Maheash Katay Hypnotherapy and Remedy Center

Maheash Katay Hypnotherapy and Remedy Center Hypnotherapy Expert. Councilor. Founder of ‘Maheash Katay Hypnotherapy and Remedy
Centre’. MKHRC was established in 2002.

Maheash Katay Hypnotherapy and Remedy Centre (MKHRC) is born with the idea to use hypnotism in its truest form. We aid in treating psychological and psychosomatic disorders; carryout personality development and help in quitting addictions – with methodic and
accurate use of hypnosis. Treating patients with their specific problems with individualised therapy is our speciality. Director Maheash Katay’s rich experience of 14 years forms the foundation of the Centre. After treating thousands of patients successfully, the Centre has left a strong footfall in western Maharashtra, northern Maharashtra and Konkan. We continue our efforts to develop and promote Hypnotherapy as a substantial a complementary method of treatment.

31/10/2021

🪔 ✨दीपावलीच्या शुभपर्वास माझ्याकडून आपणांस व आपल्या परिवारास खुप खुप शुभेच्छा 🎉💥

🪔 शुभ दिपावली🪔
१.नोव्हेंबर २०२१ वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
२.नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
3नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
४ .नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
५ ‌.नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
६ .नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
💥ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जाओ..💥
🙏🏻 ✨शुभ दीपावली✨🙏🏻

17/09/2020

Blog - लॉकडाऊन, अनलॉक आणि स्त्रीचे दुभांगलेपण

स्त्रीविषयी आपल्या संस्कृतीमध्ये नेहमीच आदराने बोललं गेलंय. तिला ‘जगतजननी’ म्हंटलं गेलं, सरस्वतीच्या, लक्ष्मीच्या रूपात पाहण्यात आलं. परंतु त्याचबरोबर तिच्यावर अनेक नियमही लादण्यात आले. गृहस्थीची, मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिलाच उचलावी लागली. सगळं तिने हसत केलंसुद्धा. तिची सहनशीलता हाच तिचा गुण म्हणूनही गौरविण्यात आला. काळ पुढे गेला, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, अशा अनेक स्त्रियांच्या प्रयत्नातून स्त्री घराच्या चौकटीबाहेर पडू शकली. नोकरी करण्यास, आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास सक्षम झाली. परंतु आजही ‘आयडियल’ स्त्री तीच आहे जी दोन्ही सांभाळू शकते, घरही आणि नोकरीही.

या नव्या रचनेतील, आधुनिक संस्कृतीतील स्त्री खरंतर अधिक स्वतंत्र, अधिक आनंदी असायला हवी. पण तिची घुसमट अधिक वाढली. तिच्या मनोजगताचे विभाजन होऊ लागले. घरी ती एका वेगळ्या मनोभूमिकेत आणि घराबाहेर एका वेगळ्या मनोभूमिकेत वावरू लागली. ती ‘मल्टिटास्कर’, अनेक कामं एकदाच सांभाळणारी नेहमीच होती, पण या नव्या रचनेमध्ये तिचे व्यक्तिमत्त्वच दुभंगले जाऊ लागले. घराबाहेर ती आत्मविश्वासाने, स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून काम करू लागली; घरात मात्र तिला सतत दुय्यमपणा स्वीकारावा लागला.

कोरोना, त्यांनतरचे लॉकडाऊन आणि आता सुरु असलेले अनलॉक, या सगळ्यात मात्र तिची वेगळीच फरफट झाली. ही दोन्ही जगं एकमेकांत मिसळली गेली. आयुष्याचे, मनोजगताचे पडलेले जे कप्पे तिने स्वीकारले होते, ते आता एकत्र झाले. गृहिणीसुद्धा या विळख्यात अडकल्या. जी कामं एका ठराविक वेळेत उरकून त्या स्वतःसाठी वेळ काढू शकायच्या, ती कामं आता त्यांना २४ तास करावी लागू लागली. सतत काही ना काही खायला बनविणे, मुलांच्या ऑनलाईन वर्गांपासून ते त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याचे नियोजन करणे, हे सगळं त्यांनाच करावे लागू लागले. मॉर्निंग/इव्हिनिंग वॉकच्या वेळी होणाऱ्या गप्पा, पार्लरमध्ये होणारे संवाद, दुपारच्या वेळेत वाचले जाणारे पुस्तक, सगळेच सुटले. या दैनंदिन वाटणाऱ्या, छोट्या-छोट्या समस्या, तिच्यावर मोठा परिणाम करू लागल्या.

कुठे होते घुसमट?

