04/02/2024
#विहाराचा_अतियोग...
#अति_साहस_जन्य_विहार ..
विहार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या हालचाली , व्यायाम,प्रवास करतो त्या सर्व गोष्टी होत...
विहार यावर यायचं कारण म्हणजे आता सध्या सुरु असलेले व्यायामाचा विहार..
#मॅरेथॉन ...एक सोहळा म्हणता येईल समाजसेवकांनी,किंवा राजकारण्यांनी सुरु केलेला आरोग्य या सबबी खालील इव्हेंट चा भाग झाला आहे...व आपल्याकडे हेल्दी पिरियड मध्ये हा सोहळा साजरा करण्याचे फॅ ड वाढत चालले आहे...किमान आठवड्यातून एखादी तरी रन असतेच...
मुळात हा विषय मांडण्याचे कारण म्हणजे मी स्वस्थ राहावे म्हणून मी या स्पर्धेत सहभागी होतो.त्यासाठी नियमित उपासना (चालायची ,धावायची) करतो म्हणून एक रुग्णा सोबत आलेला त्याचा मित्र सांगत होता ...डॉ काल परवा च मी 10 किमी,धावलो,त्याआधी 21 किमी पण पूर्ण केले ....
या सगळ्यात इतकेच सांगायचे आहे की ...ज्याप्रमाणे पशु च्या अमानुष स्पर्धा असतात तश्याच या आहेत अस म्हणायला काही हरकत नाही...
एक तर 10किमी ,21 किमी ,40 -- 42 किमी धावणे,चालणे,हा कधीच व्यायाम होणार नाही,हा व्यायामाचा अतियोग आहे म्हणायला हरकत नाही....आणि एव्हढे सर्व करुन या स्पर्धेतुन हाती काय लागत तर एक मेडल, एक सर्टिफिकेट, व एक सेल्फी,...आणि त्यासोबत एखादी इन्जुरी, किंवा भविष्यातील सांधे दुखीची तयारी....हे अश्या साठी कारण आपल्याकडे ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्या एक तर रस्त्यावर भरवल्या जातात, ते रस्ते हे कठीण डांबरी,किंवा सिमेंट चे असतात...त्यामुळे त्यावर जेव्हा धावणे,पळने, किंवा वेगाने चालणे ह्या क्रिया होतात त्यावेळी रस्ता हा कठीण असल्याने दबला जात नाही त्याचे बॅक प्रेशर निर्माण होते त्यामुळे धावताना,चालताना,पळताना आपल्या शरीराचे जे शॉक अबसॉर्बर जे की मणके आहेत त्यांना बॅक प्रेशर भेटते त्याने मणक्याच्या प्रकृत क्रियेत अडथळा निर्माण केला जातो...व वरंवार या क्रिया केल्याने स्पर्धा पार केल्याने भविष्यात मणके ,कंबर दुखी याची सुरुवात होऊन कालांतराने सांधे विकारात रूपांतर होते...वारंवार पायावर ताण दिल्याने क्षमतेच्या बाहेर त्यावर ताण दिल्याने हे गुडघ्या च्या बाबतीत देखील घडते....आता जर स्पर्धा भरवायच्या असतील तर मग त्या जमिनीवर,मैदानात ,ग्राउंड वर भरवाव्यात ....
आणि त्याचा काल देखील योग्य असावा...
आपल्या कडे हेल्दी सिझन म्हणून आरोग्यकारी म्हणून या मॅरेथॉन थंडीत भरवल्या जातात...त्यामध्ये धावणारे धावपट्टू हे शॉर्ट किंवा स्लीव्हलेस टी शर्ट घालून धावतात...आयुर्वेदा नुसार शीत गुणाने वात वृद्धि होते,त्यामुळे धावताना लागणाऱ्या गार वऱ्याचा परिणाम शरीरावर होताना दिसतो...तसेच धावणे,पाळणे याने वाताच्या गुणात देखील वाढ होते ...त्यामुळे वात व्याधी ची यादी वाढते...
आता 10 किमी,21 किमी,40 -- 42 किमी धावणे स्पर्धा पूर्ण करणे हा आती सहसाचा प्रकार म्हणता येईल...आयुर्वेदा अति साहसा ने क्षय होते असे सांगितले आहे...तोडक्यता झीज होते...
हे काही किलोमीटर च्या सायकल स्पर्धा यासाठी देखील लागू पडते...
म्हणून रेकॉर्ड ,करणे आणि मेडल या साठी धावणे ,सोशल मीडियावर फोटो साठी धावणे हे कदापी योग्य नाही....आणि हो आता स्पर्धेला फी किंवा रजिस्ट्रेशन करावे लागते...म्हणजे आपण च पैसे देऊन विकत घेतल्यासारखे आहे...
आप आपली क्षमता ओळखून अर्ध शक्ती म्हणजे कपाळावर घामाचे थेंब येऊ पर्यंत केलेला व्यायाम स्वास्थ रक्षण,आरोग्य वाढवेल...
या सोबत आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या पाळली,सोबत स्नेहन,स्वेदन जर केले, तर आरोग्य टिकेल..नाहीतर अति साहसा ने भविष्यात अनारोग्य निर्माण होईल...
अधिक माहिती साठी व आयुर्वेदिक चिकित्सेसाठी संपर्क करा .......
डॉ.नितीन संपतराव पाटील (आयुर्वेदाचार्य) 9890056343
दीर्घायु जीवितम आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र.
यश कॉम्प्लेक्स,शॉप नं 11,सेक्टर 8,
आय डी बी आय बँकेच्या जवळ,
कळंबोली,ता:-पनवेल,रायगड,नवी मुंबई.