Dirghayu Jivitam Ayurved & panchkarma

Dirghayu Jivitam Ayurved & panchkarma शुद्ध आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय

22/07/2025
05/03/2024

#शौच_विचार_आणि_मानसिकता...

मागील काही वर्षाच्या चिकित्सालयातील अनुभवानुसार एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती नमूद करावीशी वाटली..ती एक समस्या म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे...बहुतांश पुरुष वर्गात ही गोष्ट लक्षात आली...स्त्री वर्गात कोणाला जणवली असेल तर असू शकेल ...
मनुष्य जीवन आल म्हणजे अनेक गोष्टी चा रोज चा सामना हा आलाच या सगळ्यातून जात असताना मानसिक ताण तणाव हे रोज चे आलेच ,त्या अनुषंगाने तसा विचार ही आलाच व हा विचार करण्याची काही वेळ, काळ ,स्थळ अशी निश्चित नाही,कधी ही व केव्हा ही हे विचार येत असतात,यातील सगळ्यात ज्यास्त विचार करण्याची पुरुषांची जगा म्हणाल तर ती म्हणजे शौच मार्जन करण्याचे शौच्यालय होय....पुरुष मंडळी सगळ्यात ज्यात टेन्शन,ताण तणाव या विषयी चे चिंतन ज्यास्त करून शौचालयात गेल्यावर तिथे बसून करताना दिसतात.आपल्या आजू बाजूला अश्या अनेक व्यक्ती दिसतात की त्यांचे टेन्शन,ताण तणाव वाढले की शौचाला जाण्याचे प्रमाण देखील वाढलेले दिसते,पूर्वी ही एक सवय होते पण सध्याच्या काळात हा एक शरीरिक ,व मानसिक आजार होऊन बसला आहे,अश्या व्यक्ती या वारंवार टॉयलेट च्या visit करत असताना दिसतात ,पण वेग आलेला नसताना देखील जाऊन येतो म्हणायचे व बळजबरीने होत नसताना देखील शौच करण्याचा प्रयत्न करणे ही क्रिया सातत्याने सुरु असते ,त्यामुळे शौच्या शी संबंधित,किंवा जागेशी संबंधित मूळव्यध,भगंदर,सारखे विकार कधी उद्धभवतात हे कळून देखील येत नाही....वारंवार जाऊन देखील पोट व्यवस्थित असल्याची भावना,शाश्वती असते असे नाही.कारण लक्ष पोट साफ करणे यापेक्षा डोक्यातील विचारावर अधिक केंद्रित झालेले असते...
अनेक वेळा अशी सवय असल्येला ना हृदय विकाराचा धोका संभवताना दिसतो वारंवार बळजबरीने जोर देऊन पोट साफ करण्याच्या प्रयत्नाने ह्रदयावर जोर पडून अनेकांना ह्रदय विकाराचा झटका आलेला देखील बघायला मिळतो.
काही जणांमध्ये तर असे लक्षण दिसून येते की कोणते ही काम करायचे असेल, विशेषतः प्रवासाला दूर गावी जायचे असले तरी देखील प्रवासाला निघू , निघू पर्यंत 3 ,4 वेळा तरी टॉयलेट visit करावी लागते...या मध्ये अधिक करून बैठे काम करणारे,ऑफिस वर्क करणारे,व्यवसायिक ,हे मोठ्या प्रमाणात ग्रस्त असलेले दिसून येतात
या मध्ये देखील मानसिकता हा हेतू मोठ्या प्रमाणावर दिसत असतो.
या सारख्या रुग्णा मध्ये नुसती शारिरिक चिकित्सा करून चालत नाही,तर त्या सोबत मानसिक चिकित्सा देखील महत्वाची ठरते...
#आयुर्वेदिक_उपचार_सल्ला_व_अधिक_माहितीसाठी_संपर्क_करा.
डॉ.नितीन संपतराव पाटील (आयुर्वेदाचार्य)9890056343.
दीर्घायु जीवितम आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र.
यश कॉम्प्लेक्स,शॉप नं 11,सेक्टर 8,आय डी बी आय बँकेच्या जवळ ,कळंबोली,ता:-पनवेल,रायगड,नवी मुंबई.