स्त्री-स्वातंत्र्य या संज्ञेचे आपल्या समाजाने काहीसे चुकीचे आकलन केले आहे. स्त्री घराबाहेर पडतेय याचा अर्थ ती घरातल्या जबाबदाऱ्या टाळतेय, भावनिक बंध तोडतेय, असा नाही होत. पण ती जबाबदारी तिला एकटीलाच निभवावी लागते, त्यात थोडाही कसूर झाल्यास तिला दोष दिला जातो. आणि इथे ते ओझं होतं. किंबहुना तो दोष दिला गेला नाही तरी तिची तीच गिल्टी होते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मनात लहान मुलांना (सगळी सोय करून) घरी सोडून जाताना जी अपराधी भावना येते, तिला इंग्रजीमध्ये ‘मॉम गिल्ट’ असे म्हंटले गेले आहे. असे अनेक गिल्ट ती मनात बाळगत असते. पारिवारिक आणि वैयक्तिक अशी दोन्ही आयुष्यं एकाच व्यक्तीला जगता येऊ शकतात, ही संकल्पनाच तिला आणि एकूण समाजाला पटकन उमजत नाही. पण सत्य हे आहे आपण सगळेच ही दोन्ही आयुष्यं एकाच वेळी जगत असतो. नात्यांच्या बंधनातही रमत असतो आणि स्वत्वालाही आकार देत असतो.

लॉकडाऊन झाला आणि स्त्रियांचे वैयक्तिक पातळीवरचे आयुष्य मात्र कोंडीत अडकले. स्त्री घरात असली की ती आई असते, सून असते. या भूमिकाही तिला तितक्याच जिव्हाळ्याच्या असतात. त्या निभावताना ती स्वत्वाचा विचार करतही नाही. पण ऑफिसमध्ये होणाऱ्या चर्चा, कामातून मिळणारा आनंद, एका पूर्णपणे वेगळ्या जागेत (ऑफिस) गेल्याने होणारे मनोजगतावरचे वेगळे परिणाम, त्यातून घरी परतताना येणारा टवटवीतपणा, हे सगळेच नाहीसे झाले. असे नाही की हे इतरांच्या बाबतीत घडत नव्हते. मुलेसुद्धा शाळा-कॉलेज मिस करत होते, पुरुषमंडळी त्यांच्या ऑफिसची, चहावरच्या गप्पांची आठवण काढत होती, पण त्यांच्याकडे पर्याय होता - इंटरनेटवर रमण्याचा, फोनवर गप्पा मारत बसण्याचा. स्त्रीलाही हे सगळे करण्यापासून कोणी थांबवले नसले, तरी घरकामाची पहिली जबाबदारी तिच्यावरच असते. घरकामाला येणाऱ्या बायका बंद कराव्या लागल्याने ती आणखीनच वाढली. नवऱ्याने यामध्ये मदत केली तरी त्याबाबत “नवऱ्याला बायकोने कामाला लावले” असे म्हंटले जाते. या विषयावरचे जोक्स रोज व्हाट्सऍपवर येतच असतात.

जे नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे, तेच थोडयाफार फरकाने गृहिणींचे. तिचाही स्वतःसाठी असणारा वेळ आता पूर्णपणे घरासाठी व घरातील सदस्यांसाठी जाऊ लागला. आधी सांगितल्याप्रमाणे दिवसाचे जे छोटे-छोटे कप्पे तिच्यासाठी होते, ते तसे राहिले नाहीत. दोन्ही प्रकारच्या स्त्रियांची यातून घुसमट होऊ लागली. याचे साधे कारण म्हणजे त्यांचे स्वत्व जोपासण्यासाठी, फुलवण्यासाठी जो त्यांचा असा वेळ होता, तोच नाहीसा झाला.

यावर कडी म्हणजे आता अनलॉक झाल्यांनतर, स्त्रीला (आणि सगळ्यांनाच) ‘न्यू नॉर्मल’ स्वीकारावे लागत आहे. मग नोकरीवर जाणाऱ्या स्त्रीचे पुन्हा नोकरीवर खरंच गरजेचे आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. घरची आर्थिक स्थिती जर बरी असेल, तर मग ते अनावश्यक ठरवलं जाऊ लागलं. घरी येऊन तीच मुलांचं सगळं करणार, घरची कामं सांभाळणार, त्यातून सगळीकडे हात लागणार, इन्फेक्शनची रिस्क वाढणार. हे सगळं तिला कोणी म्हंटलं नाही, तरी तिचं तिलाच हे गिल्ट येऊ लागलं, ‘मॉम गिल्ट’ सारखं. तिच्यावर असणाऱ्या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये आता या जबाबदारीची भर पडली - घरच्यांना इन्फेक्शन न होऊ देणे.

यातून मार्ग काय?

