासाठी कडुनिंबाची काडी / दंतमंजन / त्रिफळा चूर्ण / कडू, तिखट, तुरट चवीच्या वनस्पतींचा वापर करावा.

* गंडुष - गंडुष म्हणजे गुळण्या करणे, जास्तीत वेळ तोंडात काढा / तेल / पाणी धरून ठेवणे होय. त्यासाठी कोमट पाणी / तीळ तेल / त्रिफळा, हळद, ज्येष्ठमध यांचा काढा वापरावा.
किंवा हळद टाकून पाणी उकळून चिमूटभर मीठ घालून त्याने गुळण्या कराव्यात.

* अंजन - मध किंवा एखादे अंजन डोळ्यात घालावे किंवा त्रिफळ्याच्या काढ्याने डोळे धुवावेत.

* नस्य - गायीचे तूप किंवा अणु तेल ४-४ थेंब प्रत्येक नाकपुडीत टाकावेत.

* व्यायाम - व्यायाम करणे सध्या सर्वांना अतिशय आवश्यक आहे, विशेषतः जे लोकं सतत बसूनच काम करतात, त्यांनी तर रोजच व्यायाम करायला हवा. व्यायाम किती करावा? तर काखेत, कपाळाला घाम येईपर्यंत करावा. सध्या एकाच जागी पळणे, जोर, बैठका इत्यादी प्रकारचा व्यायाम करू शकता.
किंवा योगासने, सूर्यनमस्कार करावेत. प्राणायाम, ध्यान करावे.

* अभ्यंग - सर्व अंगाला तीळ तेल / खोबरेल तेल / अभ्यंग तेल कोमट करून लावावे. त्यानंतर डाळीचे / बाजरीचे पीठ / उटणे लावून स्नान करावे.

* नाश्ता - भूक असल्यास नाश्ता करावा. खूपच जास्त भूक असेल तर जेवणच करावे.
नाश्यात रव्याचा शिरा, उपमा, मुगाची खिचडी, घावन, ताज्या पोळीचा कुस्करा किंवा साळीच्या लाह्यांचा चिवडा यापैकी आवडीचा पदार्थ ताजा बनवून खावा.

* दुपारचे जेवण - दुपारच्या जेवणात पोळी /फुलका / भाकरी, भाजी, वरण भात, तूप, ताजे ताक यांचा समावेश करावा. जेवण ताजे, तूप घालून स्निग्ध केलेलं, गरम असावे.
अजीर्ण होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.

* दिवसा झोपू नये.
खूपच वाटल्यास १५ मिनिटे खुर्चीत बसून डोळे बंद करून पडावे.

* सायंकाळी - ओंकार, प्राणायाम, ध्यान, श्रीरामरक्षा स्तोत्र, गणेश अथर्वशीर्ष इत्यादी स्तोत्रे देवासमोर दिवा लावून म्हणावीत.

* धुपन - कापूर, कडुलिंब, वावडींग, वेखंड, मोहरी यांचा गायींच्या शेणाची गौरी, गायीचे तूप यांचा वापर करून घरात धूर करून धुपन करावे.

* रात्रीचे जेवण - संध्या. ७ वाजेपर्यंत जेवण करावे. भुके नुसार आहार असावा, परंतु आहार हा पचण्यास हलका, ताजा, गरम, स्निग्ध असावा, दुपारपेक्षा रात्रीचे जेवण प्रमाणाने देखील कमी असावे.
रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी, भाजणीचे थालीपीठ, भाकरी / फुलका, भाजी असा हलका आहार असावा.
जेवणानंतर घरातल्या घरातच शतपावली करावी आणि काही काळ वज्रासनात बसावे.

* रात्री तळपायांना काशाच्या वाटीने घासुन तेल / गायीचे तूप लावावे.

* १० वाजेपर्यंत झोपावे.

* रिकाम्या वेळेत वाचन, चिंतन, लिखाण करावे. किंवा एखादे नवीन कौशल्य (skill) शिकावे. गाणे, संगीत शिकावे. आपला वेळ सत्कारणी लावावा, जेणे करून भविष्यात आपल्याला त्यामुळे मदत होईल.

* याकाळात आपलं मानसिक स्वास्थ्य जपणे अतिशय आवश्यक आहे. सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्यान करावे, मोटिव्हेशनल व्हिडिओ बघावेत, पुस्तकं वाचावीत. काळ कसाही असो, चांगला अथवा वाईट तो काळ निघून जातो, त्याप्रमाणेच हा वाईट काळ देखील निघून जाईल.
लहान मुलांसोबत वेळ घालावा. बैठे खेळ, घरात खेळता येतील असे खेळ खेळावेत. त्यानेही मन प्रसन्न राहते. घरच्यांसोबत वेळ आनंदात घालवता येईल.

अशी दिनचर्या ही नित्य असावी परंतु लॉकडाउन च्या काळात वेळेचा सदुपयोग, आरोग्याच्या काळजी व व्याधी क्षमत्व वाढविण्यासाठी वरील दिनचर्या उपयोगी आहे.

याकाळात घरीच राहा, सुरक्षित राहा.
स्वतः ची आणि स्वतःच्या परिवाराची, समाजाची काळजी घ्या.
आरोग्याविषयी काहीही समस्या असल्यास, शंका असल्यास आपल्या वैद्य, डॉक्टरांना फोन करा किंवा प्रत्यक्ष भेटा.

- वैद्य. वैभव सदाशिव सोनार
एम्.डी. (आयुर्वेद), नाशिक
९८२२२७१६७८

31/03/2020

*लॉकडाउन काळात शरीर व मनाचे आरोग्य कसे सांभाळावे?*

टीव्ही, व्हाट्सअप्प, फेसबुक इत्यादी social मीडिया सगळीकडे केवळ एकच एक चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस. कधी नव्हे ते सरकारने सर्व प्रकारचे दळणवळण, ऑफिस वगैरे सगळे काही लॉकडाउन केले आणि तेही थोडे थोडके नाही तर २१ दिवसांसाठी. त्यामुळं प्रत्येक जण घाबरलेल्या स्थितीत आहे, पॅनिक झाला आहे.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, विविध कामांसाठी इतर लोकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतच असतो. आता कोणालाही घरात बसण्याची सवय राहिलेली नाही.
संपूर्ण जगात कोरोना वर कोणतेही औषध अजून तरी उपलब्ध नाही. तर मग यापासून आपला बचाव कसा करायचा?
सर्वात महत्त्वाचा बचाव म्हणजे सरकारी आणि वैद्यकीय निर्देशांचे पालन करणे. त्यानुसार स्वतःला घरात बंद करून घेणे, बाहेर निघताना सोशियल डिस्टन्स (किमान १ मीटर/ ३ फूट) ठेवणे, हात वारंवार धुणे इत्यादी जे आपण टीव्ही, मोबाईल मेसेजेस, इत्यादींच्या माध्यमातून वारंवार ऐकत आणि वाचत आहोत.

परंतु घरी असतानाहि आपण काही काळजी घेणे गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तर आपण निरोगी राहू शकतो.
त्यासाठी खालील उपाय आपण करू शकतो -
* च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण वगैरे सारखी रसायन औषधी आपल्या प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत.
* आपला आहार हा ताजा, स्निग्ध, गरम, सात्विक, पचण्यास हलका असावा.
* आहारात फळभाज्या, वरण, भात, चपाती, भाकरी, फुलका, यांचा समावेश अधिक असावा.
* गायीचे दूध, गायीचे तूप, डाळिंब, काळे मनुके, विविध फळे यांचा समावेश आहारात असावा.
* मैद्याचे पदार्थ, बेकरीतील पदार्थ, फास्ट फूड, चायनीज, ready to use food, praservative घातलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, अति मसालेदार पदार्थ इत्यादी पदार्थ वर्ज्य करणे किंवा अत्यल्प प्रमाणात सेवन करणे.
* अजीर्ण होणार नाही याची काळजी घ्यावी.
* रात्री लवकर झोपावे, दिवसा झोपू नये.
* योग्य आणि पुरेशी झोप घ्यावी.
* पहाटे लवकर उठून विविध योगासने, सूर्यनमस्कार, ओंकार जप, प्राणायाम (अनुलोम-विलोम, भस्रिका, कपालभाती इ.) करावा.
* घरात करता येईल असा व्यायाम करावा. (जागेवर पळणे, जोर, बैठका इत्यादी)
* नाकात गायीचे तूप २-२ थेंब टाकावे.
* हळद टाकून पाणी उकळवून त्याच्या गुळण्या करणे.
* घरात किमान १-२ वेळेस गुग्गुळ, कडूनिंब, कापूर, हळद, मोहरी, वेखंड इत्यादी पैकी जे जे उपलब्ध असेल त्याचा, गायीचे तूप टाकून गायीच्या शेणाच्या गौरीवर जाळून धूर करून घराचे धुपन करणे.

शरीरासोबत मनाचेहि स्वास्थ्य राखणे या काळात अतिशय आवश्यक आहे. टीव्ही, व्हाट्सअप्प इत्यादी वरील बातम्या, पोस्ट्स वाचून, आपल्या शहरात व्याधीचा प्रसार होत आहे, एवढे नवीन रुग्ण सापडले, एवढे मेले इत्यादी सर्व वारंवार ऐकून दुःख, शोक, भय, क्रोध, काम, मोह, इत्यादी विविध मानसिक भावना याकाळात तीव्रतेने जाणवू शकतात. दुःख, भय यामुळे विविध व्याधी अधिक प्रमाणात वाढतात, त्यामुळे या अशा प्रसंगात मनाचे स्वास्थ्य सांभाळणे हे अतिशय आवश्यक आहे.
त्यासाठी प्रत्येकाने
* प्राणायाम, ओंकारचा जप, ध्यान करावे.
* नामजप करावा, इतर काही साधना करावी.
* संध्याकाळी देवासमोर दिवा लावून श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणावे. जेणे करून घरातील वातावरण सकारात्मक, प्रसन्न होऊन सर्वांची मानसिक अवस्था सुदृढ होण्यास मदत होईल.
* आवडते संगीत ऐकावे, गाणी ऐकावीत.
* आपले मन प्रसन्न आणि आनंदी राहील असे कार्यक्रम बघावेत, वाचन करावे.
* नकारात्मक गोष्टी टाळाव्यात.
* हा वेळ आपले कौशल्य (skill) वाढविण्यासाठी, नवीन कौशल्य, कला शिकण्यासाठी सत्कारणी लावावा.
* घरात लहान मुलांसोबत खेळावे.

आरोग्याविषयी काहीही समस्या असल्यास आपल्या वैद्यांना, फॅमिली डॉक्टरांना भेटा, फोन करा.
आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.

- वैद्य. वैभव सदाशिव सोनार
एम्. डी. (आयुर्वेद), नाशिक.
९८२२२७१६७८

25/03/2020

आयुर्वर्धिनी तर्फे सर्वांना चैत्रपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....

कोरोना चा सगळीकडे कहर सुरु आहे, या कोरोना वर मात करण्यासाठी आपण सर्वजण संकल्प करूयात आणि आपण सर्वजण पुढील २१ दिवस आपल्या घरात बसूयात आणि आपल्या स्वतःचा, आपल्या परिवार आणि समाजातील इतरांचा कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करूयात.

आयुर्वर्धिनी याकाळात आपल्या सर्वांसोबत लढण्यास सुसज्ज आहे. आपणास आरोग्याविषयी काहीही शंका असल्यास किंवा मदत हवी असल्यास वैद्य. वैभव सदाशिव सोनार यांना ९८२२२७१६७८ या क्रमांकावर फोन करा.

स्वतः ची आणि इतरांचीही काळजी घ्या, घरातून बाहेर पडू नका.

Address


Opening Hours

Monday 09:30 - 14:00
17:30 - 21:30
Tuesday 09:30 - 14:00
17:30 - 21:30
Wednesday 09:30 - 14:00
17:30 - 21:30
Thursday 09:30 - 14:00
17:30 - 21:30
Friday 09:30 - 14:00
17:30 - 21:30
Saturday 09:30 - 14:00
17:30 - 21:30
Sunday 09:30 - 14:00
17:30 - 21:30

Telephone

+918888860977

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurvardhini-Preventive Care & Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Preventive Care & Wellness-॥आरोग्यम् धनसंपदा॥

रूग्णसेवेसाठी विविध आयुर्वेदिक तज्ञ एकाच ठिकाणी..

*सुप्रजनन*

निरोगी, सुदृढ, मेधावी संततीसाठी...