 #वसंत_ऋतू प्रत्यक्ष ईश्वराने श्रुष्टि निर्माण करताना आयुर्वेदाची निर्मिती केली आहे. म्हणून आयुर्वेदाचे सिद्धांत विश्वाच...
22/02/2024

#वसंत_ऋतू

प्रत्यक्ष ईश्वराने श्रुष्टि निर्माण करताना आयुर्वेदाची निर्मिती केली आहे. म्हणून आयुर्वेदाचे सिद्धांत विश्वाच्या निर्मिती पासूनच अबाधित आहेत.युगानुयुगे, वर्षानुवर्षे,तेच ऋतू येतात व आयुर्वेदाने सांगितलेली ऋतुचर्या ही तीच आहे,यावरून सतत बदलणाऱ्या ,आपल्या मताशीच संभ्रम असणाऱ्या आधुनिक शास्त्रा पेक्षा चिरतरुण आयुर्वेद हा महान आहेच...

दक्षिणायनात दूर गेलेला सूर्य हिवाळ्याच्या शेवटी जवळ येऊ लागल्यावर जसा हिमालयात बर्फ वितळू लागतो तसाच थंडीच्या दिवसात शरीरात साठलेला कफ सूर्याच्या किरणामुळे पातळ होऊ लागतो,थंडी संपल्यापासून प्रखर उन्हाळा सुरु होण्यापर्यंत चा काळ म्हणजे #वसंत_ऋतू होय.
सध्या ेब्रुवारी ते ्रिल हा #वसंत_ऋतू चा काळ म्हणता येईल व २० एप्रिल पासून पुढे ग्रीष्म ऋतू प्रारंभ होतो.

वसंत ऋतुत वाढलेल्या कफामुळे सर्दी,खोकला,ताप,दमा इ.विकार बळावतात या दिवसात किंबहुना इथून पुढील दिवसात रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्याने रोगाचे प्रमाण वाढलेले दिसते.

वसंत ऋतू हा #कफचा काळ असल्याने शरीरात कफ वाढलेला दिसतो तो संतुलित ठेवणे महत्वाचे ठरते, कफ हा स्निग्ध (चिकट) गुरु,गुणांचा असल्याने आहारात व विहारात कफ वाढणार नाही अशी व्यवस्था / योजना केली पाहिजे,त्या करिता #वसंत_ऋतू_चर्या चे पालन करणे अधिक फायदेशीर ठरेल .
्याख्या :-
केन (जलेन)फलति इति कफ : |
जलाने फलित होतो निर्माण होतो तो कफ ..
म्हणून या ऋतुत पिण्यासाठी वापरायचे पाणी हे #सुंठ किंवा #मुस्ता याचे चूर्ण टाकून पाणी पिणे अधिक उपयुक्त ठरते.ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अश्यानी #सुंठ_ऐवजी_मुस्ता वापरावा .
#गोड, #आंबट पदार्थाचे सेवन करु नये ,त्या ऐवजी #कडू रसाचे पदार्थ सेवन केल्याने आरोग्यासाठी उपयुक्त ठरते .म्हणून आपल्या भारतीय संस्कृती मध्ये येणाऱ्या #गुढीपाडव्या सारख्या सणांना कडूनिंबाच्या पानाचे सेवन करण्याची प्रथा आहे.
तेलकट / #स्निग्ध पदार्थमुळे कफ वाढतो त्यामुळे त्याचे सेवन करू नये .
वसंत ऋतुत वापरायचे धान्य हे #जुने असावे.
नवीन धान्य शरीरात स्त्राव / #कफ वाढवतात आणि पचण्यास जड असते ,त्याकरिता १ वर्ष जुने धान्य वापरावे ते पचण्यास हलके असते .जर जुने धान्य मिळाले नाही तर नवीन धान्य #भाजून वापरावे.