आधी केलेल्या विवेचनातून आपल्या लक्षात येते की यातील अतिशय प्रॅक्टिकल असा मुद्दा हा वेळेच्या नियोजनाचा आहे. पण त्या विषयाकडे जाण्याआधी थोडं स्त्रीच्या मनो-अवस्थेचे आकलन करण्याच्या प्रयत्न करूया. आधी सांगितल्याप्रमाणे तिच्या मनोविश्वाचे होणारे विभाजन ही खरी समस्या आहे. संमोहनशास्त्राच्या मुळाशी आपले अंतर्मन आणि त्याच्याशी आपले असणारे सुदृढ नाते, हे आहे. सिगमंड फ्रॉइड सांगतो त्याप्रमाणे आपल्या अंतर्मनात अनेक अंतर्विरोधी, अनेकरंगी विचार असतात. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व हे एकच एक असे नसते, हेही खरे आहे. पण याचा अर्थ असा नाही, की आपण स्वतःला अस्थिर आणि पर्यायाने दुबळे करून घ्यावे. स्त्री जरी एकाच वेळी अनेक भूमिकांमध्ये ये-जा करत असली, तरी तिला तिच्या मनोविश्वाचे विभाजन करण्याची गरज नाही. ज्या अनेक भूमिका तिला निभवायच्या आहेत, त्या “पर्यायी” आहेत, कुठल्यातरी एकाच भूमिकेला तिने स्वीकारलं पाहिजे, हा विचार मुळात बाजूला सारायला हवा, तिनेही आणि इतरांनीही. अर्थातच यात तिला तिच्या जवळच्या सगळ्यांनीच मदत करायला हवी. समोपदेशनातून मी नेमक्या याच विचाराला हात घालण्याचा प्रयत्न करत असतो. स्त्रीचे व तिच्या जवळच्या व्यक्तींचे मनोविश्व अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करत असतो.

एकदा ही मनोभूमिका काहीशी स्वीकारली गेल्यावर मग त्यांच्या दैनंदिन जीवनावर, वेळापत्रकावर काम करण्यात येते. संमोहनशास्त्रातील अनेक तंत्रे येथे वापरण्यात येतात. ‘महिलांच्या समस्या’ ही आमची एक स्वतंत्र सेवाच आहे; या समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट पद्धतींचा विकास आम्ही केला आहे. दैनंदिन जीवनात अगदी छोटे-छोटे बदल - कामाच्या वेळा (घरकाम तसेच नोकरीतील काम) निश्चित करून घेणे; जे काम इतरांशी संबंधित नाही, ते काम घरातल्याच एका वेगळ्या खोलीत, वेगळ्या स्पेस मध्ये करणे; नोकरीवर घराबाहेर असताना ठराविक वेळ फोनकॉल साठी ठेवणे; गृहिणींना त्यांच्या आवडीनुसार काही अॅक्टिव्हिटी सुचविणे व त्या जोपासण्यासाठी वेळेचे नियोजन करून देणे - या आणि अशा लहान पण दूरगामी परिणाम साधणाऱ्या बदलांमधून आपल्याला रोजच्या जीवनाचा दर्जा सुधारता येतो. त्यातून अर्थातच आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते.

अर्थातच हे बदल, एकूणच थेरपी ही व्यक्तिसापेक्ष असते. त्यातच संमोहनतज्ज्ञाचे खरे कसब असते. मूलभूत मुद्दा मात्र तोच आहे - स्त्रीची मनो-अवस्था समजून घेणे आणि तिच्या दुभांगलेपणाचे तिच्या अंतर्मनातून उच्चाटन करणे.

आपण हा ब्लॉग वाचण्यासाठी वेळ दिला, याबाबत आम्ही आपले आभारी आहोत. असेच आणखी ब्लॉग व फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी या ब्लॉगला व आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.

#मार्ग_संमोहनाचा_शोध_स्वतःचा!


25/08/2020

ब्लॉग :अनलॉक व्हा!
कोरोनाच्या लढ्यात मानसिक मनोबल बळकट करूया...
आता यातून बाहेर पडायला हवे. आता अनलॉक व्हायला हवे! कोरोनाची भिती काढून टाकायला हवी!
अनेकवर्षे संमोहन आणि लाईफ कोचिंग क्षेत्रात काम केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे,की कोणतीही गोष्ट अंतर्मनात गेल्यास ती सहजी बाहेर पडत नाही. त्यामुळे या भितीवर आत्ताच मात करायला हवी, विजय मिळवायला हवा. स्वतःला अनलॉक करायला हवे.
कोरोनाची लस शोधण्याचे काम जागतिक पातळीवर जोरदारपणे सुरू आहे. रुग्णांना बरे करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जोरदारपणे काम सुरू आहे. या वर्षाच्या शेवटी किंवा अगदीच पुढच्या वर्षी सुरवातीला ही जागतिक साथ आटोक्यात येईल. पण मनावर झालेले परिणाम जायला अनेक दिवस लागतील.
त्यामुळे ही मानसिक समस्या आत्ताच सोडवणे गरजेचे आहे.
काळजी आणि सावधानता बाळगून कोरोनाची लागण थांबवता येऊ शकते. मास्क लावून, सॅनिटायजर वापरुन, गर्दी टाळून, एकमेकांमध्ये अंतर ठेऊन आपण कोरोनाला लांब ठेऊ शकतो.
पण मनाला निरोगी ठेवणे, ही अनेकवर्षे उत्तम जगण्याची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी मनाला अनलॉक करायला हवे.
आम्ही संमोहन थेरपीचा उपयोग करून मनावर उपचार करतो. कोरोनाच्या महामारीत मानसिक आरोग्यावर सध्याच्या स्थितीचा आम्ही अभ्यास केला आणि या निष्कर्षाला आलो की संमोहन उपचार पद्धती ही यासाठी उत्तम उपचार पद्धती आहे.
छोटी समस्या असेल, तर मलम लावून उपाय करता येतो, पण कोणतीही मोठी समस्या मूळापासून काढून टाकायची असेल, तर वैद्यक शास्त्रामध्ये शस्त्रक्रिया करतात.
मानसिक समस्या ही आतवर खोल रुतून बसलेली म्हणजेच गंभीर स्वरूपाची असते. त्यामुळेच त्यावर गंभीर उपाय करणे गरजेचे असतात.
सध्याच्या या कठीण कोरोना काळात तुम्ही स्वतःला हतबल संजू नका. तुम्ही स्वतःला एकटे आणि असहाय्य समजू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. फक्त एक फोन करा. आम्ही तुमचे ऐकण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज आहोत.
संमोहन उपचार पद्धतीने अशा गंभीर समस्या सोडवल्या जातात. या उपचारांमुळे कार्यक्षमता वाढणे, एकाग्रता वाढणे, मन शांत करणे, असे फायदे होतात.
आम्ही गेल्या २० वर्षांमध्ये असे अनेक उपचार केले आसून, त्यातून आमची स्वतःची अशी एक पद्धत विकसीत झाली आहे. संमोहनाला आम्ही लाईफ कोचिंगची जोड दिली आहे.
या लगेच आमच्याशी बोला. आम्ही आपल्याला घरीच ऑनलाईन थेरपी आणि समुपदेशन सेवा देऊ शकतो.
तुम्ही आमच्या फेसबुक पेजला, वेबसाईटला भेट द्या आणि आम्हाला कॉल करा.
स्वतःला अनलॉक करा आम्ही तुम्हाला समजून घेण्यासाठी उपलब्ध आहोत!
#मार्ग_संमोहनाचा_शोध_स्वतःचा!

19/08/2020

ब्लॉग :ऑनलाईन शिक्षण - समस्या आणि समन्वय

कोरोना आला आणि सोबत अनेक छोटी छोटी आव्हाने घेऊन आला. बाहेरून आणलेली प्रत्येक गोष्ट - मग ती भाजी असो की दुधाची पिशवी - उन्हात ठेवावी कि धुवून घ्यावी, त्यावर सॅनिटायझर फिरवावं का, असे अनेक प्रश्न सोबत घेऊन येते. आरोग्याबरोबरच निर्माण झालेला एक मोठा प्रश्न म्हणजे मुलांचे शिक्षण. परीक्षेच्या मुद्द्यावर अनेक पालकांनी भूमिका घेतली की एक वर्ष वाया गेलं तरी चालेल, पण आम्ही मुलांना परीक्षेला पाठवणार नाही. परीक्षा केंद्र म्हंटलं की गर्दीचे ठिकाण आणि गर्दी म्हणजे कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त. तोच प्रश्न शाळा-महाविद्यालयातील नियमित वर्गांचा. या सगळ्यावर सरकारने काढलेला आणि पालकांना-मुलांनाही पटलेला पर्याय, म्हणजे ऑनलाईन शिक्षण!

जी गोष्ट इतके दिवस मुलांना एकतर निषिद्ध होती किंवा ठरवून दिलेल्या वेळेपुरतीच वापरायला मिळायची, तीच आता ‘अत्यावश्यक’ झाली. मुलांना खास त्यांचे-त्यांचे मोबाईल, टॅब्स मिळाले. मुलं उत्साहाने ऑनलाईन वर्गांना बसू लागले, शिक्षक या नवीन पद्धतीची सवय करून घेऊ लागले आणि पालकही निश्चिंत झाले. पण मोकळ्या वर्गांमध्ये, शाळेच्या मैदानांमध्ये भरारी घेऊ शकणारे बालमन मोबाईल-स्क्रीनच्या चौकटीमध्ये बंद होते तेव्हा काय होते? २४ तास घरात बंदिस्त झालेल्या आपल्या मुलांना, ऑनलाईन वर्गांनंतर पुन्हा गेम्स, युट्युब, कार्टून्स, शिवाय काय पर्याय आहे? कुठला सुवर्णमध्य आहे का?

ऑनलाईन शिक्षण आणि संलग्न समस्या

ऑनलाईन शिक्षण ही नक्कीच सध्याची गरज आहे. मुलांचे शिक्षणही सुरु राहावे आणि कोरोनापासूनही त्यांचा बचाव व्हावा, यासाठी हा मार्ग उत्तम आहे. पंतप्रधानांनी सांगितलेल्या ‘बचना भी है और आगे बढना भी है’ तत्त्वाचीच ही अंमलबजावणी आहे. परंतु मुलांच्या भावविश्वावर, त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर याचा काय परिणाम होतो?

मोबाईल आणि इंटरनेटचा सगळ्यात मोठा परिणाम होतो तो आपल्या ‘अटेन्शन स्पॅन’ अर्थात एखादी गोष्ट आपण किती वेळ लक्ष देऊन करू शकतो, या क्षमतेवर. इंटरनेट हे एक स्वतंत्र विश्व आहे, त्यात लाखो गोष्टी आहेत ज्या मनोरंजक आहेत, लक्षवेधी आहेत. याच माध्यमातून जेव्हा शिक्षण होऊ लागते, तेव्हा लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर साहजिकच परिणाम होतो. शाळेतील वर्गामध्ये असताना मुले सर्व गोष्टी बाजूला ठेवून जे शिकवलं जातंय त्यावर लक्ष देऊ शकतात, बाकी सर्व गोष्टींमध्ये आणि शिक्षणप्रक्रियेमध्ये एक प्रकारची सीमा तिथे तयार होते. ती सीमाच मोबाईलमुळे नाहीशी होते. मोबाईलवर अधिकाधिक वेळ घालवावा लागत असल्यामुळे सगळ्याच बाबतीतला ‘अटेन्शन स्पॅन’ कमी होऊ शकतो, ती एक मानसिक सवय बनून जाते. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेसुद्धा (WHO) मोबाईलच्या अतिवापराला व त्यातून होणाऱ्या मानसिक परिणामांना आता ‘व्यसन’ या श्रेणीत टाकले आहे. यातूनच या समस्येचे गांभीर्य लक्षात येते.

‘मॉँटगॉमरी कॉलेज’च्या वेब साईटवरील एका ब्लॉगनुसार ऑनलाईन वर्गांमुळे मुलांमध्ये एकटं पडत असल्याची भावनाही रुजते. सगळी मुलं ऑनलाईन वर्गामध्ये बरोबर असली, शिक्षक समोर दिसत असले, तरी हे एक ‘व्हर्च्युअल’, एक आभासी माध्यम आहे. त्यातून मिळणारे शिक्षण निश्चितच महत्त्वाचे आहे, पण शाळेतील शिक्षणातून रुजणारी सामूहिकतेची, सोबत गोष्टी करण्याची मूल्ये, ऑनलाईन माध्यमात नाहीशी होतात. मुले या आभासी जगात वावरताना इतकी हरवून जातात, की खऱ्या आयुष्यातील समस्या त्यांना खूप मोठ्या वाटतात, त्यातील छोटे-छोटे आनंदही त्यांना नकोसे होतात. हेसुद्धा व्यसनाधीनतेचेच लक्षण आहे.

मोबाईलवर मुले शिक्षण सोडून इतरही गोष्टी करत असतात. कार्टून्स, गेम्स हे त्यांच्या जीवनाच्या अविभाज्य घटक आहेत. त्यातून मोबाईलवर घालवण्यात येणारा वेळ वाढतो व हे व्यसन वाढतच जाते. पालकांशी संवाद कमी होत जातो व शारीरिक हालचालही कमी होते. फायद्यांबरोबरच अशा अनेक समस्याही ऑनलाईन शिक्षण घेऊन येते.

समन्वय आणि सुवर्णमध्य

या सगळ्या परिस्थितीमध्ये सुवर्णमध्य कसा गाठता येईल? मुलांच्या वाढीमध्ये शिक्षणासोबतच ज्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्यांचा समन्वय कसा साधता येईल?

कुठल्याही समस्येच्या निराकारणाची सुरुवात ही संवादातूनच होते. पालक-पाल्य संवाद हा या नात्याचा महत्त्वाचा दुवा आहे. पालकांनी यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. संमोहनतज्ञ म्हणून मी गेली अनेक वर्षे केवळ संवाद याच गोष्टीवर काम करून पालक आणि मुले यांच्यातील नाते सुदृढ करू शकलो आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमीच मुलं चुकीची असतात, हा समज दूर करणे, त्यांच्या दृष्टिकोनातुन गोष्टी समजून घेणे. समुपदेशनामध्ये माझ्या अनेकदा लक्षात येते, की समस्या फक्त एकमेकांना समजून न घेतल्याने निर्माण झाल्या आहेत. मोबाईल सोडून इतर गोष्टींचे महत्त्व समजून सांगणे, संवादाची गोडी मुलांना लावणे, या गोष्टी मुलांबरोबर करणे व त्यासाठी वेगळा वेळ राखून ठेवणे, यातून समन्वय साधता येऊ शकतो.

मुलांच्या दिनक्रमावरही काम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या आवडी जोपासल्या जाव्यात, शिक्षण, व्यायाम, या अनिवार्य गोष्टींचा त्यात समावेश व्हावा व हे सगळे त्यांना बंधनकारक, जाचकही वाटू नये, अशा दिनक्रमाची रचना करणे गरजेचे असते. हळूहळू हा दिनक्रम व त्याचे महत्त्व मुलांच्या अंतर्मनात झिरपल्यास, ती नेहमीचीच चांगली सवय होऊन जाते. अतिशय गुंतागुंतीच्या मानसिक समस्याही केवळ दिनक्रम सुरळीत करून, संमोहनशास्त्राच्या माध्यमातून चांगल्या सवयी अंतर्मनामध्ये रुजवून सोडविण्यात मला यश आले आहे. त्यामुळे पाल्यांच्या अंतर्मनात चांगला दिनक्रम रुजवून पालक समन्वय साधू शकतात.

