Wellness Clinic

Wellness Clinic Holistic Approach Healthcare

02/11/2021
Suvarnbindu prashan camp ......
20/08/2021

Suvarnbindu prashan camp ......

Suvarnbindu prashan camp for all childrens from 0 to 12 age group @ wellness clinic Om CHS sector 20/D...19 August morni...
17/08/2021

Suvarnbindu prashan camp for all childrens from 0 to 12 age group @ wellness clinic Om CHS sector 20/D...19 August morning 11 Am to 1 pm.....

Happy doctors day to all....
01/07/2021

Happy doctors day to all....

28/05/2021



आयुर्वेदाच्या नावाखाली सत्य नसलेल्या खपवलेल्या काही गोष्टी:
हल्ली ' आयुर्वेद ' नाव आले की सगळ्यांचा लगेच विश्वास बसतो. आयुर्वेदावरच्या वाढलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे. पण त्याचा गैरफायदा घेऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही लोक कुठलेही उपाय आयुर्वेद नावाखाली १००% खात्री आणि नो साईड इफेक्ट्स अशा मथळ्याखाली सोशल मीडिया आणि व्हॉट्सऍप वर करत राहतात. त्यातीलच सध्या वाचनात आलेली काही चुकीची वाक्ये:
१. "आयुर्वेदात जेवणानंतर दहीभात खायला सांगितला आहे."
दही हे उष्ण आणि शरीरातील पोषकांश ह्याच्या चलन वलनात अडथळा उत्पन्न करणारे आहे आहे. पूर्ण जेवण झाल्यावर थोडासा दहीभात खाणे हे पचनासाठी कठीण होऊ शकते. दोन घास कमी खाऊन मग १ वाटी ताक प्यावे. पण एकच वाटी जास्त नाही.

२. "रोज गोमूत्र पिणे प्रकृतीसाठी उत्तम असते."
गोमूत्र हे काही औषधात वापरतात आणि ते पण कल्पांमध्ये. नुसते गोमूत्र रोज पिणे अत्यंत प्रकृतिदायक आहे हे पूर्ण चुकीचे आहे. एकच नियम सगळ्यांना कसा बरे लागू होईल?

३. "तुळस आले गवती चहाचा 'आयुर्वेदिक' काढा सर्वांनी रोज घ्यावा."
ह्या बाबतीत मी मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांना हा काढा चालेलच. पण उन्हाळ्यात, उष्ण प्रकृतीच्या माणसाला, गळवांचा त्रास असताना जरी कोरोना प्रतिबंधक म्हणून सांगितला असला तरी चालेल का?नक्कीच नाही. अशा ठिकाणी थोडे मार्गदर्शन व थोडे तारतम्य लागते.
हर्बल आणि आयुर्वेदिक ह्यातला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. हर्बल म्हणजे कुठल्याही झाडाचे अनुभविक, ऐकीव, कुठेतरी कोणीतरी लिहिलेले, अर्धवट संशोधनातून पुढे आलेले आणि मग त्यातच मनाने काय काय घालून बनवलेले असे नुस्खे. आयुर्वेदिक म्हणजे एखाद्या लक्षणाचे आणि माणसाचे आयुर्वेदिक निदान पद्धतीने निदान करून, मग कदाचित वरीलच वनस्पती पण 'ज्ञान पूर्वक' देणे.

४. "आयुर्वेद काळात व्हायरस चा शोध लागला नव्हता म्हणून viral आजार आयुर्वेदाने बरे होत नाहीत".
ह्या विधनामागे आयुर्वेदिक निदान पद्धती बद्दलचे अज्ञान हे सर्वात मोठे कारण आहे. कारणे, लक्षणे, कशा मुळे, कुठल्या संक्रमण पद्धतीने, किती कालावधीपासून ह्याचा विचार करून औषधे दिली जातात. Viral, bacterial, microbial, parasital अशा पद्धतीने नाही. व्हायरस, बॅक्टरिया ह्याने काय लक्षणे उत्पन्न होतात त्याचे आयुर्वेदिक निदान करून त्या निदानातील औषधे वापरली जातात व त्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो.