#व्यायाम :-
#व्यायामाने कफ कमी होण्यास मदत होते यासाठी वसंत ऋतुत #अर्ध_शक्ती व्यायाम करावा (अर्ध शक्ती म्हणजे :- व्यायाम करताना तोंडाने श्वास घेण्याची आवश्यक्यता वाटू पर्यंत करणे ) #अर्धा ते #एक तास करावा.
#दिवा_स्वाप (दिवसा झोपणे) :-
रात्री जागरणाने #रुक्षता वाढते,व दिवसा झोपण्याने #स्निग्धता वाढते दिवा स्वापाने शरीरात #अनावश्यक_स्त्राव वाढतात ,त्याने घश्याकडे कफ येतो,अंग जड होते,आळस निर्माण होतो,म्हणून दिवसा झोपू नये याला अपवाद म्हणजे वयस्कर व्यक्ती ,रुग्ण,पुष्कळ थकवा आलेले लोक यांनी दुपारी झोपले तरी चालेल .
वसंत ऋतूत कोकिळा आपले गायन सुरु करते,झाडे नवीन पालवी ने बहरलेली असतात त्यामुळे वातावरण आनंदी असते ,म्हणून आनंदी राहण्यासाठी #गुढीपाडवा, #रामनवमी सारखे सण उत्सव साजरे केले जातात.
वसंत ऋतू चार्येचे नियम पाळल्यास सर्वांना निरोगी राहता येईल व आरोग्य प्रदान होईल.

#डॉ_नितीन_संपतराव_पाटील (आयुर्वेदाचार्य ) ९८९००५६३४३
दीर्घायु जीवितम आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय संशोधन केंद्र.
कळंबोली,ता:- पनवेल,रायगड,नवी मुंबई .

 #विहाराचा_अतियोग... #अति_साहस_जन्य_विहार ..विहार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या हालचाली , व्यायाम,प्रवास करतो त्...
04/02/2024