कोरोनाची सवय करून घ्यावी लागणार आहे, असे आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे. शारीरिक स्वास्थ्याची काळजी आपण घेतच आहोत. परंतु रोजच्या जीवनातून निर्माण होणाऱ्या मानसिक समस्याही आपल्याला सोडवायला हव्यात. तरच आपण कोरोनाला पूर्णपणे हरवू शकू.
आपण हा ब्लॉग वाचण्यासाठी वेळ दिला, याबाबत आम्ही आपले आभारी आहोत. असेच आणखी ब्लॉग व फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी या ब्लॉगला व आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.

(सदर ब्लॉगमधील विचार हे लेखकाच्या स्वानुभवातून व अभ्यासातून आलेले आहेत.)
#मार्ग_संमोहनाचा_शोध _स्वतःचा!

14/08/2020

अनुभूति : मार्ग संमोहनाचा,शोध स्वत:चा!
नमस्कार मी प्रतिक
अतिविचारी, भित्रा, सतत कसली तरी चिंता करणारा, डिप्रेशन मध्ये गुंतलेला असा होतो. जवळपास चार वर्षे मी डिप्रेशन मध्ये होतो. सर्व प्रकारचे उपचार करुन थकलो होतो. एके दिवशी माझ्या काकांना हे सर्व समजले. त्यांनी मला श्री. महेश काटे सरांचा पत्ता दिला. मी व माझे वडील त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझ्या समस्या समजून घेतल्या, सर अगदी मित्राप्रमाणे माझ्याशी बोलत होते. नंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, माझ्या कडे प्रचंड भिती, वयाचा विचार करता(वय 20 वर्षे ) निरागसपणा, बालिशपणा आहे, बाहेर एकटे जाण्याची हिम्मत नाही. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांनी लक्षात घेतली. सरांना समस्यांचे मुळ शोधायचे होते. कारण समस्या जर मुळापासून तोडली, तर ती पून्हा उद्भवत नाही. सरांनी मुळ शोधण्यासाठी असलेल्या सर्व पायऱ्या समजावून सांगितल्या. व त्यांच्या असलेल्या ब्रीद वाक्याचा अर्थ समजावून सांगितला. "मार्ग संमोहनाचा, शोध स्वतःचा!
पहिल्या दिवशी माझ्या आजारावर खोल चर्चा झाली. नंतर सरांनी मला एका खुर्चीवर बसवून गाढ निद्रेत नेले. त्यांच्या आवाजाने आत्मविश्वासात भर पडत होती. त्यावेळी माझे शरीर हवेत तरंगत असल्यासारखे मला भासत होते. मन म्हणजे नक्की काय असतं? हे तेव्हा जाणवले. दुसर्‍या दिवशी सरांनी माझ्यावर फास्ट लाईफ रिग्रेशन प्रोसेस केली. त्या चालू तारखेपासून ते मी जन्मलेल्या तारखेपर्यंतचा प्रवास मला करवून आणला. यात सरांना माझ्या समस्येचे मुळ दिसून आले. जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर सरांनी मला ते मुळ सांगितले. की लहानपणी कुटुंबातील व्यक्ती कडुन ऐकलेल्या भितीदायक गोष्टींचा परिणाम माझ्या मनावर झाला होता. मला जाणवले की माझी आजी मला लहानपणी गोष्टी सांगायची. हे मुळ सरांनी काढून टाकले. तिसर्‍या दिवशी मला भिती वाटत होती. परंतु अचानक हिम्मत जागृत झाली. व मी एकटा सरांकडे आलो. यावरून मला समजले की आपली भिती नाहीशी झाली आहे. त्यादिवशी सरांनी माझ्यात दैविक व वैश्विक शक्ती रुजवली. त्यावेळी अंतरी असलेल्या देवाशी जोडणी झाल्याचा अनुभव मला येत होता. चौथ्या पाचव्या दिवशी माझ्या ध्येयांबाबत चर्चा झाली. आणि सरांनी त्यांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे मला माझ्या स्वतःचा शोध करुन दिला. माझ्यात बिनधास्तपणा आला. तिथपासून मला संकटाना सामोरे जायची हिम्मत माझ्यात निर्माण झाली. सर्व परिक्षांमध्ये मी छान गुणांनी उत्तीर्ण झालो. आत्ता देखील माझ्या मनात एक जरी चिंता निर्माण झाली की सरांचा मनोमनी एक आशिर्वाद घेतला तरीही ती चिंता दूर होते.
समस्येवर नुसता उपचारच न करता सरांनी माझे व्यक्तिमत्त्व घडवले. माझ्या जीवनाचा मार्ग मला दाखवला. त्या मार्गावरती चालायचे कसे ते ही समजावून सांगितले. मार्ग दर्शन करता करता सरांची एक विशेष शैली मला दिसुन आली. त्यांना सर्व प्रकारच्या गोष्टींविषयी खोलवर ज्ञान आहे. मी त्याच्यांकडून लेखन कलेतील ही काही ज्ञान घेतले. पुढे काही अडचणी आल्या तरीही तु खंबीरपणे त्यांना सामोरा जाशील हा आत्मविश्वास मला त्यांनी दिला. सर मला अजुनही मार्गदर्शन करतात. माझ्या अज्ञानी मनाला ज्ञानाची ओळख करुन देतात. ते माझे मित्र, गुरू, दिशादर्शक आहेत. त्यांचे आभार मानू तितके कमी आहेत. सर तुम्ही माझे खरे लाईफ कोच आहात. धन्यवाद सर.
#मार्ग _संमोहनाचा_,शोध _स्वत:चा!