५. "मी साधा साबण/शाम्पू नाही आयुर्वेदिक साबण/शाम्पू वापरतो."
आयुर्वेदिक साबण असे काही नसते. साबण बेस जोपर्यंत केमिकल आहे तोपर्यंत साबण पूर्ण ' आयुर्वेदिक ' होणे अशक्य. उटणे वापरू शकता.

६. "उन्हाळ्यात भरपूर ताक प्यायले की उष्णता होत नाही. आयुर्वेदात सांगितले आहे."
ताक हे स्वभावतः किंचित उष्ण असते. त्रिदोष शामक ही आहेच. पण ते ताजे, फ्रीज मध्ये न ठेवता, भरपूर पाणी घालून आणि घुसळून केलेले पाहिजे. आत्ता बरेच जण एकदम खूप दही लावून फ्रीज मध्ये ठेवतात आणि रोज थोडे काढून ७ दिवस एकच दही वापरतात. पाणी कमी, ब्लेंडर ने घुसळलेले आणि कधी कधी अधमुरे किंवा आंबट ताक पितात. तसेच साय न घालता केलेल्या दह्याचे ताक हे रुक्ष स्वभावाचे होते. उन्हाळ्यात जेव्हा शरीरात स्निग्धता असण्याची अपेक्षा असते तेव्हा सारखे सारखे ग्लास ग्लास भर ताक हे त्रासदायक ठरू शकते. जेवताना १ वाटी ताकाबद्दल काहीच हरकत नाही.

७. " आयुर्वेदात कच्च्या भाज्या व फळे ह्यावरच भर द्यायला सांगितला आहे".
शिजवलेले आणि ताजे खावे. पालेभाज्यांचा सुद्धा अतिरेक किंवा सतत खाणे हे रोग वाढवणारे आहे.समतोल महत्त्वाचा आहे. भारतीय ताट हे योग्य जेवणाचे उत्तम प्रदर्शन आहे. डाव्या बाजूला कच्चे(चटणी/कालवलेले मेतकूट/कोशिंबीर) आणि उजव्या बाजूला शिजवलेल्या भाज्या आणि मध्ये पोळी/भात हे सर्वोत्तम. ते त्या प्रमाणात खाल्ले जावे म्हणूनच त्यांच्या त्या जागा आहेत.

८. "आयुर्वेदात रोज सकाळी तांब्याभर पाणी प्यायला सांगितले आहे."
प्रत्येकाच्या प्रकृति,वय, हालचाल, व्यायाम, आजार ह्याप्रमाणे ही गरज बदलते. उगाच जास्त पाणी पिण्याने अग्निमांद्य, सूज, आम्लपित्त हे आजार बळावतात.

९. "च्यवनप्राश बरोबर ग्लास भर दूध प्यावे."
च्यवनप्राश हा एक अवलेह(चाटून खायचा) पदार्थ आहे. स्वभावतः जड, मधुर रस प्रधान आहे. अग्नी प्रमाणे, गरजेप्रमाणे सकाळी अनशापोटी मूळ पचन चांगले असले की, आणि नसले तर ते नीट झाल्यावर प्रमाणात घ्यावा. त्यावर दूध प्यायले तर पचायला अजून जड होतो. उत्तम अग्नी वाल्यांना दूध एकवेळ चालू शकेल. त्यातून जवळच्या आयुर्वेद तज्ञाला विचारावे मग ठरवावे.

१०. "सकाळी लिंबू गरम पाणी आणि मध घेतलेला चांगला."
असे आयुर्वेदात सांगितलेले नाही. मधूदक म्हणजे मध पाणी हे स्थूलांच्या चिकित्सेत आले आहे परंतु गरम पाण्यातून कधीच नाही. त्यातून त्यात रोज १/२-१ लिंबाचा रस घेणे हे तर त्वचा विकार आणि कफाच्या आजारांना निमंत्रण आहे.
जेवणात कोशिंबीर, भात, उसळी ह्यातून जेवढे लिंबू जाते तेव्हढे पुरेसे आहे. अजून गरज नाही.