#विहाराचा_अतियोग...
#अति_साहस_जन्य_विहार ..
विहार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या हालचाली , व्यायाम,प्रवास करतो त्या सर्व गोष्टी होत...
विहार यावर यायचं कारण म्हणजे आता सध्या सुरु असलेले व्यायामाचा विहार..
#मॅरेथॉन ...एक सोहळा म्हणता येईल समाजसेवकांनी,किंवा राजकारण्यांनी सुरु केलेला आरोग्य या सबबी खालील इव्हेंट चा भाग झाला आहे...व आपल्याकडे हेल्दी पिरियड मध्ये हा सोहळा साजरा करण्याचे फॅ ड वाढत चालले आहे...किमान आठवड्यातून एखादी तरी रन असतेच...
मुळात हा विषय मांडण्याचे कारण म्हणजे मी स्वस्थ राहावे म्हणून मी या स्पर्धेत सहभागी होतो.त्यासाठी नियमित उपासना (चालायची ,धावायची) करतो म्हणून एक रुग्णा सोबत आलेला त्याचा मित्र सांगत होता ...डॉ काल परवा च मी 10 किमी,धावलो,त्याआधी 21 किमी पण पूर्ण केले ....
या सगळ्यात इतकेच सांगायचे आहे की ...ज्याप्रमाणे पशु च्या अमानुष स्पर्धा असतात तश्याच या आहेत अस म्हणायला काही हरकत नाही...
एक तर 10किमी ,21 किमी ,40 -- 42 किमी धावणे,चालणे,हा कधीच व्यायाम होणार नाही,हा व्यायामाचा अतियोग आहे म्हणायला हरकत नाही....आणि एव्हढे सर्व करुन या स्पर्धेतुन हाती काय लागत तर एक मेडल, एक सर्टिफिकेट, व एक सेल्फी,...आणि त्यासोबत एखादी इन्जुरी, किंवा भविष्यातील सांधे दुखीची तयारी....हे अश्या साठी कारण आपल्याकडे ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्या एक तर रस्त्यावर भरवल्या जातात, ते रस्ते हे कठीण डांबरी,किंवा सिमेंट चे असतात...त्यामुळे त्यावर जेव्हा धावणे,पळने, किंवा वेगाने चालणे ह्या क्रिया होतात त्यावेळी रस्ता हा कठीण असल्याने दबला जात नाही त्याचे बॅक प्रेशर निर्माण होते त्यामुळे धावताना,चालताना,पळताना आपल्या शरीराचे जे शॉक अबसॉर्बर जे की मणके आहेत त्यांना बॅक प्रेशर भेटते त्याने मणक्याच्या प्रकृत क्रियेत अडथळा निर्माण केला जातो...व वरंवार या क्रिया केल्याने स्पर्धा पार केल्याने भविष्यात मणके ,कंबर दुखी याची सुरुवात होऊन कालांतराने सांधे विकारात रूपांतर होते...वारंवार पायावर ताण दिल्याने क्षमतेच्या बाहेर त्यावर ताण दिल्याने हे गुडघ्या च्या बाबतीत देखील घडते....आता जर स्पर्धा भरवायच्या असतील तर मग त्या जमिनीवर,मैदानात ,ग्राउंड वर भरवाव्यात ....
आणि त्याचा काल देखील योग्य असावा...
आपल्या कडे हेल्दी सिझन म्हणून आरोग्यकारी म्हणून या मॅरेथॉन थंडीत भरवल्या जातात...त्यामध्ये धावणारे धावपट्टू हे शॉर्ट किंवा स्लीव्हलेस टी शर्ट घालून धावतात...आयुर्वेदा नुसार शीत गुणाने वात वृद्धि होते,त्यामुळे धावताना लागणाऱ्या गार वऱ्याचा परिणाम शरीरावर होताना दिसतो...तसेच धावणे,पाळणे याने वाताच्या गुणात देखील वाढ होते ...त्यामुळे वात व्याधी ची यादी वाढते...
आता 10 किमी,21 किमी,40 -- 42 किमी धावणे स्पर्धा पूर्ण करणे हा आती सहसाचा प्रकार म्हणता येईल...आयुर्वेदा अति साहसा ने क्षय होते असे सांगितले आहे...तोडक्यता झीज होते...
हे काही किलोमीटर च्या सायकल स्पर्धा यासाठी देखील लागू पडते...
म्हणून रेकॉर्ड ,करणे आणि मेडल या साठी धावणे ,सोशल मीडियावर फोटो साठी धावणे हे कदापी योग्य नाही....आणि हो आता स्पर्धेला फी किंवा रजिस्ट्रेशन करावे लागते...म्हणजे आपण च पैसे देऊन विकत घेतल्यासारखे आहे...
आप आपली क्षमता ओळखून अर्ध शक्ती म्हणजे कपाळावर घामाचे थेंब येऊ पर्यंत केलेला व्यायाम स्वास्थ रक्षण,आरोग्य वाढवेल...
या सोबत आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या पाळली,सोबत स्नेहन,स्वेदन जर केले, तर आरोग्य टिकेल..नाहीतर अति साहसा ने भविष्यात अनारोग्य निर्माण होईल...
अधिक माहिती साठी व आयुर्वेदिक चिकित्सेसाठी संपर्क करा .......
डॉ.नितीन संपतराव पाटील (आयुर्वेदाचार्य) 9890056343
दीर्घायु जीवितम आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र.
यश कॉम्प्लेक्स,शॉप नं 11,सेक्टर 8,
आय डी बी आय बँकेच्या जवळ,
कळंबोली,ता:-पनवेल,रायगड,नवी मुंबई.

Address

Yash Complex ,plot 21, Sector:-8, Near IDBI BANK,kalamboli.
Panvel
410218

Telephone

+91 98900 56343

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dirghayu Jivitam Ayurved & panchkarma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dirghayu Jivitam Ayurved & panchkarma:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category