23/07/2020

"नकळत घडलेली चूक"

पालक म्हणजे नक्की काय? तर, आपल्या पाल्याला घडविणारा, त्याची दक्षता घेणारा, त्याला योग्य दिशेने पुढे घेऊन जाणारा होय. तसाच मी देखील एक पालक आहे. परंतू माझ्याकडून नकळत एक चूक घडत होती. त्यात मला आनंद मिळत होता. तसेच माझा हेतू देखील त्यातून सार्थक होत होता. परंतु काही काळाने मला त्या गोष्टीचे दुष्परिणाम दिसायला लागले. मी नकळतपणे कुठेतरी चूकत होतो.
तो एक वर्षाचा माझा मुलगा आपल्या आईने भरवलेला घास रडत रडत खात होता. नंतर त्याला खायची इच्छाच होत नव्हती. तो मोठमोठ्याने रडत, आपले तोंड फिरवत जेवायला नकार देत होता, त्याच्या आईला ही काही समजत नव्हते की आपला मुलगा का जेवत नाहीये?
त्याला झोप तर आली नसेल? असे प्रश्न पडू लागले. मी शेजारी हातात लॅपटॉप घेऊन आपले काम करत होतो. त्याची आई मला म्हंटली, "अहो, हा तर जेवायचे नावच घेत नाही आहे. " हे ऐकल्यावर मी त्याच्या जवळ गेलो,त्याच्या सोबत खेळायचा प्रयत्न केला. परंतू तो मानेना. मग मी माझ्या खिशातून मोबाईल काढला. लहान मुलांचे कार्टूनचे व्हिडिओ दाखवले. मग मात्र तो रडायचा थांबला. खायला ही लागला. मोबाईल ची कल्पना आम्हाला आवडली. नंतर जेव्हा जेव्हा तो रडत असे, आम्ही मोबाईल वर कार्टून लावून त्याला देत असे.
असे करता करता, त्याला मोबाईल ची सवय लागत गेली. प्रत्येक गोष्टीत त्याला मोबाईल लागत असे. जसजसे वय वाढले तसतसे मोबाईल कडे त्याचे आकर्षण वाढत गेले. नवनवीन गेम्स त्याला आवडायला लागल्या, हळूहळू त्या गेम्स चा किंवा त्या मोबाईल चा परिणाम त्याच्या शिक्षणावर तसेच त्याच्या मानसिक आरोग्यावर होत गेला. त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. मग मात्र मी त्याला ओरडायला लागलो, त्याच्या मोबाईल च्या अतिवापराच्या समस्येवर त्याला बोलायला लागलो. परंतु नंतर मलाच जाणवले,की इथे नक्की चूक कुणाची आहे? त्याची का माझी, तेव्हाच जर मी मोबाईल न दाखवता, कुठल्याही खेळण्यात रमवून जेवण भरवले असते, तर ही वेळ आलीच नसती. हेच समस्येचे मूळ मला उमगून आले. मी नकळतपणे इथे चूकत होतो.
माझ्या सारखी नकळत अशी एखादी चूक तुमच्या कडून तर घडत नाही ना? याचा जरा शांतपणे तुम्ही विचार करावा. हीच चूक जर तूम्ही करत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की, पालक म्हणून आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी योग्य ते निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्या पाल्याला घडविण्यात तुमचाच मोठा हात आहे, त्याला योग्य घडविणे हे तुमच्याच हातात आहे. त्याला सगळ्या सोयी पुरविणे हे आपले कर्तव्य आहेच परंतू त्या सोयींचा तो योग्य वापर करत आहे का? हे पाहणे सुद्धा आपले कर्तव्य आहे. फक्त मोबाईलच्या बाबतीतच नाही तर अशा अनेक बाबी आहेत की ज्यात आपण नकळत अशा चूका करत असतो. त्याच चूकांचे स्पष्टीकरण मी पुढील ब्लॉग मध्ये मांडत जाणार आहे. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेलच, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला व लाईक करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून कळवा. #मार्ग संमोहनाचा,शोध स्वत:चा !

स्क्रीनवर एखादी गोष्ट बघण्याची लहानपणापासून सवय लागल्यास त्याचे रूपांतर व्यसनांमध्ये होते. पुढे मुलांना सतत मोबाईल लागतो...
11/07/2020

स्क्रीनवर एखादी गोष्ट बघण्याची लहानपणापासून सवय लागल्यास त्याचे रूपांतर व्यसनांमध्ये होते. पुढे मुलांना सतत मोबाईल लागतो. मुले त्यामध्ये रमतात, म्हणून सुरवातीला पालक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. किंबहुना त्यांना ते छानच वाटते. पण पुढे मुले त्या मोबाईल मधून डोके बाहेर काढत नाहीत.
सतत कार्टून बघणे सुरू होते. गाणी बघणे सुरू होते. पुढे गेम खेळणे सुरू होते. हे असे वाढत जाते. मोठ्या माणसांनाही जर असे व्यसन लागते, तर लहान मुलांना लागतेच लागते.
गेम खेळण्याचे व्यसन अतिशय भयानक आहे. यातून अनेक अपघात घडले आहेत. मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. यात मुले पालकांच्या नियंत्रणाबाहेर जातात. मुलांच्या मनात फक्त मोबाईल, गेम, काहीतरी स्क्रीनवर बघणे, असेच सुरू राहते. त्यांना खाण्या-पिण्याचे भान राहत नाही. मुले एकलकोंडी होतात. एकएकटी राहू लागतात. त्यांच्यामधली सगळी ऊर्जा निघून जाते. क्रिएटीव्हिटी संपून जाते. ते कोणाशीही बोलणे टाळू लागतात. त्यांना सूचना देणाऱ्या पालकांचा राग येऊ लागतो. त्यामधून ते कोणतेही भयानक कृत्य करू शकतात, किंवा स्वतःला इजा करवून घेऊ शकतात...

संपुर्ण ब्लॉग वाचण्यासाठी लिंक अथवा फोटोवर क्लिक करा.

जी गोष्ट अपवाद होती, ती आजतरी आपण गरज म्हणून स्विकारली आहे. पण हीच आजची गरज उद्या आपली व्यसनं बनली तर? कोरोनाच्या का...

रोटरी क्लब ऑफ इंदापूर आणि पुणे न्युज नेटवर्क आयॊजीतसुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ महेश काटे यांचे मार्गदर्शन विषय: लॉकडाऊन नंत...
23/05/2020

रोटरी क्लब ऑफ इंदापूर आणि पुणे न्युज नेटवर्क
आयॊजीत

सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ महेश काटे यांचे मार्गदर्शन

विषय: लॉकडाऊन नंतर आयुष्याला सामोरे जाताना

रविवार, दिनांक २४ मे, २०२०
वेळ: सकाळी ११.०० वाजता

रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या फेसबुक पेज वर

https://www.facebook.com/Rotary-club-of-Indapur-1548871272016011

13/02/2020

परीक्षा आलीये...तुमची संपूर्ण तयारी झालीये का?
आपला सगळा अभ्यास झालंय, अनेक वेळा रिव्हिजन झालीये, तीन तास पेपर लिहिण्याचा सरावही झालाय.
पण आपली मानसिक तयारी झालीये का?
परीक्षेच्या वेळी आपले बाह्यमन सक्रीय होते. अंतर्मनामध्ये ठसलेला अभ्यास, बाह्यमन व्यक्त करण्यास मदत करते.
पण त्यासाठी आपले अंतर्मन सुदृढ आणि शांत हवे.
नाहीतर या समस्या येतात –
परीक्षेची भीती वाटणे, दडपण येणे
केलेला अभ्यास ऐनवेळी न आठवणे
वेगळ्या स्वरूपात प्रश्न समोर आल्यास, उत्तर माहित असूनही, गोंधळ उडणे
लिखाणाची गती कमी पडणे
पेपर संपल्यावर किंवा अगदी शेवटच्या क्षणी उत्तरे आठविणे
पेपर लिहिताना वेळेचे नियोजन नीट न करता येणे
पेपरमध्ये खाडाखोड होणे, प्रेझेन्टेशन नीट न होणे
या समस्या येऊ नयेत, म्हणूनच आपल्या अंतर्मनातील व बाह्यमनातील संवाद सुदृढ हवा. आणि त्यासाठीच आम्ही आयोजित करतोय -
मुले घडविताना – पूर्व-परीक्षा कार्यशाळा
दर शनिवार, रविवार व सोमवार – परीक्षा सुरु होईपर्यंत

30/07/2019

Address

Survey No. : 183/A1, Kate Nagar, Pimple Saudagar
Pune
411027

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm
Sunday 9:30am - 6pm

Telephone

+917887746789

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maheash Katay Hypnotherapy and Remedy Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Maheash Katay Hypnotherapy and Remedy Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category