११. "रात्री गार दूध प्यायल्याने acidity दूर होते."
एक तर आयुर्वेदात असे सांगितले नाही. फक्त एवढा सोपा उपाय काम करत असता तर acidity नामशेष झाली असती जेव्हा उलट ती वाढतानाच दिसत आहे. त्यातून रात्री जेव्हा शरीर शांत असते अशा वेळी पचनशक्तीला कामाला लावणे हे त्रासदायकच आहे.
वरील गोष्टींना अनेक वेगवेगळे पैलू आहेत. एकच टोक, एकच वाक्याची टीप आणि सर्व रोगातून मुक्तता असे असते तर कुठल्याच मेडिको लोकांची गरज उरली नसती.

यू ट्यूब वरील "फक्त १ दिवस अशा पद्धतीत जिरे खा आणि अमुक ढमुक विकारांपासून कायमसाठी मुक्तता मिळवा." अशा वाक्यांचे thumbnails असणारे व्हिडीओ अजिबात बघू नका, शेअर करू नका आणि हे खरे आहेत का हो असे वैद्य/ डॉक्टर ह्यांना विचारूही नका.. खरेच असे झटपट होत असते तर त्या माणसाला एव्हाना मेडिसिन चा सर्वोच्च पुरस्कार नसता का मिळाला?

©वैद्य स्वराली शेंड्ये
यशप्रभा आयुर्वेद.....

My Renovated clinic.... Airoli sector - 01
23/05/2021

My Renovated clinic.... Airoli sector - 01

@* सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे *@            सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते...
23/05/2021

@* सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे *@

सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिवसाचा पहिला प्रहर हा अप्रतिम आणि कमी प्रदूषित असतो. शहरामध्ये प्रदूषणाचा खूपच त्रास असतो. पण सकाळच्या या प्रहरी प्रदूषण कमी प्रमाणात असते आणि हवा स्वच्छ असते. ज्यामुळे मनाला शांतता मिळते आणि शरीराला अधिक ऊर्जाही प्राप्त होते. पायी चालण्याने तुमच्या शरीराचा व्यायामही होतो आणि दिवसभर शरीरामधील एनर्जी चांगली टिकून राहाते.

१) नैराश्यमुक्त आयुष्य जगण्यासाठी -

सकाळीच लवकर उठून चालायला गेल्याने मन स्वस्थ राहते आणि अंगातील आळसही निघून जाण्यास मदत होते. सकाळी चालण्याने मन हलके होते आणि डोकंही शांत राहण्यास मदत मिळते. नैराश्यग्रस्त व्यक्ती जर रोज सकाळी 20-40 मिनिट्स चालली तर नैराश्याचा स्तर कमी झाल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. डिप्रेशनमधून निघण्यासाठी तुम्ही रोज सकाळी किमान अर्धा तास तरी चालायला हवे.

२) हृदय रोगासाठी फायदेशीर-

सकाळी नियमित चालण्याने तुमचे हृदय अधिक मजबूत होते आणि हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका कमी असतोयामुळे रक्तप्रवाह चांगला आणि सुरळीत राहतो ज्यामुळे हृदयाला धोका राहात नाही. एका शोधानुसार सकाळी चालण्यामुळे हृदयसंबंधित धोका साधारणतः 31 टक्के आणि मरण्याचा धोका 32 टक्के कमी होतो. पुरूष आणि महिलांना दोघांनाही याचा फायदा होतो.

३) मधुमेही रुग्णांकरिता वरदान

सकाळी चालायला गेल्यामुळे ही समस्या काही प्रमाणात तुम्ही आटोक्यात आणू शकता. केवळ सकाळी अर्धा तास चालल्याने तुमच्या शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तर टाईप - 2 चा मधुमेह संपुष्टात आणण्यासही याची मदत मिळते. तुम्ही तुमच्या खाण्याच्या वेळा पाळण्यासह आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासह सकाळी चालण्याचा फायदाही मधुमेहासाठी करून घेऊ शकता.

४) वजन कमी करण्यासाठी उत्तम

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज न चुकता तुम्ही सकाळी किमान अर्धा तास ते पाऊण तास चालयला हवे. याचा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होते. तज्ज्ञांनुसार आहारातील बदलाशिवाय देखील सकाळी चालण्याने वजन कमी होते. सकाळी चालल्याने शरीरातील फॅट कमी होतात आणि शरीरातील लचक अधिक वाढते तसंच मांसपेशींनाही मजबूती मिळते. पण याबरोबर आहारावरही नियंत्रण असणे गरजेचे आहे.

५) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त

रोज सकाळी चालण्याने शरीरामधील रक्तप्रवाह उत्तम राहतो आणि ज्याचा सकारात्मक प्रभाव प्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहिल्याने ऑक्सिजनचा त्रास होत नाही आणि ऑक्सिजनमध्ये सुधारणा होते. दिवसाला अर्धा तास चालण्याने तुमची इम्यून सिस्टिम (immune system) अधिक मजबूत होते आणि आजाराशी लढा देण्यास मदत करते.

६) तणावमुक्तता

तणावामुळे शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होत असतो. यातून बाहेर पडण्यासाठी सकाळी चालण्याने फायदा मिळतो. मॉर्निंग वॉकमुळे डोक्यापासून ते पायापर्यंत रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो. तसंच सकाळची ताजी हवा तुम्हाला तणावापासून मुक्त राहण्यासाठी फायदेशीर ठरते.

७) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी

निरोगी राहणं आणि सेल्स मेमब्रेनच्या निर्मितीसाठी शरीरामध्ये निश्चित प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. पण अनेकदा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी जास्त होत राहातं. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. मग अशावेळी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी चालायला जाणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. नियमित मॉर्निंग वॉक केल्याने कॉलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात राहतो.

८) चमकदार त्वचेसाठी

व्यायामामुळे रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरील चमक जास्त चांगली राहते. त्यामुळे सकाळी चालण्याने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहून चेहरा अधिक चमकदार दिसतो. चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. कारण सकाळीच चालण्याने शरीरातील नसांना चांगला रक्तपुरवठा होतो आणि दिवसभर ताजेतवाने राहता येते. यामुळे चेहऱ्यावर मुरूम अथवा पुळ्या असा त्रासही होत नाही. सकाळी चालण्याने नैसर्गिक स्वरूपात तुमचा चेहरा अधिक चमकदार राहतो.

९) चांगली झोप लागते

सकाळी लवकर उठून चालण्याने रात्री झोपही चांगली लागते. दिवसभराचा तणाव बऱ्याचदा रात्रीची झोपही खराब करतो. त्यामुळे शरीराला योग्य आराम मिळत नाही. पण सकाळी लवकर उठून चालण्याची सवय लावल्यास रात्री झोपही चांगली लागते. तणावमुक्त राहिल्याने आणि शरीर निरोगी राहिल्याने रात्री झोपेची समस्या येत नाही. तसेच दिवसभर फ्रेश वाटते.

१०) एजिंग समस्येसाठीही उपयुक्त

मॉर्निंग वॉक हा सर्वात चांगला अँटिएजिंग उपचार मानण्यात येतो. बऱ्याचदा वाढत्या वयानुसार सांधेदुखी, अंगदुखी आणि त्वचेवरील चमक होणे या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. पण हे त्या महिलांच्या बाबतीत अधिक घडते, ज्या व्यायाम करत नाहीत. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर तुम्ही सकाळी चालण्याचा पर्याय निवडा आणि किमान स्वतःसाठी अर्धा तास तरी काढा.

@* सकाळी चालण्यासाठी उपयुक्त टिप्स *@

* सकाळी चालण्याने शरीर अधिक उर्जावान बनते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे सूर्याच्या पहिल्या किरणांमध्येच सकाळी फिरा. यामुळे तुम्हाला विटामिन डी देखील मिळते.

* शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर तुम्ही सकाळी चालण्यासह काही वेळ धावणेदेखील उत्तम.

* जेवल्यानंतर चालू नका .

* मॉर्निंग वॉकदरम्यान अत्याधिक पाणी पिऊ नका .

* तुम्ही सकाळी चालायला सुरूवात करणार असाल तर आधी तुमची गती सामान्य ठेवा आणि मग हळूहळू त्यामध्ये वाढ कर

Immunity booster food.....
23/05/2021

Immunity booster food.....

Address

Navi Mumbai
400708

Telephone

+919892288284

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wellness Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram